शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

... त्या घटनेचा मला खेद वाटतो : गावस्कर

By admin | Updated: December 28, 2014 01:00 IST

तीन दशकानंतर माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी विरोध व्यक्त करण्याच्या प्रकारावर खेद व्यक्त करताना माझ्याकडून मोठी चूक झाल्याचे म्हटले आहे.

मेलबोर्न : मेलबोर्न क्रिकेट मैदानावरील बहुचर्चित घटनेच्या जवळजवळ तीन दशकानंतर माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी विरोध व्यक्त करण्याच्या प्रकारावर खेद व्यक्त करताना माझ्याकडून मोठी चूक झाल्याचे म्हटले आहे.भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान १९८१ मध्ये खेळल्या गेलेली मालिका खराब अंपायरिंगमुळे गाजली. डेनिस लिलीच्या इनकटरवर आपल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पंचाची भूमिका बजाविणाऱ्या रेक्स वाइटहेडने गावस्कर यांना पायचित दिले होते. गावस्कर यांच्या मते चेंडू बॅटला चाटून पॅडवर लागला होता. गावस्कर यांनी खेळपट्टी न सोडता विरोध दर्शविला. पंचाबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी गावस्करने बॅट आपल्या पॅडवर आपटली. गावस्कर ज्यावेळी पॅव्हेलियनमध्ये परतत होता त्यावेळी लिली याने टिपणी केल्यामुळे वाद निर्माण झाला, असे त्यावेळी प्रसारमाध्यमांतील वृत्तांमध्ये म्हटले आहे. गावस्कर माघारी फिरला व त्याचा सलामीचा सहकारी चेतन चौहानला खेळपट्टी सोडण्यास सांगितले. चौहान यांनी कर्णधारचा आदेश पाळताना खेळपट्टी सोडली, पण सीमारेषेवर संघाचे व्यवस्थापक शाहिद दुर्रानी आणि सहायक व्यवस्थापक बापू नाडकर्णी यांनी त्यांना रोखले. चौहान डाव पुढे सुरू करण्यासाठी खेळपट्टीकडे गेले तर गावस्कर पॅव्हेलियनकडे परतले. तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान शनिवारी दुसऱ्या दिवशी चहापानासाठी खेळ थांबला असताना संजय मांजरेकर व कपिल देव यांच्यासोबत कार्यक्रमात सहभागी झालेले गावस्कर म्हणाले,‘मला त्या निर्णयाचा खेद वाटतो. माझ्याकडून घडलेली ती मोठी चूक होती.भारतीय संघाचा कर्णधार म्हणून माझे वर्तन अयोग्य होते. मी कुठल्याही प्रकारे हे वर्तन योग्य असल्याचे सिद्ध करू शकत नाही. मी बाद होतो किंवा नाही, पण माझे वर्तन चुकीचे होते.’गावस्कर पुढे म्हणाले,‘आजच्या काळात अशी घटना घडली असती तर माझ्यावर दंड ठोठावण्यात आला असता.’ कपिल त्यावेळी युवा होता. त्याचा तो केवळ दुसरा विदेश दौरा होता. कपिलने २८ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव ८३ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे भारताला तीन कसोटी सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत सोडविता आली. याबाबत बोलताना कपिल म्हणाला,‘त्यावेळी संघ गावस्कर यांच्यासोबत होता.’कपिल म्हणाला,‘त्यावेळी मी युवा होतो. त्यामुळे प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या स्थितीत नव्हतो. पण, एक बाब मात्र स्पष्ट करतो की, त्यावेळी आम्ही सर्व आपल्या कर्णधारासोबत होतो. कर्णधार चूक आहे किंवा बरोबर याचा आम्ही विचार करीत नव्हतो तर आम्ही आमच्या कर्णधाराला साथ देत होतो. गावस्कर आता येथे बसून त्यावेळी चूक झाल्याचे कबूल करू शकतात, पण त्यावेळी मात्र आम्ही त्यांच्यासोबत होतो.’ (वृत्तसंस्था)