शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाकला नमवत भारताने पटकावले हॉकीमधील सुवर्णपदक

By admin | Updated: October 2, 2014 18:01 IST

पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४ - २ ने नमवत भारताने आशियाई स्पर्धेत हॉकीमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे.

ऑनलाइन लोकमत 

इंचियोन, दि. २ -  पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४ - २ ने नमवत भारताने आशियाई स्पर्धेत हॉकीमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. आशियाई स्पर्धेत तब्बल १६ वर्षांनी भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावले असून या विजयासह भारताचे २०१६ मध्ये रिओ येथे होणा-या ऑलिंपिकचे तिकीटही कन्फर्म झाले आहे. 
आशियाई स्पर्धेत गुरुवारी हॉकीमध्ये भारतीय संघांची पाकिस्तानसोबत अंतिम लढत होती. आशियाई स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात भारत या पराभवाचा वचपा काढणार की पुन्हा पाकिस्तान विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. सामन्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानने पहिला गोल करुन भारतीय संघावर दबाव आणला. मात्र सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय संघाने हा दबाव झुगारुन पाकला चोख प्रत्युत्तर दिले. पहिल्याच हाफमध्ये भारतानेही गोल केला व सामन्यात बरोबरी साधली. यानंतर दुस-या हाफमध्ये दोन्ही संघाने गोल करण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र यात त्यांना अपयश आले. सामना १ -१ ने बरोबरीत संपल्यावर पेनल्टी शूट आऊटद्वारे सामन्याचा निकाल लागला. 
पेनल्टी शूट आऊटमध्ये भारताचा गोलकिपर श्रीजेशची भक्कम  तटबंदी मोडून काढण्यात पाकिस्तानच्या हॉकीपटूंना अपयश आले व भारताने पेनल्टी शूट आऊटमध्ये ४ -२ असा विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. भारताने तब्बल ३२ वर्षांनंतर आशियाई स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकला नमवले आहे. यापूर्वी १९८२ मध्ये आशियाई स्पर्धेतील फायनलमध्ये पाकने भारताचा ७ -१ असा दारुण पराभव केला होता. 
----------
रिलेमध्ये भारताच्या महिला संघाला सुवर्णपदक
४ बाय ४०० मीटरच्या रिलेमध्ये भारताच्या महिला संघाने सुवर्ण पदक पटकावले. गुरुवारी दोन सुवर्णपदक मिळाल्याने पदक तालिकेत भारत ११ व्या स्थानावरुन ९ व्या स्थानावर आला आहे. भारताच्या खात्यामध्ये ९ सुवर्ण, ९ रौप्य व ३५ कांस्य पदक आहेत.