शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

कामगिरी सुधारल्यास आगामी स्पर्धांमध्ये पदक माझेच असेल - मीराबाई चानू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 21:05 IST

दुखापतीतून सावरली असून पुनरागमनासाठी सज्ज

ठळक मुद्देजागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मीराबाईने १९४ किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले होते.  

मुंबई : पाठदुखीतून मी आता सावरली असून पुनरागमनासाठी सज्ज आहे. माझ्या कामगिरीत सुधारणा करुन २१० किलो पर्यंत वजन उचलण्यात यशस्वी ठरले, तर आगामी स्पर्धांमध्ये पदक माझेच असेल,’ असा विश्वास ‘खेलरत्न’ भारोत्तलक मीराबाई चानू हिने व्यक्त केला. मुंबईत शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये मीराबाईने आपला विश्वास व्यक्त केला. यावेळी युवा धावपटू हिमा दास, मुंबईकर नेमबाज हिना सिध्दू आणि महिला हॉकीपटू राणी रामपाल यांचीही उपस्थिती होती. दुखापतीनंतर आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सज्ज असलेल्या मीराबाईने म्हटले की, ‘रिओ आॅलिम्पिकनंतर मी माझा सराव बदलला आहे. आता मी दिवसातून तीन सत्रांमध्ये सराव करते. याआधी मी दोन सत्रांत सराव करायची. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मी १९४ किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले होते.  यानंतर राष्ट्रकुल खेळांमध्ये मी एकूण १९६ किलो वजन उचलले होते. आता खेळातील बदललेल्या नियमानुसार मला यात आणखी सुधारणा करावी लागेल. याआधी मी ४८ किलो गटात खेळायची आता मी ४९ किलो गटात खेळणार आहे. या गटात जर मी २१० किलो वजन उचलण्यात यशस्वी ठरले तर प्रत्येक स्पर्धेत पदक जिंकण्यात मला यश येईल.’ दुखापतीविषयी मीराबाई म्हणाली की, ‘पाठदुखीमुळे मी आशियाई स्पर्धेत सहभगी झाली नव्हती. पण आता मी तंदुरुस्त असून एक आठवड्यापासून सराव करत आहे. नोव्हेंबरमध्ये होणाºया जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये खेळणार नाही. पण २०१९मध्ये होणाºया प्रत्येक स्पर्धेत मी खेळेल. जागतिक नियमांनुसार आॅलिम्पिक पात्रतेसाठी आम्हाला एकूण ९ स्पर्धांमध्ये खेळायचे आहे. माझ्याकडे अजून ६ स्पर्धांत खेळण्याची संधी आहे. यातून मला आॅलिम्पिक पात्रता मिळवायाची आहे.’ त्याचप्रमाणे, ‘अजूनही मुंबईत माझ्यावर हलके उपचार सुरु आहेत. मला आशियाई व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला मुकण्याचे दु:ख आहे, पण पुढील स्पर्धांसाठी मी सज्ज आहे,’ असेही मीराबाईने यावेळी म्हटले. 

भारताची धावपटू हिमा दास म्हणाली की, ''जागतिक युवा स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर माझे पूर्ण आयुष्य बदलले असून लोकांचा माझ्यावर विश्वास बसू लागला आहे. आता आगामी स्पर्धांमध्ये नक्कीच आव्हान असतील, पण त्यासाठी मी मेहनत घेत असून खूप चांगल्याप्रकारे सज्ज व्हावे लागेल. मी सर्वच महिला खेळाडूंना सांगू इच्छिते की, आधी स्वत:हून पुढे या. खेळाच्या मार्गावर खूप चांगले लोक भेटतील त्यांच्या मदतीने तुम्ही यशस्वी होऊ शकता. चांगली कामगिरी केल्यानंतर चांगले प्रायोजकही मिळतील.''

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानू