शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

बांगलादेशला चिरडून भारत अंतिम फेरीत

By admin | Updated: June 16, 2017 00:09 IST

अपघाताने सेमीफायनलमध्ये पोहचलेला बांगलादेश आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार भारत यांच्यातील सामना तसा एकतर्फीच झाला

विश्वास चरणकर/आॅनलाइन लोकमत बर्मिंगहॅम, दि. 15 - अपघाताने सेमीफायनलमध्ये पोहचलेला बांगलादेश आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार भारत यांच्यातील सामना तसा एकतर्फीच झाला. भारताने चॅम्पियन्ससारखा खेळ करीत बांगलादेशला ९ विकेटसनी हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली. आता भारताचा महामुकाबला पाकिस्तानशी होणार असल्याने त्याची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे.भारत आणि बांगलादेश यांच्यातील उपांत्य सामना एकतर्फी होणार असे सर्वांनाच वाटत होतं. परंतु बांगलादेशाने एक झुंजार संघ म्हणून अलिकडच्या काळात आपली ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे हा संघ भारताला भिडेल अशी नकळत शंका वाटत होती. तशी संधी बांगलादेशला आलीही होती, परंतु पूर्णपणे व्यावसाईकपणा अंगात भिनलेल्या भारतीय संघाने आपला अनुभव पणाला लावत बांगलादेशकडून ती संधी हिरावून घेतली. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा विराटचा निर्णय भुवनेश्वरने सार्थ ठरवला. ढगाळ वातावरणाने त्यांना चांगली साथ दिली. सलामीवीर सौम्या सरकार आणि फटकेबाजीस उताविळ झालेल्या शब्बीरला तिशीच्या आतबाहेर बाद करुन बांगलादेशला धक्के दिले. जसप्रित बुमराहने टिच्चून मारा करताना फलंदाजांना फटकेबाजीचे स्वातंत्र्य दिले नाही. सलामीवीर तमिम इक्बाल आणि मशफिकुर रेहमानने काळाची पावले ओळखून सावध खेळी केली. मैदानावर पाय रोवण्यात ते यशस्वी झाले. भुवी-बुमराहचा स्पेल संपल्यावर त्यांनी आपल्या खेळाचा वेग वाढवला. दोघांनी जवळपास सहाच्या सरासरीने शतकी भागीदारी केली. २७व्या षटकांत संघाचे दीडशतक फलकावर लागल्याने बांगलादेश तिनशेचा आकडा पार करण्याची संधी मिळाली होती. पण भारताने चतुराईने त्यांच्याकडून ही संधी हिरावून घेतली. तमिम-मशफिकूरची जोडी डोकेदुखी ठरत आहे असे वाटत असताना विराटने आॅफस्पीनर केदार जाधवच्या हातात चेंडू सोपवला. केदारने तमिम (७0) आणि मशफिकुर (६१) यांना बाद करुन सामन्याच्या दोऱ्या भारतीयांच्या हातात सोपवल्या. तमिम-मशफिकूरची जोडी मैदानावर असतानाच बांगलादेशचे सामन्यात अस्तित्व दिसत होते. पण यानंतर भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व राखत त्यांना २६४ धावांत रोखले. भारतीय गोलंदाजांचे आज एका विशेष गोष्टीसाठी कौतुक करावे लागेल ते म्हणजे त्यांनी अतिशय नियोजनपूर्वक गोलंदाजी केली. बळी मिळत नाही म्हंटल्यावर त्यांनी गोलंदाजांच्या धावांना लगाम घातला. धावांची कोंडी झाल्यावर फलंदाज खराब फटका खेळतो आणि बाद होतो. शब्बीर रेहमानचा बळी हा त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. तो पॉवरप्लेचा फायदा घेत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न करीत होता. एक दोनदा तो यशस्वीही झाला, त्यावेळी गोलंदाजांनी आपली चाल बदलली. तो पुढे येणार हे गृहीत धरुन त्याच्यावर आखूड टप्प्याचा मारा केला. यामुळे बुमराह आणि भुवनेश्वरचे सलग आठ चेंडू डॉट घालवल्याने शब्बीरचा तोल ढासळला आणि नवव्या चेंडूवर तो जाळ्यात अडकला. आॅफस्टम्पच्या बाहेरील चेंडू त्याने पॉर्ईंटवरील जडेजाच्या हातात मारला, अन जडेजाने अलगद झेलला. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर बलाढ्य भारतीय फलंदाजांसाठी हे लक्ष्य तसे सामान्यच होते. त्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा हे सलामीवीर सेट झाले तर टार्गेट आणखीनच छोटे होते. शिखर-रोहित जोडीने जवळपास शतकाचा प्लॅटफॉर्म तयार केल्यावर विराटने त्यावर मजले चढविले. धवन या स्पर्धेत पहिल्यांदाच पन्नाशीच्या आत बाद झाला. पण पाकिस्तानविरुध्द धावचित झाल्याने हुकलेल्या शतकाची संधी रोहितने आज गमावली नाही. त्याने शतक तर साकारलेच शिवाय शेवटपर्यंत नाबाद रहात विजयाचा साक्षीदारही बनला. सामन्यात भारताचा विजय तर पक्का होताच पण तो निश्चित झाल्यावर उत्सुकता होती ती विराटच्या शतकाची. त्याच्या शतकाला चार धावा कमी पडल्यावर असे वाटत होते की, बांगलादेशला आणखी दहाबारा धावा काढू दिल्या असत्या तर बरे झाले असते. पण गमतीचा भाग सोडूया. भारताने चॅम्पियन्सप्रमाणे खेळ करीत पुन्हा चॅम्पियन्स बनण्याच्यादृष्टीने आणखी एक पाउल टाकले. आता गरज आहे ती केवळ एक धक्का देण्याची त्यासाठी रविवारची वाट पाहुया.