शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
3
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
4
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
5
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
6
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
7
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
8
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
9
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
10
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
11
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
12
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
13
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
14
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
15
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
16
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
17
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
18
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
19
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
20
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या

हरमनने मन जिंकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:55 IST

काही दिवस, क्षण इतिहासाचं कोंदणच स्वतः सोबत घेऊन येत असतात. तो दिवस, क्षण ज्यांच्या नशिबात येतो ते कायमस्वरूपी इतिहास बनून जातात.

- बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
 
काही दिवस, क्षण इतिहासाचं कोंदणच स्वतः सोबत घेऊन येत असतात. तो दिवस, क्षण ज्यांच्या नशिबात येतो ते कायमस्वरूपी इतिहास बनून जातात. भारतीय महिला क्रिकेटसाठी कालची रात्र तशीच ऐतिहासिक ठरली. अशक्य ते शक्य झालं, कल्पनेतलं स्वप्न सत्यात उतरलं. चर्चा, प्रसिद्धी, कौतुक आणि विश्वचषकाचं तिकीट सारं काही पदरात पडलं. ही सगळी किमया घडली ती एका ऐतिहासिक खेळीमुळे आणि या खेळीची शिल्पकार असलेल्या हरमनप्रीत कौरमुळे. नियतीने कालचा दिवस जणू तिलाच बहाल केला होता.   
महिला विश्वचषकातील सहा वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धची खराब कामगिरी यामुळे भारतीय महिला संघासाठी उपांत्य सामना म्हणजे जणू अग्निपरीक्षाच होती. पण भारतीय संघ या परीक्षेत तावून सुलाखून पास झाला. यंदाच्या महिला विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी चांगली होत आहे. उपांत्य सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध असल्याने धाकधूक वाटत होती. मन भारतच जिंकेल म्हणत होते, पण आकडे, वास्तव यांचे गणित मांडणारा मेंदू त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. पण हरमनप्रीतने सगळी समिकरणेच बदलून टाकली. 
पावसाळी वातावरण आणि दहाव्या षटकापूर्वीच दोन विकेट गमावल्याने भारतीय संघ अडचणीत होता. पण त्यावेळी मैदानात उतरलेल्या हरमनप्रीतने बघता बघता  डावाचे चित्र पालटवले. याआधी बिग बॅशमध्ये खेळल्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची तिला चांगली परख आहे. या गोष्टीचा तिने पुरेपूर फायदा उठवला. मैदानावर  चौकार, षटकारांची बरसात होऊ लागली. त्याबरोबरच इंग्लंडपासून हजारो मैल दूर भारतात ऑफीस, रस्ते, घर, लोकल आणि सोशल मीडिया सगळीकडे हरमनप्रीतचीच चर्चा सुरू झाली. महिला क्रिकेट प्राइम टाइममध्ये आले. 
बड्या संघाला लोळवण्यासाठी तितक्याच जबरदस्त खेळीची गरज असते. काल भारतीय महिला संघासाठी ती कामगिरी हरमनप्रीतने बजावली. धावफलक शेअर बाजाराप्रमाणे उसळी घेऊ लागला. अर्थातच भारतीय संघाचा शेअर वधारलेला होता. तर विश्वविजेत्यांनी आपटी खाल्ली. अवघ्या 115 चेंडूत नाबाद 171 धावा त्यात 20 चौकार आणि 7 षटकार वीरेंद्र सेहवागची आठवण करून गेले. या खेळीदरम्यान मिताली राज, दीप्ती शर्मा आणि वेदा कृष्णमूर्ती यांच्यासोबत घणाघाती भागीदाऱ्या करत 42 षटकात उभारलेल्या 281धावा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेशा ठरल्या.
हरमनप्रीतने दिलेल्या धक्क्यातून सावरण्यापूर्वी त्यांच्या तीन फलंदाज माघारी परतल्या होत्या. पुढे एलिस पेरी, व्हिलानी आणि ब्लॅकवेल यांनी झुंज देत सामना शेवटपर्यंत नेला. पण भारताच्या विजयाची गाथा 
हरमनप्रीतने पहिल्या डावातच लिहून पूर्ण केली होती. उत्तरार्धात झुलन गोस्वामी, शिखा पांडे आणि दीप्ती शर्मा यांनी त्याची औपचारिकता पार पाडली. 
स्वप्नवत ठरलेल्या या विश्वचषकात आता रविवारी ऐतिहासिक लॉर्डसवर होणाऱ्या अंतिम लढतीत भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असेल. याच मैदानावर 34 वर्षांपूर्वी आपण पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषकाला गवसणी घातली होती. आता दुसऱ्यांदा महिला विश्वचषकाची अंतिम फेरी खेळत असलेल्या भारताच्या मर्दानींसमोर त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी आणि आव्हान असेल.