शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
4
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
5
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
6
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
7
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
8
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
9
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
10
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
11
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
12
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
13
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
15
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
16
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
17
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
18
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
19
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
20
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या

हार्दिक ठरतोय गेम चेंजर

By admin | Updated: February 26, 2016 04:05 IST

पहिल्या चेंडूपासूनच मोठे फटके मारण्याची क्षमता असलेल्या हार्दिक पंड्या याने कर्णधार महेंद्रसिंह धोनीला प्रभावित केले आहे. या युवा खेळाडूची धोनीने स्तुती

मिरपूर : पहिल्या चेंडूपासूनच मोठे फटके मारण्याची क्षमता असलेल्या हार्दिक पंड्या याने कर्णधार महेंद्रसिंह धोनीला प्रभावित केले आहे. या युवा खेळाडूची धोनीने स्तुती केली आहे. तो म्हणाला, की टी-२० मध्ये भारतासाठी हार्दिक गेम चेंजर ठरला आहे. पंड्याने १८ चेंडूंतच ३१ धावा केल्या होत्या. आणि २३ धावा देत १ बळीही मिळवला. भारताने आशिया कपमध्ये पहिल्या सामन्यात बांगलादेशला ४५ धावांनी मात दिली. धोनी म्हणाला की, त्याला चार षटके टाकताना पाहून आनंद वाटला. त्यामुळे संघाची ताकद वाढली आहे. संघात बदल करण्याची गरज पडणार नाही. या संघात सात फलंदाज ठेवण्याची गरज काय, असा प्रश्नही उपस्थित होत होता. मात्र, हार्दिकसारखे खेळाडू संघात असतील तर ७ फलंदाज ठेवले जाऊ शकतात.’’ (वृत्तसंस्था)नेहराची शिस्त, युवराजच्या दृष्टिकोनाचे कौतुक आम्हाला हार्दिकला फार काही सांगण्याची गरज पडत नाही. त्याला फक्त चेंडू सीमारेषेबाहेर फेकणे माहीत आहे आणि तो तेच करतो. तो चौकार आणि षटकार जास्त लावतो. तो जितके जास्त सामने खेळेल तितकी त्याची कारकीर्द बहरत जाईल. पंड्याच्या समावेशामुळे संघ संतुलित झाला आहे. या प्रकारात ते खेळाडू जास्त चांगले योगदान देऊ शकतात, जे फलंदाजी आणि गोलंदाजीतही उत्तम योगदान देतात. युवा खेळाडूंच्या संघात ३६ वर्षांचा आशिष नेहरा आणि ३४ वर्षांचा युवराज सिंग आहे. या दोघांचा संघात समावेश होईल, असे फारसे कुणालाही वाटले नसेल. मात्र, नेहराची शिस्तप्रियता आणि युवराजचा दृष्टिकोन यांचे धोनीने कौतुक केले आहे. हे दोन्ही खेळाडू धोनीच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग ठरले. युवराजने पहिल्या सामन्यात १५ धावा केल्या. त्याबाबत बोलताना धोनी म्हणाला की, त्याचा दृष्टिकोन योग्य होता. अचानक जाऊन तुम्ही ते सर्व करू शकत नाही, जे तुम्ही ठरवलेले आहे. मोर्तुजाने केला शाकिबचा बचावबांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तुजा याने शाकिब अल हसनचा बचाव केला आहे. पहिल्या सामन्यात शाकिबने रोहित शर्माचा सोपा झेल सोडला होता. त्या वेळी रोहित शर्मा २१ धावांवर खेळत होता. त्यानंतर रोहितने ८३ धावा केल्या आणि सामना भारताच्या बाजूने फिरवला. मोर्तुजा म्हणाला की, ‘‘रोहितचा झेल सामन्यातील टर्निंग पॉइंट होता. मात्र झेल हा सुटू शकतो. शाकिब बांगलादेशच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे.’’डावाची सुरुवात करणे अतिरिक्त जबाबदारीसर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्मा याने म्हटले की, डावाची सुरुवात करणे ही अतिरिक्त जबाबदारी आहे. अग्रक्रमात फलंदाजी करताना माझ्यावर अतिरिक्त जबाबदारी येते. माझी ही जबाबदारी आहे की चांगला स्कोर बनवावा आणि सामना जिंकण्याची सवय लावावी. क्रिकेटमध्ये अनुभव महत्त्वाचा ठरतो. अनुभवामुळेच संघाचा डाव कसा सावरावा, दबावातही कसे खेळावे हे कळते.’’