शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

विजयी ‘ट्रॅक’वर येण्याचे लक्ष्य

By admin | Updated: December 17, 2014 01:43 IST

थरारक अ‍ॅडिलेड कसोटीत विजय मिळवून यजमान आॅस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेत ब्रिस्बेनमध्ये दाखल झाला आहे.

ब्रिसबन : भावानिक आणि थरारक अ‍ॅडिलेड कसोटीत विजय मिळवून यजमान आॅस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेत ब्रिस्बेनमध्ये दाखल झाला आहे. या कसोटीत दोन्ही संघ विजयासाठी रस्सीखेच करण्यासाठी बाहू सरसावून सज्ज झाले आहेत. मात्र, या कसोटीत आॅस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघाचे नेतृत्व बदलल्याने त्यांच्यातील चुरस आणखीन वाढली आहे. मायकल क्लार्कच्या दुखापतीमुळे तरूण स्टिव्ह स्मिथ याच्याकडे आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे, तर दुखापतीतून सावरल्यामुळे भारताला विजयी ट्रॅकवर आणण्यासाठी महेंद्रसिंग धोनी तयार आहे. दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघ आक्रमक खेळ करतील, असा निर्धार सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही कर्णधारांनी व्यक्त केला आहे.आॅस्ट्रेलियाने अ‍ॅडिलेड कसोटीत विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारताला या लढतीत ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यशस्वी आणि अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनी परतल्यामुळे संघात नवचैतन्य आले आहे आणि मालिकेत कमबॅक करण्याच्या त्यांच्या आशा दुणावल्या आहेत. आॅस्ट्रेलिया संघ कर्णधारासह काही नव्या बदलांनी सामन्यात उतरणार आहे. आॅसी संघाने दुसऱ्या कसोटीसाठी संघात जोश, हेजलवूड आणि मिशेल स्टार्क यांना स्थान दिले आहे. रियान हॅरिस व पिटर सिडल यांना विश्रांती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त क्लार्कच्या जागी संघात शॉन मार्शचे आगमन झाले आहे. कर्णधार धोनी याचे विश्रांतीनंतर संघात कमबॅक हे फायद्याचे ठरणार आहे. पहिल्या कसोटीत झालेल्या चुकांचा अभ्यास धोनीने केलाच असावा आणि त्यावर तोडगा काढून तो या दुसऱ्या कसोटीची रणनिती आखेल. या विश्रांतीमुळे धोनीही नव्या दमाने मैदानावर उतरणार असल्याने संघ चांगली कामगिरी करेल, हे निश्चित आहे. पहिल्या कसोटीत फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या चुका सुधारल्यास भारत दुसऱ्या सामन्यात मुसंंडी मारेल हे नक्की आहे. सलामीवीरांची कामगिरी निराशाजनक झाली आहे. शिखर धवनने निराश केले, तर तळाच्या फलंदाजांनाही फार चमक दाखविता आलेली नाही. विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर येताना दोन्ही डावांत शतक ठोकून शाही कमबॅक केले, तर मुरली विजयने दोन डावांत मिळून १५२ धावा चोपल्या. या दोघांना शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रोहित शर्माकडून हवी तशी मदत मिळालेली नाही. गोलंदाजीतही भारताला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. इशांत शर्मा, वरूण अ‍ॅरोन, मोहम्मद शमी यांचे अपयश आॅसींच्या पथ्यावर पडले. कर्ण शर्माला प्रभाव पाडण्यात अपयश आले. (वृत्तसंस्था)