शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कामगिरी सुधारल्यास आगामी स्पर्धांमध्ये पदक माझेच असेल - मीराबाई चानू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 21:05 IST

दुखापतीतून सावरली असून पुनरागमनासाठी सज्ज

ठळक मुद्देजागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मीराबाईने १९४ किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले होते.  

मुंबई : पाठदुखीतून मी आता सावरली असून पुनरागमनासाठी सज्ज आहे. माझ्या कामगिरीत सुधारणा करुन २१० किलो पर्यंत वजन उचलण्यात यशस्वी ठरले, तर आगामी स्पर्धांमध्ये पदक माझेच असेल,’ असा विश्वास ‘खेलरत्न’ भारोत्तलक मीराबाई चानू हिने व्यक्त केला. मुंबईत शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये मीराबाईने आपला विश्वास व्यक्त केला. यावेळी युवा धावपटू हिमा दास, मुंबईकर नेमबाज हिना सिध्दू आणि महिला हॉकीपटू राणी रामपाल यांचीही उपस्थिती होती. दुखापतीनंतर आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सज्ज असलेल्या मीराबाईने म्हटले की, ‘रिओ आॅलिम्पिकनंतर मी माझा सराव बदलला आहे. आता मी दिवसातून तीन सत्रांमध्ये सराव करते. याआधी मी दोन सत्रांत सराव करायची. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मी १९४ किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले होते.  यानंतर राष्ट्रकुल खेळांमध्ये मी एकूण १९६ किलो वजन उचलले होते. आता खेळातील बदललेल्या नियमानुसार मला यात आणखी सुधारणा करावी लागेल. याआधी मी ४८ किलो गटात खेळायची आता मी ४९ किलो गटात खेळणार आहे. या गटात जर मी २१० किलो वजन उचलण्यात यशस्वी ठरले तर प्रत्येक स्पर्धेत पदक जिंकण्यात मला यश येईल.’ दुखापतीविषयी मीराबाई म्हणाली की, ‘पाठदुखीमुळे मी आशियाई स्पर्धेत सहभगी झाली नव्हती. पण आता मी तंदुरुस्त असून एक आठवड्यापासून सराव करत आहे. नोव्हेंबरमध्ये होणाºया जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये खेळणार नाही. पण २०१९मध्ये होणाºया प्रत्येक स्पर्धेत मी खेळेल. जागतिक नियमांनुसार आॅलिम्पिक पात्रतेसाठी आम्हाला एकूण ९ स्पर्धांमध्ये खेळायचे आहे. माझ्याकडे अजून ६ स्पर्धांत खेळण्याची संधी आहे. यातून मला आॅलिम्पिक पात्रता मिळवायाची आहे.’ त्याचप्रमाणे, ‘अजूनही मुंबईत माझ्यावर हलके उपचार सुरु आहेत. मला आशियाई व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला मुकण्याचे दु:ख आहे, पण पुढील स्पर्धांसाठी मी सज्ज आहे,’ असेही मीराबाईने यावेळी म्हटले. 

भारताची धावपटू हिमा दास म्हणाली की, ''जागतिक युवा स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर माझे पूर्ण आयुष्य बदलले असून लोकांचा माझ्यावर विश्वास बसू लागला आहे. आता आगामी स्पर्धांमध्ये नक्कीच आव्हान असतील, पण त्यासाठी मी मेहनत घेत असून खूप चांगल्याप्रकारे सज्ज व्हावे लागेल. मी सर्वच महिला खेळाडूंना सांगू इच्छिते की, आधी स्वत:हून पुढे या. खेळाच्या मार्गावर खूप चांगले लोक भेटतील त्यांच्या मदतीने तुम्ही यशस्वी होऊ शकता. चांगली कामगिरी केल्यानंतर चांगले प्रायोजकही मिळतील.''

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानू