शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

भारत-बांगलादेश सामना फिक्स

By admin | Updated: March 21, 2015 01:13 IST

विश्वचषकात गुरुवारी भारत-बांगलादेश ही उपांत्य लढत पूर्वनियोजित (फिक्स) होती खळबळजनक वक्तव्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बांगलादेशचे मुस्तफा कमाल यांनी केले आहे.

आयसीसी अध्यक्षांचा खळबळजनक आरोप : भारताला जिंकविण्यासाठी कटकारस्थानसिडनी : विश्वचषकात गुरुवारी भारत-बांगलादेश ही उपांत्य लढत पूर्वनियोजित (फिक्स) होती आणि भारताला जिंकता यावे असेच निर्णय पंचांनी दिल्याचे खळबळजनक वक्तव्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बांगलादेशचे मुस्तफा कमाल यांनी केले आहे.मेलबोर्न येथे झालेला हा सामना भारताने १०९ धावांनी जिंकला होता. या सामन्यात १३७ धावा ठोकणारा रोहित शर्मा ४० व्या षटकांत रुबेल हुसेनच्या चेंडूवर डिप मिडविकेटवर झेलबाद झाला. मात्र चेंडू कंबरेच्या वर असल्याने मैदानी पंच इयान ग्लाऊड यांनी तो ‘नो बॉल’ दिला होता. या निर्णयाविरोधात बांगलादेशात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.कमाल म्हणाले, ‘मी जे पाहिले त्यानुसार पंचांची कामगिरी खराब होती. अम्पायरिंग कुठल्याही दर्जाचे नव्हतेच. मनात पूर्वग्रह राखून दोन्ही पंच सामना खेळवत आहेत की काय असे दिसत होते. पंच चुका करू शकतात. त्यांची कृती हेतुपुरस्सर होती काय हे आयसीसी तपासणारच आहे. सर्व काही रेकॉर्डबद्ध आहे. आयसीसीला याचा तपास करावा लागेल, हे मी आयसीसी अध्यक्ष म्हणून नव्हे तर संघाचा चाहता म्हणून बोलत आहे.’ कमाल यांचे फिक्सिंगबाबतचे वक्तव्य हे आधारहीन तसेच पंचांच्या खराब कामगिरीवरील आरोप दुर्दैवी असल्याचे सांगून भारत-बांगला देश सामना फिक्स होता, हा आरोप आयसीसीने फेटाळला आहे. सीईओ डेव्ह रिचर्डसन म्हणाले,‘मुस्तफा कमाल यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. त्यांचे हे विधान खासगी असेल. आयसीसी अध्यक्ष या नात्याने पंचांच्या कामगिरीवर टीका करताना त्यांनी संयम बाळगला पाहिजे. पंचांच्या प्रामाणिकपणावर शंका घेण्याचे कारण नाही. ‘नो’ बॉलच्या निर्णयाचा कुणाला तरी लाभ होणारच पण खेळभावना सांगते की, पंचांच्या निर्णयाचा सन्मान व्हावा. भारताला जिंकविण्यासाठी मैदानी आणि तिसऱ्या पांचांनी एकतर्फी निर्णय घेतले असे म्हणणे सपशेल चुकीचे आणि दुर्दैवी आहे. आयसीसी कमाल यांचे विधान फेटाळून लावते.’कमाल म्हणाले, ‘मी जे पाहिले त्यानुसार पंचांची कामगिरी खराब होती. अम्पायरिंग कुठल्याही दर्जाचे नव्हतेच. मनात पूर्वग्रह राखून दोन्ही पंच सामना खेळवत आहेत की काय असे दिसत होते.- कमाल मुस्तफा,अध्यक्ष, आयसीसीपंचांविरोधात बीसीबी तक्रार करणारदरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने देखील मैदानी पंचांच्या विरोधात आयसीसीकडे पाठविण्यात येणाऱ्या अहवालात तक्रार करण्यात येईल, असे म्हटले आहे. बीसीबी अध्यक्ष नजमूल हसन म्हणाले, ‘आयसीसी अध्यक्ष कमाल यांच्यासोबत माझी चर्चा झाली. मैदानी पंचाविरुद्ध आयसीसीकडे जी काही दाद मागता येईल ती आम्ही मागणार आहोत.’