शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

फायदा होत असेल, तर स्लेजिंग करणारच!

By admin | Updated: February 15, 2017 00:40 IST

माझ्या संघातील प्रत्येक खेळाडू त्याच्या मनाप्रमाणेच खेळ करेल. जर तो स्लेजिंग सारखे प्रकार करीत असेल आणि त्याचा फायदा संघाला होत असेल, तर

मुंबई : माझ्या संघातील प्रत्येक खेळाडू त्याच्या मनाप्रमाणेच खेळ करेल. जर तो स्लेजिंग सारखे प्रकार करीत असेल आणि त्याचा फायदा संघाला होत असेल, तर मी त्या खेळाडूला रोखणार नाही,’ असे स्पष्ट मत व्यक्त करताना आॅस्टे्रलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने भारतीय संघाला एकप्रकारे इशाराच दिला. विशेष म्हणजे, कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचे शिलेदारही ‘जसास तसे’ उत्तर देण्यात तरबेज असल्याने या मालिकेत क्रिकेटप्रेमींना मोठी मेजवानी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.क्रिकेटविश्वात स्लेजिंगद्वारे प्रतिस्पर्धी संघाचे मानसिक खच्चीकर करण्यासाठी प्रसिध्द असलेले आॅस्टे्रलियन्स भारत दौऱ्यावरही आपल्या या रणनितीसह खेळणार असल्याचे स्मिथने बोलून दाखवले. दखल घेण्याची बाब म्हणजे, भारत - आॅस्टे्रलियादरम्यान स्लेजिंगचे अनेक किस्से क्रिकेटविश्वात प्रसिध्द असून यातील हरभजन सिंग आणि अँड्रयू सायमंड्स यांच्यातील ‘मंकीगेट’ प्रकरण सर्वाधिक गाजले होते. भारत दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगताना स्मिथ म्हणाला की, ‘भारतात विजय मिळवणे संघातील खेळाडूंसाठी आयुष्यातील सर्वाधिक सुखद क्षण असेल. भारतात खेळणे अत्यंत आव्हानात्मक आहे. जर आम्ही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरलो, तर १०-२० वर्षांनी या यशाकडे आम्ही आयुष्यातील सर्वात सुखद क्षण म्हणून बघू. भारतात खेळण्याची ही शानदार संधी आहे. हा दौरा अत्यंत कठीण ठरेल आणि मी आव्हानाला सामोरे जाण्यास उत्सुक आहे,’ असेही स्मिथने सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)विराट कोहलीविरुद्ध आम्ही रणनिती आखली असून त्याबाबत सहाजिकच काही बोलणार नाही. तो जागतिक दर्जाचा खेळाडू असून चांगली फलंदाजी करीत आहे. त्याने मागील चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावले आहे. भारताचे अव्वल सहा फलंदाज खूप मजबूत असून त्यांना रोखण्यात आम्ही यशस्वी होऊ अशी अपेक्षा आहे. - स्टिव्ह स्मिथ, कर्णधार - ऑस्ट्रेलियाआमची तयारी चांगली झाली आहे. हा दौरा खूप रोमांचक होईल. भारतीय संघ खूप चांगला असून त्यांच्याकडे अनेक चांगले वेगवान व फिरकी गोलंदाज आहेत. त्यांनी स्वदेशामध्ये गेल्या २० कसोटींपैकी एकही कसोटी गमावलेली नाही आणि त्यांचा संघ खूप मजबूत असल्याची आम्हाला कल्पना आहे. - डॅरेन लेहमन, प्रशिक्षक - ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाने २००४-०५ साली भारताला २-१ असे नमवल्यानंतर भारतीय भूमीवर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. ब्रेबॉर्न स्टेडियमवर १६ - १८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या तीनदिवसीय सराव सामन्याद्वारे आॅस्टे्रलिया संघ भारतीय दौऱ्याची सुरुवात करेल. च्२०१२ साली इंग्लंडकडून घरच्या मैदानावर मालिका गमावल्यानंतर भारताने आपल्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही. भारताने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध सहज वर्चस्व राखले.