शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा न्यूझीलंडकडून पराभव

By admin | Updated: April 14, 2016 02:54 IST

भारतीय संघाला बुधवारी २५व्या अझलान शाह हॉकी स्पर्धेच्या राऊंड रॉबिन लढतीत न्यूझीलंडकडून १-२ ने पराभवाचा सामना करावा लागल्याने पुढील प्रवास कठीण झाला आहे. या स्पर्धेच्या

इपोह : भारतीय संघाला बुधवारी २५व्या अझलान शाह हॉकी स्पर्धेच्या राऊंड रॉबिन लढतीत न्यूझीलंडकडून १-२ ने पराभवाचा सामना करावा लागल्याने पुढील प्रवास कठीण झाला आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक द्यायची झाल्यास यजमान मलेशियावर विजय नोंदविण्याचे आव्हान भारतापुढे उभे राहिले आहे.गत चॅम्पियन न्यूझीलंडने केन रसेल (२८व्या मिनिटाला) आणि निक विल्सन (४१व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे भारताला पराभूत केले. भारताकडून एकमेव गोल मनदीपसिंग याने ३६व्या मिनिटाला केला. विल्सनचा गोल भारतीय बचाव फळीच्या चुकीमुळे झाला. भारतीय गोलकीपर अपयशी ठरल्यानंतर बचाव फळीतील हरमनप्रीत याला चकवून विल्सनने चेंडू गोलजाळीत ढकलला. भारत जिंकला असता, तर अंतिम फेरीसाठी पात्र ठरला असता. शिवाय, सामना ड्रॉ झाला असता, तरी न्यूझीलंडच्या पुढे राहिला असता; पण विजयामुळे न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आला. यानंतर भारतीय संघ मलेशियाकडून पराभूत झाल्यास स्पर्धेचा अंतिम सामना आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड असा होईल. आॅस्ट्रेलियाने सलग ४ विजयांतून १२ गुण मिळविले असून, न्यूझीलंडचे ६ सामन्यांत ११ आणि भारताचे ५ सामन्यांत ९ गुण आहेत.आकाश चिकटेच्या छातीवर चेंडू आदळल्याने संघ व्यवस्थापनाने सामना सुरू होण्याआधी गोलकीपर बदलण्याचा निर्णय घेतला. हरज्योतने गोलकीपरची भूमिका बजावली. भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर २०व्या मिनिटाला मिळाला. न्यूझीलंडचा गोलकीपर डेव्होन मॅन्चेस्टर याने रूपिंदरपाल सिंगचा ‘ड्रॅगफ्लिकर’ परतवून लावला. केन रसेल याने २८व्या मिनिटाला न्यूझीलंडकडून पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला. भारताने प्रत्युत्तरात वारंवार हल्ले चढविले. त्यात यश येऊन तलविंदरच्या पासवर मनदीपने गोल नोंदविला. चार मिनिटांनंतर एस. व्ही. सुनील याने प्रतिस्पर्धी बचाव फळी भेदली; पण चेंडूवरील नियंत्रण सुटल्याने गोल होऊ शकला नाही. पुढच्या मिनिटाला विल्सनने भारतीय कमकुवत बचाव फळीचा लाभ घेऊन गोल नोंदविला. भारताला उत्तरार्धात मिळालेले पेनल्टी कॉर्नर वाया गेले. (वृत्तसंस्था)संघात ऊर्जा नव्हती : रोलॅन्ट ओल्टमन्सइपोह : आतापर्यंतच्या सामन्यात भारतीय संघ ज्या ताकदीने खेळला ती ताकद आणि ऊर्जा न्यूझीलंडविरुद्ध दिसलीच नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय हॉकी संघाचे कोच रोलॅन्ट ओल्टमन्स यांनी पराभवानंतर व्यक्त केली. उकाडा आणि दमटपणा याचा कामगिरीवर विपरीत परिणाम झाला. आम्ही कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलो. येथे तापमान अधिक आहे; शिवाय मैदानावर पाण्याचे फवारे मारल्यानंतर उकाडा असह्य होतो. उकाड्यामुळे पेनल्टीवरदेखील परिणाम झाला. मैदानावर घसरण असल्यामुळे आमचे खेळाडू ‘परफेक्ट’ कामगिरीत मागे पडले, असे ओल्टमन्स यांचे मत होते.दुष्काळग्रस्तांसाठी हॉकी इंडियाचे दहा लाखनवी दिल्ली : महाराष्ट्रातील दुष्काळावर तीव्र चिंता व्यक्त करीत हॉकी इंडियाने दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निधीत दहा लाख रुपये दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना ही रक्कम लवकरच प्रदान करण्यात येणार आहे.