शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2016 06:40 IST

आशियाई स्पर्धेतील सुवर्ण पदकविजेता भारतीय संघ विश्वविजेता आॅस्ट्रेलियाचे आव्हान पार करू शकला नाही. आणि गुरुवारी एफआयएफ चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेच्या सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून

- इंग्लंड-बेल्जियम लढतीच्या निकालावर भवितव्य अवलंबून
 
लंडन : आशियाई स्पर्धेतील सुवर्ण पदकविजेता भारतीय संघ विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचे आव्हान पार करू शकला नाही. गुरुवारी झालेल्या एफआयएफ चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून २-४ ने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे भारताचे भवितव्य इंग्लंड-बेल्जियम लढतीच्या निकालावर अवलंबून आहे. 
ऑस्ट्रेलियाने मंगळवारी बेल्जियमला २-० ने पराभूत करत अंतिम सामन्यात स्थान मिळवले, तर भारताने अन्य आशियाई संघ दक्षिण कोरियाला २-१ ने पराभूत करीत अंतिम फेरीच्या आशा कायम ठेवल्या होत्या; मात्र अंतिम सामन्यात प्रवेशासाठी ऑस्ट्रेलियासोबत ड्रॉ खेळण्याची गरज होती; मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. 
या स्पर्धेत आतापर्यंत शानदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही़ ऑस्ट्रेलिया संघाने एका पाठोपाठ एक पेनल्टी कॉर्नर मिळविले. ज्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला, दुसरीकडे भारतीय संघाला ३ पेनल्टी कॉर्नर मिळूनसुद्धा त्याचा त्यांना उपयोग करून घेता आला नाही.
ऑस्ट्रेलिया संघाला पहिला पेनल्टी कॉर्नर १०व्या मिनिटाला मिळाला, परंतु कर्णधार श्रीजेशने चेंडू अडविला. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये १८, १९ आणि २०व्या मिनिटाला सलग पेनल्टी कॉर्नर मिळविले़ यावेळी सुद्धा श्रीजेशने २ पेनल्टी कॉर्नर अडविले व २०व्या मिनिटाच्या पेनल्टी कॉर्नरवर ट्रेंट मिटनने चेंडू गोलमध्ये टाकला. 
या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांतून १३ गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले, तर भारताच्या खात्यावर ७ गुण आहेत. इंग्लंडच्या खात्यावर ५ गुण असून, ते विजयासह अंतिम फेरी गाठू शकतात. जर बेल्जियम हा सामना जिंकल्यास भारताची गुणांची बरोबरी होईल आणि या परिस्थितीत गोलफरकामध्ये सरस असलेला संघ अंतिम फेरी गाठेल. मात्र ही लढत बरोबरीत सुटल्यास भारत थेट अंतिम फेरी गाठणार आहे. 
 
- ऑस्ट्रेलियाकडून ट्रेंट मिटन याने २० व्या, अरान जालेवस्की २३ व्या, फ्लाइन ओगिलवी ३५ व्या आणि ट्र्स्टिन व्हाइट याने ४५ व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. 
- भारताकडून व्ही. रघुनाथ याने ४५ व्या, तर ४९ व्या मिनिटाला मनदीप सिंह यांनी गोल केले.