शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

यजमानांना पूरक खेळपट्टी हवीच!

By admin | Updated: November 5, 2015 02:28 IST

रवी शास्त्री यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. यजमान संघाला अनुकूल खेळपट्टी मिळायलाच हवी. या संदर्भात शास्त्रींचे वक्तव्य सहजरीत्या सकारात्मक घेतले जावे. क्षमतेनुरूप खेळण्यासाठी

वसीम अक्रम लिहितो़...रवी शास्त्री यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. यजमान संघाला अनुकूल खेळपट्टी मिळायलाच हवी. या संदर्भात शास्त्रींचे वक्तव्य सहजरीत्या सकारात्मक घेतले जावे. क्षमतेनुरूप खेळण्यासाठी घरच्या खेळपट्टीचा लाभ यजमान संघाला मिळायलाच हवा. तथापि, खेळपट्टी ही खूप वळण घेणारी नसावी. ती थोडी टणक आणि फिरकीला अनुकूल असावी. मी मुंबईसारख्या ‘पाटा’ खेळपट्टीबाबत बोलणार नाही. तेथे आफ्रिकेने ४०० पेक्षा अधिक धावा ठोकल्या. जेव्हा घरच्या मैदानावर खेळतो, तेव्हा यजमान संघाची मागणी समजण्यासारखीच असते. शास्त्री संघाचे संचालक असल्याने त्यांची मागणी यथोचित आहेच. मनाप्रमाणे खेळपट्टी मागितल्याबद्दल शास्त्रीवर टीका झाली, हे मला माहिती आहे. जेव्हा आम्ही द. आफ्रिका किंवा आॅस्ट्रेलियाचा दौरा करतो, तेव्हा हिरव्यागार खेळपट्ट्या मिळतात. तेथे चेंडू फार कमी वळण घेतात. मग घरच्या मैदानावर आम्हाला आमच्या मनाप्रमाणे का नको? शास्त्री यांनी यजमान संघाला अनुकूल खेळपट्टी मागताच ‘हाय तोबा’ सुरू झाले आहे.वन डे मालिकेत भारताला आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. कसोटी क्रिकेट हा वेगळाच प्रकार आहे. अखेरच्या वन डेचा अपवाद वगळता उर्वरित चारही सामन्यांत भारत चांंगलाच खेळला. सामान्यपणे मोहालीच्या खेळपट्टीवर गवत असते. यामुळे चेंडू चौथ्या आणि पाचव्या दिवशी ‘टर्न’ होतो. माझ्या मते ही आदर्श खेळपट्टी असेल.द. आफ्रिका बलाढ्य संघ आहे. या संघाकडे ताशी १४० किमी वेगाने गोलंदाजी करणारे खेळाडू आहेत. या गोलंदाजांपुढे भारतीयांची खरी परीक्षा असेल. हे पाहता, उमेश यादव तसेच वरुण अ‍ॅरोन यांनी योग्य लय आणि वेग राखून मारा करायला हवा. असे घडल्यास आफ्रिकेच्या फलंदाजांवर जरब बसविणे सोपे होईल. ईशांतचे निलंबन भारतीय गोलंदाजी माऱ्याला धक्का बसण्यासारखे आहे. आश्विनने पूर्णपणे फिट झाल्यानंतरच मैदानात यावे, असा त्याला माझा मोलाचा सल्ला असेल. विराटसाठी कर्णधार या नात्याने ही मालिका अत्यधिक महत्त्वाची ठरावी. (टीसीएम)