शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

फायदा होत असेल, तर स्लेजिंग करणारच!

By admin | Updated: February 15, 2017 00:40 IST

माझ्या संघातील प्रत्येक खेळाडू त्याच्या मनाप्रमाणेच खेळ करेल. जर तो स्लेजिंग सारखे प्रकार करीत असेल आणि त्याचा फायदा संघाला होत असेल, तर

मुंबई : माझ्या संघातील प्रत्येक खेळाडू त्याच्या मनाप्रमाणेच खेळ करेल. जर तो स्लेजिंग सारखे प्रकार करीत असेल आणि त्याचा फायदा संघाला होत असेल, तर मी त्या खेळाडूला रोखणार नाही,’ असे स्पष्ट मत व्यक्त करताना आॅस्टे्रलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने भारतीय संघाला एकप्रकारे इशाराच दिला. विशेष म्हणजे, कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचे शिलेदारही ‘जसास तसे’ उत्तर देण्यात तरबेज असल्याने या मालिकेत क्रिकेटप्रेमींना मोठी मेजवानी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.क्रिकेटविश्वात स्लेजिंगद्वारे प्रतिस्पर्धी संघाचे मानसिक खच्चीकर करण्यासाठी प्रसिध्द असलेले आॅस्टे्रलियन्स भारत दौऱ्यावरही आपल्या या रणनितीसह खेळणार असल्याचे स्मिथने बोलून दाखवले. दखल घेण्याची बाब म्हणजे, भारत - आॅस्टे्रलियादरम्यान स्लेजिंगचे अनेक किस्से क्रिकेटविश्वात प्रसिध्द असून यातील हरभजन सिंग आणि अँड्रयू सायमंड्स यांच्यातील ‘मंकीगेट’ प्रकरण सर्वाधिक गाजले होते. भारत दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगताना स्मिथ म्हणाला की, ‘भारतात विजय मिळवणे संघातील खेळाडूंसाठी आयुष्यातील सर्वाधिक सुखद क्षण असेल. भारतात खेळणे अत्यंत आव्हानात्मक आहे. जर आम्ही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरलो, तर १०-२० वर्षांनी या यशाकडे आम्ही आयुष्यातील सर्वात सुखद क्षण म्हणून बघू. भारतात खेळण्याची ही शानदार संधी आहे. हा दौरा अत्यंत कठीण ठरेल आणि मी आव्हानाला सामोरे जाण्यास उत्सुक आहे,’ असेही स्मिथने सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)विराट कोहलीविरुद्ध आम्ही रणनिती आखली असून त्याबाबत सहाजिकच काही बोलणार नाही. तो जागतिक दर्जाचा खेळाडू असून चांगली फलंदाजी करीत आहे. त्याने मागील चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावले आहे. भारताचे अव्वल सहा फलंदाज खूप मजबूत असून त्यांना रोखण्यात आम्ही यशस्वी होऊ अशी अपेक्षा आहे. - स्टिव्ह स्मिथ, कर्णधार - ऑस्ट्रेलियाआमची तयारी चांगली झाली आहे. हा दौरा खूप रोमांचक होईल. भारतीय संघ खूप चांगला असून त्यांच्याकडे अनेक चांगले वेगवान व फिरकी गोलंदाज आहेत. त्यांनी स्वदेशामध्ये गेल्या २० कसोटींपैकी एकही कसोटी गमावलेली नाही आणि त्यांचा संघ खूप मजबूत असल्याची आम्हाला कल्पना आहे. - डॅरेन लेहमन, प्रशिक्षक - ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाने २००४-०५ साली भारताला २-१ असे नमवल्यानंतर भारतीय भूमीवर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. ब्रेबॉर्न स्टेडियमवर १६ - १८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या तीनदिवसीय सराव सामन्याद्वारे आॅस्टे्रलिया संघ भारतीय दौऱ्याची सुरुवात करेल. च्२०१२ साली इंग्लंडकडून घरच्या मैदानावर मालिका गमावल्यानंतर भारताने आपल्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही. भारताने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध सहज वर्चस्व राखले.