शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

कामगिरी सुधारल्यास आगामी स्पर्धांमध्ये पदक माझेच असेल - मीराबाई चानू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 21:05 IST

दुखापतीतून सावरली असून पुनरागमनासाठी सज्ज

ठळक मुद्देजागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मीराबाईने १९४ किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले होते.  

मुंबई : पाठदुखीतून मी आता सावरली असून पुनरागमनासाठी सज्ज आहे. माझ्या कामगिरीत सुधारणा करुन २१० किलो पर्यंत वजन उचलण्यात यशस्वी ठरले, तर आगामी स्पर्धांमध्ये पदक माझेच असेल,’ असा विश्वास ‘खेलरत्न’ भारोत्तलक मीराबाई चानू हिने व्यक्त केला. मुंबईत शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये मीराबाईने आपला विश्वास व्यक्त केला. यावेळी युवा धावपटू हिमा दास, मुंबईकर नेमबाज हिना सिध्दू आणि महिला हॉकीपटू राणी रामपाल यांचीही उपस्थिती होती. दुखापतीनंतर आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सज्ज असलेल्या मीराबाईने म्हटले की, ‘रिओ आॅलिम्पिकनंतर मी माझा सराव बदलला आहे. आता मी दिवसातून तीन सत्रांमध्ये सराव करते. याआधी मी दोन सत्रांत सराव करायची. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मी १९४ किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले होते.  यानंतर राष्ट्रकुल खेळांमध्ये मी एकूण १९६ किलो वजन उचलले होते. आता खेळातील बदललेल्या नियमानुसार मला यात आणखी सुधारणा करावी लागेल. याआधी मी ४८ किलो गटात खेळायची आता मी ४९ किलो गटात खेळणार आहे. या गटात जर मी २१० किलो वजन उचलण्यात यशस्वी ठरले तर प्रत्येक स्पर्धेत पदक जिंकण्यात मला यश येईल.’ दुखापतीविषयी मीराबाई म्हणाली की, ‘पाठदुखीमुळे मी आशियाई स्पर्धेत सहभगी झाली नव्हती. पण आता मी तंदुरुस्त असून एक आठवड्यापासून सराव करत आहे. नोव्हेंबरमध्ये होणाºया जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये खेळणार नाही. पण २०१९मध्ये होणाºया प्रत्येक स्पर्धेत मी खेळेल. जागतिक नियमांनुसार आॅलिम्पिक पात्रतेसाठी आम्हाला एकूण ९ स्पर्धांमध्ये खेळायचे आहे. माझ्याकडे अजून ६ स्पर्धांत खेळण्याची संधी आहे. यातून मला आॅलिम्पिक पात्रता मिळवायाची आहे.’ त्याचप्रमाणे, ‘अजूनही मुंबईत माझ्यावर हलके उपचार सुरु आहेत. मला आशियाई व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला मुकण्याचे दु:ख आहे, पण पुढील स्पर्धांसाठी मी सज्ज आहे,’ असेही मीराबाईने यावेळी म्हटले. 

भारताची धावपटू हिमा दास म्हणाली की, ''जागतिक युवा स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर माझे पूर्ण आयुष्य बदलले असून लोकांचा माझ्यावर विश्वास बसू लागला आहे. आता आगामी स्पर्धांमध्ये नक्कीच आव्हान असतील, पण त्यासाठी मी मेहनत घेत असून खूप चांगल्याप्रकारे सज्ज व्हावे लागेल. मी सर्वच महिला खेळाडूंना सांगू इच्छिते की, आधी स्वत:हून पुढे या. खेळाच्या मार्गावर खूप चांगले लोक भेटतील त्यांच्या मदतीने तुम्ही यशस्वी होऊ शकता. चांगली कामगिरी केल्यानंतर चांगले प्रायोजकही मिळतील.''

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानू