शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

फायदा होत असेल, तर स्लेजिंग करणारच!

By admin | Updated: February 15, 2017 00:40 IST

माझ्या संघातील प्रत्येक खेळाडू त्याच्या मनाप्रमाणेच खेळ करेल. जर तो स्लेजिंग सारखे प्रकार करीत असेल आणि त्याचा फायदा संघाला होत असेल, तर

मुंबई : माझ्या संघातील प्रत्येक खेळाडू त्याच्या मनाप्रमाणेच खेळ करेल. जर तो स्लेजिंग सारखे प्रकार करीत असेल आणि त्याचा फायदा संघाला होत असेल, तर मी त्या खेळाडूला रोखणार नाही,’ असे स्पष्ट मत व्यक्त करताना आॅस्टे्रलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने भारतीय संघाला एकप्रकारे इशाराच दिला. विशेष म्हणजे, कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचे शिलेदारही ‘जसास तसे’ उत्तर देण्यात तरबेज असल्याने या मालिकेत क्रिकेटप्रेमींना मोठी मेजवानी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.क्रिकेटविश्वात स्लेजिंगद्वारे प्रतिस्पर्धी संघाचे मानसिक खच्चीकर करण्यासाठी प्रसिध्द असलेले आॅस्टे्रलियन्स भारत दौऱ्यावरही आपल्या या रणनितीसह खेळणार असल्याचे स्मिथने बोलून दाखवले. दखल घेण्याची बाब म्हणजे, भारत - आॅस्टे्रलियादरम्यान स्लेजिंगचे अनेक किस्से क्रिकेटविश्वात प्रसिध्द असून यातील हरभजन सिंग आणि अँड्रयू सायमंड्स यांच्यातील ‘मंकीगेट’ प्रकरण सर्वाधिक गाजले होते. भारत दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगताना स्मिथ म्हणाला की, ‘भारतात विजय मिळवणे संघातील खेळाडूंसाठी आयुष्यातील सर्वाधिक सुखद क्षण असेल. भारतात खेळणे अत्यंत आव्हानात्मक आहे. जर आम्ही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरलो, तर १०-२० वर्षांनी या यशाकडे आम्ही आयुष्यातील सर्वात सुखद क्षण म्हणून बघू. भारतात खेळण्याची ही शानदार संधी आहे. हा दौरा अत्यंत कठीण ठरेल आणि मी आव्हानाला सामोरे जाण्यास उत्सुक आहे,’ असेही स्मिथने सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)विराट कोहलीविरुद्ध आम्ही रणनिती आखली असून त्याबाबत सहाजिकच काही बोलणार नाही. तो जागतिक दर्जाचा खेळाडू असून चांगली फलंदाजी करीत आहे. त्याने मागील चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावले आहे. भारताचे अव्वल सहा फलंदाज खूप मजबूत असून त्यांना रोखण्यात आम्ही यशस्वी होऊ अशी अपेक्षा आहे. - स्टिव्ह स्मिथ, कर्णधार - ऑस्ट्रेलियाआमची तयारी चांगली झाली आहे. हा दौरा खूप रोमांचक होईल. भारतीय संघ खूप चांगला असून त्यांच्याकडे अनेक चांगले वेगवान व फिरकी गोलंदाज आहेत. त्यांनी स्वदेशामध्ये गेल्या २० कसोटींपैकी एकही कसोटी गमावलेली नाही आणि त्यांचा संघ खूप मजबूत असल्याची आम्हाला कल्पना आहे. - डॅरेन लेहमन, प्रशिक्षक - ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाने २००४-०५ साली भारताला २-१ असे नमवल्यानंतर भारतीय भूमीवर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. ब्रेबॉर्न स्टेडियमवर १६ - १८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या तीनदिवसीय सराव सामन्याद्वारे आॅस्टे्रलिया संघ भारतीय दौऱ्याची सुरुवात करेल. च्२०१२ साली इंग्लंडकडून घरच्या मैदानावर मालिका गमावल्यानंतर भारताने आपल्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही. भारताने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध सहज वर्चस्व राखले.