शहरं
Join us  
Trending Stories
1
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
6
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
7
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
8
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
9
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
10
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
11
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
12
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
13
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
14
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
15
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
16
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
17
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
18
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा

बांगलादेशला चिरडून भारत अंतिम फेरीत

By admin | Updated: June 16, 2017 00:09 IST

अपघाताने सेमीफायनलमध्ये पोहचलेला बांगलादेश आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार भारत यांच्यातील सामना तसा एकतर्फीच झाला

विश्वास चरणकर/आॅनलाइन लोकमत बर्मिंगहॅम, दि. 15 - अपघाताने सेमीफायनलमध्ये पोहचलेला बांगलादेश आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार भारत यांच्यातील सामना तसा एकतर्फीच झाला. भारताने चॅम्पियन्ससारखा खेळ करीत बांगलादेशला ९ विकेटसनी हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली. आता भारताचा महामुकाबला पाकिस्तानशी होणार असल्याने त्याची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे.भारत आणि बांगलादेश यांच्यातील उपांत्य सामना एकतर्फी होणार असे सर्वांनाच वाटत होतं. परंतु बांगलादेशाने एक झुंजार संघ म्हणून अलिकडच्या काळात आपली ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे हा संघ भारताला भिडेल अशी नकळत शंका वाटत होती. तशी संधी बांगलादेशला आलीही होती, परंतु पूर्णपणे व्यावसाईकपणा अंगात भिनलेल्या भारतीय संघाने आपला अनुभव पणाला लावत बांगलादेशकडून ती संधी हिरावून घेतली. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा विराटचा निर्णय भुवनेश्वरने सार्थ ठरवला. ढगाळ वातावरणाने त्यांना चांगली साथ दिली. सलामीवीर सौम्या सरकार आणि फटकेबाजीस उताविळ झालेल्या शब्बीरला तिशीच्या आतबाहेर बाद करुन बांगलादेशला धक्के दिले. जसप्रित बुमराहने टिच्चून मारा करताना फलंदाजांना फटकेबाजीचे स्वातंत्र्य दिले नाही. सलामीवीर तमिम इक्बाल आणि मशफिकुर रेहमानने काळाची पावले ओळखून सावध खेळी केली. मैदानावर पाय रोवण्यात ते यशस्वी झाले. भुवी-बुमराहचा स्पेल संपल्यावर त्यांनी आपल्या खेळाचा वेग वाढवला. दोघांनी जवळपास सहाच्या सरासरीने शतकी भागीदारी केली. २७व्या षटकांत संघाचे दीडशतक फलकावर लागल्याने बांगलादेश तिनशेचा आकडा पार करण्याची संधी मिळाली होती. पण भारताने चतुराईने त्यांच्याकडून ही संधी हिरावून घेतली. तमिम-मशफिकूरची जोडी डोकेदुखी ठरत आहे असे वाटत असताना विराटने आॅफस्पीनर केदार जाधवच्या हातात चेंडू सोपवला. केदारने तमिम (७0) आणि मशफिकुर (६१) यांना बाद करुन सामन्याच्या दोऱ्या भारतीयांच्या हातात सोपवल्या. तमिम-मशफिकूरची जोडी मैदानावर असतानाच बांगलादेशचे सामन्यात अस्तित्व दिसत होते. पण यानंतर भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व राखत त्यांना २६४ धावांत रोखले. भारतीय गोलंदाजांचे आज एका विशेष गोष्टीसाठी कौतुक करावे लागेल ते म्हणजे त्यांनी अतिशय नियोजनपूर्वक गोलंदाजी केली. बळी मिळत नाही म्हंटल्यावर त्यांनी गोलंदाजांच्या धावांना लगाम घातला. धावांची कोंडी झाल्यावर फलंदाज खराब फटका खेळतो आणि बाद होतो. शब्बीर रेहमानचा बळी हा त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. तो पॉवरप्लेचा फायदा घेत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न करीत होता. एक दोनदा तो यशस्वीही झाला, त्यावेळी गोलंदाजांनी आपली चाल बदलली. तो पुढे येणार हे गृहीत धरुन त्याच्यावर आखूड टप्प्याचा मारा केला. यामुळे बुमराह आणि भुवनेश्वरचे सलग आठ चेंडू डॉट घालवल्याने शब्बीरचा तोल ढासळला आणि नवव्या चेंडूवर तो जाळ्यात अडकला. आॅफस्टम्पच्या बाहेरील चेंडू त्याने पॉर्ईंटवरील जडेजाच्या हातात मारला, अन जडेजाने अलगद झेलला. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर बलाढ्य भारतीय फलंदाजांसाठी हे लक्ष्य तसे सामान्यच होते. त्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा हे सलामीवीर सेट झाले तर टार्गेट आणखीनच छोटे होते. शिखर-रोहित जोडीने जवळपास शतकाचा प्लॅटफॉर्म तयार केल्यावर विराटने त्यावर मजले चढविले. धवन या स्पर्धेत पहिल्यांदाच पन्नाशीच्या आत बाद झाला. पण पाकिस्तानविरुध्द धावचित झाल्याने हुकलेल्या शतकाची संधी रोहितने आज गमावली नाही. त्याने शतक तर साकारलेच शिवाय शेवटपर्यंत नाबाद रहात विजयाचा साक्षीदारही बनला. सामन्यात भारताचा विजय तर पक्का होताच पण तो निश्चित झाल्यावर उत्सुकता होती ती विराटच्या शतकाची. त्याच्या शतकाला चार धावा कमी पडल्यावर असे वाटत होते की, बांगलादेशला आणखी दहाबारा धावा काढू दिल्या असत्या तर बरे झाले असते. पण गमतीचा भाग सोडूया. भारताने चॅम्पियन्सप्रमाणे खेळ करीत पुन्हा चॅम्पियन्स बनण्याच्यादृष्टीने आणखी एक पाउल टाकले. आता गरज आहे ती केवळ एक धक्का देण्याची त्यासाठी रविवारची वाट पाहुया.