शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाला वेळ द्या

By admin | Updated: October 7, 2014 03:08 IST

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला कसोटीत काही करिष्मा दाखविता आलेला नाही. हा तरुण संघ आहे; परंतु त्यांनी लॉर्डस्वर विजय मिळवून इतिहास घडविला

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला कसोटीत काही करिष्मा दाखविता आलेला नाही. हा तरुण संघ आहे; परंतु त्यांनी लॉर्डस्वर विजय मिळवून इतिहास घडविला. अनुभवाची कमतरता असल्याने त्यांना इतर कसोटीत सपाटून मार खावा लागला. असे असले तरी या संघाला आणखी एक वर्ष द्यायला हवे आणि त्यांच्याकडून सकारात्मक निकाल मिळेल, असा विश्वास भारताचे माजी कर्णाधार रवी शास्त्री यांनी व्यक्त केला. मुंबईत पत्रकार परिषदेत ते म्हणाले, गोलंदाज २० विकेट घेण्यात अपयशी ठरत असल्यास, फलंदाज काय करतील. त्यांनी कितीही धावा चोपल्या, तरी गोलंदाजांचे अपयश संघावर दबाव निर्माण करतो. त्यांना काही वर्षांची मुदत देण्याची आवश्यकता आहे.भारताला २० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची आवश्यकता आहे. कसोटीत भारतीय संघ नेममीच बॅड पॅचमध्ये नसेल. लोकांना लगेच विसर पडतो. १८ महिन्यांपूर्वी भारत कसोटीत अव्वल क्रमांकावर होता. टी-२० वर्ल्डकप आणि ५० षटकांचा वर्ल्डकप आपण जिंकलो. याचा विसर लोकांना पडला आहे, असे स्पष्ट मतही त्यांनी मांडले. ते पुढे म्हणाले, क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये खेळाडूंना खेळायचे आहे. त्यांना प्रवाहासोबत जाणे आवडते आणि तो त्यांचा हक्क आहे. माझ्या मते, कसोटी क्रिकेट स्वत:च्या चुकांमुळे संघर्ष करत आहे. एकदिवसीय आणि टी-२० सामने बंद केल्यास कसोटीचाही प्राण जाईल. कारण त्यामुळे आर्थिक क्षमता ढासळेल. कसोटीला टी-२०च्या इंजेक्शनची आवश्यकता आहे. ५० षटकांच्या आणि टी-२० वर्ल्डकपवर लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे आहे. (क्रीडा प्रतिनिधी)