शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

सामना अनिर्णीत कसा राखायचा याची माहिती आहे

By admin | Updated: November 15, 2016 01:13 IST

टीकाकार आता आम्हाला लक्ष्य करू शकत नाहीत, कारण कसोटी सामना अनिर्णीत कसा राखायचा हे आम्हाला कळाले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली

राजकोट : टीकाकार आता आम्हाला लक्ष्य करू शकत नाहीत, कारण कसोटी सामना अनिर्णीत कसा राखायचा हे आम्हाला कळाले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केली. इंग्लंडविरुद्ध रविवारी पहिला कसोटी सामना अनिर्णीत झाल्यानंतर तो बोलत होता. विराट म्हणाला, ‘‘सामना बरोबरीत कसा सोडवायचा, हे आम्हाला कळाले आहे. यापूर्वी बऱ्याच लोकांना आमच्याबाबत साशंकता असेल. कारण आम्ही सामने जिंकले आहेत किंवा गमावले आहेत.’’विराट पुढे म्हणाला, ‘‘मी जडेजाला सांगितले, की आपल्याकडे आपली कामगिरी सुधारण्याची ही चांगली संधी आहे. भविष्यात आपल्याला अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे सामना कसा अनिर्णीत राखायचा, हे आम्हाला कळाले आहे. अशा स्थितीत कसे खेळायचे, याची कल्पना आलेली आहे. या लढतीतून बरेच काही शिकायला मिळाले. दडपणाखाली असताना परिस्थितीनुरूप खेळ करणे आवश्यक असते.’’विराटने जडेजाव्यतिरिक्त आश्विनचीही प्रशंसा केली. आश्विनने पहिल्या डावात ७० धावा फटकावल्या होत्या. विराट म्हणाला, ‘‘आश्विन व जडेजा यांच्या चमकदार फलंदाजीमुळे आम्हाला अडचणीच्या स्थितीतून सावरता आले.’’भारतीय फिरकीपटूंच्या तुलनेत पाहुण्या संघाच्या फिरकीपटूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली. याबाबत विराट म्हणाला, ‘‘मला तसे वाटत नाही. त्यांनी चांगली गोलंदाजी केली; पण आमच्या फिरकीपटूंना पिछाडीवर सोडले, असे वाटत नाही. त्यांनी चार-पाच बळी घेऊन सामन्याला कलाटणी दिली, असे घडले नाही. जर त्यांनी आमच्या फिरकीपटूंच्या तुलनेत चांगली कामगिरी केली असती, तर त्यांनी सामना जिंकला असता.’’ (वृत्तसंस्था)