शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

विजयी ‘ट्रॅक’वर येण्याचे लक्ष्य

By admin | Updated: December 17, 2014 01:43 IST

थरारक अ‍ॅडिलेड कसोटीत विजय मिळवून यजमान आॅस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेत ब्रिस्बेनमध्ये दाखल झाला आहे.

ब्रिसबन : भावानिक आणि थरारक अ‍ॅडिलेड कसोटीत विजय मिळवून यजमान आॅस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेत ब्रिस्बेनमध्ये दाखल झाला आहे. या कसोटीत दोन्ही संघ विजयासाठी रस्सीखेच करण्यासाठी बाहू सरसावून सज्ज झाले आहेत. मात्र, या कसोटीत आॅस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघाचे नेतृत्व बदलल्याने त्यांच्यातील चुरस आणखीन वाढली आहे. मायकल क्लार्कच्या दुखापतीमुळे तरूण स्टिव्ह स्मिथ याच्याकडे आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे, तर दुखापतीतून सावरल्यामुळे भारताला विजयी ट्रॅकवर आणण्यासाठी महेंद्रसिंग धोनी तयार आहे. दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघ आक्रमक खेळ करतील, असा निर्धार सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही कर्णधारांनी व्यक्त केला आहे.आॅस्ट्रेलियाने अ‍ॅडिलेड कसोटीत विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारताला या लढतीत ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यशस्वी आणि अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनी परतल्यामुळे संघात नवचैतन्य आले आहे आणि मालिकेत कमबॅक करण्याच्या त्यांच्या आशा दुणावल्या आहेत. आॅस्ट्रेलिया संघ कर्णधारासह काही नव्या बदलांनी सामन्यात उतरणार आहे. आॅसी संघाने दुसऱ्या कसोटीसाठी संघात जोश, हेजलवूड आणि मिशेल स्टार्क यांना स्थान दिले आहे. रियान हॅरिस व पिटर सिडल यांना विश्रांती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त क्लार्कच्या जागी संघात शॉन मार्शचे आगमन झाले आहे. कर्णधार धोनी याचे विश्रांतीनंतर संघात कमबॅक हे फायद्याचे ठरणार आहे. पहिल्या कसोटीत झालेल्या चुकांचा अभ्यास धोनीने केलाच असावा आणि त्यावर तोडगा काढून तो या दुसऱ्या कसोटीची रणनिती आखेल. या विश्रांतीमुळे धोनीही नव्या दमाने मैदानावर उतरणार असल्याने संघ चांगली कामगिरी करेल, हे निश्चित आहे. पहिल्या कसोटीत फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या चुका सुधारल्यास भारत दुसऱ्या सामन्यात मुसंंडी मारेल हे नक्की आहे. सलामीवीरांची कामगिरी निराशाजनक झाली आहे. शिखर धवनने निराश केले, तर तळाच्या फलंदाजांनाही फार चमक दाखविता आलेली नाही. विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर येताना दोन्ही डावांत शतक ठोकून शाही कमबॅक केले, तर मुरली विजयने दोन डावांत मिळून १५२ धावा चोपल्या. या दोघांना शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रोहित शर्माकडून हवी तशी मदत मिळालेली नाही. गोलंदाजीतही भारताला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. इशांत शर्मा, वरूण अ‍ॅरोन, मोहम्मद शमी यांचे अपयश आॅसींच्या पथ्यावर पडले. कर्ण शर्माला प्रभाव पाडण्यात अपयश आले. (वृत्तसंस्था)