शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

भारताची वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत धडक, न्यूझीलंडवर 186 धावांनी विजय

By admin | Updated: July 15, 2017 21:36 IST

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्यफेरी गाठण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 186 धावांनी विजय मिळवला.

 ऑनलाइन लोकमत 

डर्बी, दि. 15 - महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्यफेरी गाठण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 186 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव 79  धावात संपुष्टात आला.  न्यूझीलंड विरुद्धचा हा सामना भारतासाठी "करो या मरो" होता. राजेश्वरी गायकवाडने आठ षटकात 15 धावा देत न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. 
 
भारताने या विजयासह उपांत्यफेरी गाठली असून, उपांत्यफेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होईल.  न्यूझीलंडच्या सॅटरवेटचा (26) अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजीसमोर सपशेल नांगी टाकली. डीबी शर्माने दोन, झुलन गोस्वामी, पांडे आणि पूनम यादवने प्रत्येकी एक गडी बाद केला. 
 
तत्पूर्वी भारताने कर्णधार मिथाली राजचे शानदार शतक (109) आणि वेदा कृष्णमुर्तीची स्फोटक फलंदाजी (70) यांच्या बळावर न्यूझीलंडला विजयासाठी 266 धावांचे लक्ष्य दिले होते.या महत्वाच्या सामन्यात एस.मनधाना (13) आणि पूनम राऊत (4) यांची सलामीची जोडी अपयशी ठरली. 
 
त्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार मिथाली राजने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत एच. कौरच्या साथीने तिस-या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी केली. कौरने अर्धशतक फटकावताना (60) धावा केल्या. कौर बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या डीबी शर्माला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर मैदानात आलेल्या वेदा कृष्णमुर्तीने स्फोटक फलंदाजी केली. 45 चेंडूत (70) धावा फटकावल्या. तिच्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. 
 
आणखी वाचा 
मिताली राजने रचला इतिहास, सचिन-धोनीसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे
मराठमोळ्या पूनम राऊतचं शतक
तमीम इक्बालवर इंग्लंडमध्ये अॅसिड हल्ला, टुर्नामेंटमधून घेतली माघार
 
मिथालीसह तिने पाचव्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. वर्ल्डकपमध्ये खो-याने धावा काढणा-या मिथाली राजने 123 चेंडूत (109) धावांची शतकी खेळी केली. तिने 11 चौकार लगावले. सलग दोन पराभवांमुळे खचलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघापुढे महिला विश्वचषक क्रिकेटची उपांत्य फेरी गाठण्यासाठी आज शनिवारी न्यूझीलंडवर विजय नोंदविण्याचे आव्हान होते. 
 
गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी हा सामना जिंकावाच लागणार होता. पाठोपाठ चार विजय नोंदविल्यानंतर द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचे तोंड पहावे लागले होते. इंग्लंड, द. आफ्रिका तसेच गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने आधीच उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे.