शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

भारताचा न्यूझीलंडकडून पराभव

By admin | Updated: April 14, 2016 02:54 IST

भारतीय संघाला बुधवारी २५व्या अझलान शाह हॉकी स्पर्धेच्या राऊंड रॉबिन लढतीत न्यूझीलंडकडून १-२ ने पराभवाचा सामना करावा लागल्याने पुढील प्रवास कठीण झाला आहे. या स्पर्धेच्या

इपोह : भारतीय संघाला बुधवारी २५व्या अझलान शाह हॉकी स्पर्धेच्या राऊंड रॉबिन लढतीत न्यूझीलंडकडून १-२ ने पराभवाचा सामना करावा लागल्याने पुढील प्रवास कठीण झाला आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक द्यायची झाल्यास यजमान मलेशियावर विजय नोंदविण्याचे आव्हान भारतापुढे उभे राहिले आहे.गत चॅम्पियन न्यूझीलंडने केन रसेल (२८व्या मिनिटाला) आणि निक विल्सन (४१व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे भारताला पराभूत केले. भारताकडून एकमेव गोल मनदीपसिंग याने ३६व्या मिनिटाला केला. विल्सनचा गोल भारतीय बचाव फळीच्या चुकीमुळे झाला. भारतीय गोलकीपर अपयशी ठरल्यानंतर बचाव फळीतील हरमनप्रीत याला चकवून विल्सनने चेंडू गोलजाळीत ढकलला. भारत जिंकला असता, तर अंतिम फेरीसाठी पात्र ठरला असता. शिवाय, सामना ड्रॉ झाला असता, तरी न्यूझीलंडच्या पुढे राहिला असता; पण विजयामुळे न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आला. यानंतर भारतीय संघ मलेशियाकडून पराभूत झाल्यास स्पर्धेचा अंतिम सामना आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड असा होईल. आॅस्ट्रेलियाने सलग ४ विजयांतून १२ गुण मिळविले असून, न्यूझीलंडचे ६ सामन्यांत ११ आणि भारताचे ५ सामन्यांत ९ गुण आहेत.आकाश चिकटेच्या छातीवर चेंडू आदळल्याने संघ व्यवस्थापनाने सामना सुरू होण्याआधी गोलकीपर बदलण्याचा निर्णय घेतला. हरज्योतने गोलकीपरची भूमिका बजावली. भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर २०व्या मिनिटाला मिळाला. न्यूझीलंडचा गोलकीपर डेव्होन मॅन्चेस्टर याने रूपिंदरपाल सिंगचा ‘ड्रॅगफ्लिकर’ परतवून लावला. केन रसेल याने २८व्या मिनिटाला न्यूझीलंडकडून पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला. भारताने प्रत्युत्तरात वारंवार हल्ले चढविले. त्यात यश येऊन तलविंदरच्या पासवर मनदीपने गोल नोंदविला. चार मिनिटांनंतर एस. व्ही. सुनील याने प्रतिस्पर्धी बचाव फळी भेदली; पण चेंडूवरील नियंत्रण सुटल्याने गोल होऊ शकला नाही. पुढच्या मिनिटाला विल्सनने भारतीय कमकुवत बचाव फळीचा लाभ घेऊन गोल नोंदविला. भारताला उत्तरार्धात मिळालेले पेनल्टी कॉर्नर वाया गेले. (वृत्तसंस्था)संघात ऊर्जा नव्हती : रोलॅन्ट ओल्टमन्सइपोह : आतापर्यंतच्या सामन्यात भारतीय संघ ज्या ताकदीने खेळला ती ताकद आणि ऊर्जा न्यूझीलंडविरुद्ध दिसलीच नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय हॉकी संघाचे कोच रोलॅन्ट ओल्टमन्स यांनी पराभवानंतर व्यक्त केली. उकाडा आणि दमटपणा याचा कामगिरीवर विपरीत परिणाम झाला. आम्ही कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलो. येथे तापमान अधिक आहे; शिवाय मैदानावर पाण्याचे फवारे मारल्यानंतर उकाडा असह्य होतो. उकाड्यामुळे पेनल्टीवरदेखील परिणाम झाला. मैदानावर घसरण असल्यामुळे आमचे खेळाडू ‘परफेक्ट’ कामगिरीत मागे पडले, असे ओल्टमन्स यांचे मत होते.दुष्काळग्रस्तांसाठी हॉकी इंडियाचे दहा लाखनवी दिल्ली : महाराष्ट्रातील दुष्काळावर तीव्र चिंता व्यक्त करीत हॉकी इंडियाने दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निधीत दहा लाख रुपये दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना ही रक्कम लवकरच प्रदान करण्यात येणार आहे.