शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

भारताचा बांगलादेशवर ४५ धावांनी विजय

By admin | Updated: February 24, 2016 22:48 IST

आशिया चषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर ४५ धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला १६७ धावांचे आव्हान दिले होते

ऑनलाइन लोकमत
मिरपूर, दि. २४ -  आशिया चषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर ४५ धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या धडाकेबाज ८३ धावा आणि हार्दिक पांड्याच्या झटपट ३१ धावांच्या बळावर बांगलादेशसमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले होते.
 
 
भारतीय गोलंदाजानी अचूक टप्यावर गोलंदाजी करत भारताला ४५ धावांनी विजय मिळवून दिला. भारतातीय गोंलदाजापुढे बांगलादेश संघाला २० षटकात ७ गड्याच्या मोबदल्यात १२१ धावाच बनवता आल्या. भारतार्फे अनुभवी नेहराने बांगलादेशच्या ३ फलंदाजाला बाद केले तर बुमरा, अश्विन आणि पांड्याने एका फलंदाजाला बाद केले.
 
 
आशिया चषकातील पहिला सामना जिंकून भारताने आपली सुरवात विजयाने केली आहे पण २७ तारखेस भारताला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करावयाचा आहे.
 
 
दरम्यान, आशिया चषकाच्या सलामीच्या लढतीत बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं होत. खराब सुरवातीनंतर रोहित शर्मोच्या (८३) धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने १६६ धावापर्यंत मजल मारली व बांगलादेशसमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले आहे. रोहित (रो'हिट') शर्माने ५५ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने तुफानी ८३ धावा केल्या.  
 
 
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याने शेवटच्या हाणामारीच्या षटकात भारताला चांगली धावसंख्या जमवून दिली. पांड्याने १८ चेंडूत झटपट ३१ धावांचे योगदान दिले. त्यात त्याने ४ चौकार आणि एक षटकार लगावला.आशिया चषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय फलंदाजानी खराब सुरवात केली, सामना सुरु झाल्या नंतर दुसऱ्या षटकात सलामीवीर शिखर धवन वैयक्तिक २ धावावर बाद झाला. सुरेश रैना १३ धावावर बाद झाला. तर संघाच्या २२ धावा असताना धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला मशरफी मुर्तजाने ८ धावावर बाद केले. कर्णधार धोणीने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत २ चेंडूत नाबाद ८ धावा केल्या 
 
 
रोहित शर्माने युवराजच्या सोबत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला पण मोठा फटका मारण्याच्या नादात युवराज १५ धावावर बाद झाला आणि भारताला चौथा धक्का बसला. शेवटची षटके असल्यामुले धोणी आपल्या आधी हार्धिक पांड्याला बडती दिली. पांड्याने फटकेबाजी करताना १८ चेंडूत ३१ धावा केल्या 
 
भारतात होणाऱ्या आगामी  विश्व टी-२० स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धा वन-डे ऐवजी टी-२० फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणार आहेत .
 
प्रतिस्पर्धी संघ
भारत :-
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, आशिष नेहरा, आर. आश्विन, जसप्रीत बुमराह
बांगलादेशचा संघ : 
इमरुल कैस, सौम्या सरकार, सब्बीर रेहमान, महमदुल्ला, शकीब अल हसन, मुशफिकूर रहीम (यष्टिरक्षक), मशरफी मोर्तझा (कर्णधार), महंमद मिथून, अल अमीन होसेन, मुस्तफिझूर रेहमान, टस्किन अहमद.