शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

भारत व दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांदरम्यान लढत आजपासून

By admin | Updated: August 17, 2015 22:47 IST

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेसाठी अनेक आघाडीचे खेळाडू राष्ट्रीय संघात सामील झाल्यानंतर अंबाती रायडूच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’च्या

वेनाड : श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेसाठी अनेक आघाडीचे खेळाडू राष्ट्रीय संघात सामील झाल्यानंतर अंबाती रायडूच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’च्या युवा संघापुढे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध मंगळवारपासून खेळल्या जाणाऱ्या पहिल्या चार दिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करण्याचे आव्हान आहे. युवा खेळाडूंना या लढतीच्या निमित्ताने निवड समिती सदस्यांचे लक्ष वेधण्याची संधी मिळाली आहे. अलीकडेच चेन्नईमध्ये आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघारिुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणाऱ्या भारत ‘अ’ संघातील कर्णधार चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल, अमित मिश्रा, वरुण अ‍ॅरोन आणि उमेश यादव श्रीलंका दौऱ्यावर आहेत. या खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारत ‘अ’ संघाची भिस्त कर्णधार रायडू, करण नायर, अभिनव मुकुंद, अंकुश बैस, बाबा अपराजित, अक्षर पटेल व कर्ण शर्मा यांच्यासारख्या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून आहे. उभय संघ तिरंगी वन-डे सामन्यांची मालिका खेळल्यानंतर येथे दाखल झाले आहेत. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघासाठी भारत दौऱ्याची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांचे १० खेळाडू अन्नातून विषबाधा झाल्यामुळे आजारी पडले होते. त्यांना मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी ११ खेळाडू तैनात करणेही अडचणीचे ठरले. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला क्षेत्ररक्षणासाठी त्यांचे संगणक विश्लेषक व भारताचा मनदीप सिंग यांची मदत घ्यावी लागली.दक्षिण आफ्रिका संघ या धक्क्यातून आता सावरला आहे. त्यांचे सर्व खेळाडू फिट आहेत. क्विंटन डीकॉकच्या समावेशामुळे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाची फलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. त्याने तिरंगी मालिकेत भारत ‘अ’ संघाविरुद्ध दोन्ही लढतींमध्ये शतकी खेळी केली. भारतीय गोलंदाजांपुढे त्याला रोखण्याचे आव्हान राहील. कर्णधार डीन एल्गर, दिनिश डी ब्रएन, रिजा हेंड्रिक्स व डॅन विलास प्रतिभावान फलंदाज आहेत. भारतीय फलंदाजीाबाबत विचार करता मधल्या फळीची भिस्त रायडूच्या कामगिरीवर अवलंबून आहे. झिम्बाब्वे दौऱ्यानंतर प्रथमच खेळत असलेल्या बडोद्याच्या या फलंदाजाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. रायडूव्यतिरिक्त मुकुंद बैस, जीवनज्योत सिंग, बाबा अपराजित, करुण नायर व विजय शंकर या युवा फलंदाजांकडूनही चमकदार कामगिरीची आशा आहे. गोलंदाजीमध्ये कर्ण शर्मा व अक्षर पटेल यांच्यासारखे अनुभवी फिरकीपटू आहेत, तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अभिमन्यू मिथुन, शार्दूल ठाकूर व ईश्वर पांडे यांच्यावर राहील. दक्षिण आफ्रिका संघ गोलंदाजी विभागाबाबत चिंतेत आहे. लोनवाबो त्सोत्सोबे, वायने पार्नेल, केशव महाराज व मतकोजिसी शेजी यांना तिरंगी मालिकेत छाप सोडण्यात अपयश आले. (वृत्तसंस्था)