शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

यजमानांना पूरक खेळपट्टी हवीच!

By admin | Updated: November 5, 2015 02:28 IST

रवी शास्त्री यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. यजमान संघाला अनुकूल खेळपट्टी मिळायलाच हवी. या संदर्भात शास्त्रींचे वक्तव्य सहजरीत्या सकारात्मक घेतले जावे. क्षमतेनुरूप खेळण्यासाठी

वसीम अक्रम लिहितो़...रवी शास्त्री यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. यजमान संघाला अनुकूल खेळपट्टी मिळायलाच हवी. या संदर्भात शास्त्रींचे वक्तव्य सहजरीत्या सकारात्मक घेतले जावे. क्षमतेनुरूप खेळण्यासाठी घरच्या खेळपट्टीचा लाभ यजमान संघाला मिळायलाच हवा. तथापि, खेळपट्टी ही खूप वळण घेणारी नसावी. ती थोडी टणक आणि फिरकीला अनुकूल असावी. मी मुंबईसारख्या ‘पाटा’ खेळपट्टीबाबत बोलणार नाही. तेथे आफ्रिकेने ४०० पेक्षा अधिक धावा ठोकल्या. जेव्हा घरच्या मैदानावर खेळतो, तेव्हा यजमान संघाची मागणी समजण्यासारखीच असते. शास्त्री संघाचे संचालक असल्याने त्यांची मागणी यथोचित आहेच. मनाप्रमाणे खेळपट्टी मागितल्याबद्दल शास्त्रीवर टीका झाली, हे मला माहिती आहे. जेव्हा आम्ही द. आफ्रिका किंवा आॅस्ट्रेलियाचा दौरा करतो, तेव्हा हिरव्यागार खेळपट्ट्या मिळतात. तेथे चेंडू फार कमी वळण घेतात. मग घरच्या मैदानावर आम्हाला आमच्या मनाप्रमाणे का नको? शास्त्री यांनी यजमान संघाला अनुकूल खेळपट्टी मागताच ‘हाय तोबा’ सुरू झाले आहे.वन डे मालिकेत भारताला आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. कसोटी क्रिकेट हा वेगळाच प्रकार आहे. अखेरच्या वन डेचा अपवाद वगळता उर्वरित चारही सामन्यांत भारत चांंगलाच खेळला. सामान्यपणे मोहालीच्या खेळपट्टीवर गवत असते. यामुळे चेंडू चौथ्या आणि पाचव्या दिवशी ‘टर्न’ होतो. माझ्या मते ही आदर्श खेळपट्टी असेल.द. आफ्रिका बलाढ्य संघ आहे. या संघाकडे ताशी १४० किमी वेगाने गोलंदाजी करणारे खेळाडू आहेत. या गोलंदाजांपुढे भारतीयांची खरी परीक्षा असेल. हे पाहता, उमेश यादव तसेच वरुण अ‍ॅरोन यांनी योग्य लय आणि वेग राखून मारा करायला हवा. असे घडल्यास आफ्रिकेच्या फलंदाजांवर जरब बसविणे सोपे होईल. ईशांतचे निलंबन भारतीय गोलंदाजी माऱ्याला धक्का बसण्यासारखे आहे. आश्विनने पूर्णपणे फिट झाल्यानंतरच मैदानात यावे, असा त्याला माझा मोलाचा सल्ला असेल. विराटसाठी कर्णधार या नात्याने ही मालिका अत्यधिक महत्त्वाची ठरावी. (टीसीएम)