शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनीविरुद्ध अधिकाधिक पेनल्टी कॉर्नर मिळवा

By admin | Updated: August 8, 2016 03:37 IST

भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन! आयर्लंडविरुद्धचा सामना जिंकून भारताने ‘रिओ मोहिमे’चा शानदार प्रारंभ केलाय. माझ्या मित्राने आॅलिम्पिक, भारतीय संघ आणि मी याबाबतचा योगायोग लक्षात आणून दिला

धनराज पिल्ले लिहितो...भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन! आयर्लंडविरुद्धचा सामना जिंकून भारताने ‘रिओ मोहिमे’चा शानदार प्रारंभ केलाय. माझ्या मित्राने आॅलिम्पिक, भारतीय संघ आणि मी याबाबतचा योगायोग लक्षात आणून दिला... याआधी भारताने १२ वर्षांपूर्वी म्हणजेच २००४ च्या अथेन्स आॅलिम्पिकमध्ये हॉकीचा सामना जिंकला होता. तोच माझ्या कारकिर्दीतील अखेरचा सामनादेखील होता. आयर्लंडविरुद्धच्या लढतीतील उल्लेखनीय बाब म्हणजे, भारतीय खेळाडूंची देहबोली कमालीची सकारात्मक होती. ऊर्जेने भरलेल्या आपल्या खेळाडूंनी प्रत्येक क्षेत्रात आक्रमक खेळ केला. रघुनाथने पहिल्या क्वार्टरचा खेळ संपण्याआधी केलेला गोल, तसेच ड्रॅग फ्लिकर रमणदीपने २६ व ४९ व्या मिनिटाला केलेले गोल भारतीय हॉकीप्रेमींना खचितच सुखावणारे होते. चौथ्या क्वार्टरमध्ये मात्र भारताची बचावफळी काहीशी विस्कळित जाणवली. आपल्या बचावपटूंनी अनेक चुका केल्या. आगामी लढतींत या चुका टाळाव्या लागतील. विशेषत: जर्मनी आणि नेदरलँडसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध अशा चुका आपल्या ‘रिओ मोहिमे’साठी खूप नुकसानदायक ठरू शकतात. या संघाविरुद्ध खेळताना प्रतिस्पर्ध्यांना जास्त पेनल्टी कॉर्नर मिळू नयेत, याकडे आपल्या बचावफळीने लक्ष केंद्रित करायला हवे. जर्मनी, नेदरलँडसारख्या दादा संघांविरुरुद्ध ही बाब विजयाची किल्ली ठरू शकते.आयर्लंडला नमविल्यानंतर आता भारतासमोर जर्मनी आणि नेदरलँडचे कडवे आव्हान असेल. जर्मनीविरुद्ध भारतीयांनी नैसर्गिक खेळ करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संघव्यवस्थापनाने अशा मोठ्या लढतीमध्ये नवीन प्रयोग करण्याचा उत्साह टाळायला हवा. या लढतीत भारतीयांनी सकारात्मक मानसिकतेने खेळायला हवे. यासाठी प्रेरणा म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीतील विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाविरुद्धची लढत त्यांनी आठवायला हवी. या लढतीत सर्वच आघाड्यांवर जगज्जेत्यांची कोंडी करण्यात आपण यशस्वी ठरलो होतो. दोन ‘हाय व्होल्टेज’ लढतींमध्ये आपले सीनियर खेळाडू सर्वस्व पणाला लावतील, याबाबत मला विश्वास आहे. भारतीय खेळाडूंनी ब्राझीलमधील वातावरणाशी स्वत:ला जुळवून घेतले असेल, अशी आशा आहे. क्रीडाग्राममध्ये राहताना जगभरातील महान खेळाडूंना भेटण्याची संधी लाभते. एका खेळाडूसाठी ही गोष्ट किती मोठी असते, हे कोणताही खेळाडू सहजपणे सांगेल. आपले खेळाडूही निश्चितपणे याचा आनंद लुटत असतील... आपल्या आवडत्या सुपरस्टार्सबरोबर ते जेवण करीत असतील, छायाचित्रे काढत असतील. सध्या भारतीय संघात अनुभवी आणि नव्या दमाच्या खेळाडूंचे उत्कृष्ट मिश्रण आहे. हा संघ मला २००० च्या सिडनी आॅलिम्पिकमधील संघाची आठवण करून देणारा आहे. प्रत्येक संघासाठी पेनल्टी कॉर्नर मिळवणे आणि त्याचे गोलमध्ये रूपांतर करणे महत्त्वाचे असते. रघुनाथ, रूपिंदर आणि हरमनप्रीत या त्रिकुटाने आत्मविश्वासाने बेधडक खेळ करताना अधिकाधिक पेनल्टी कॉर्नरच्या संधी निर्माण करायला हव्यात. सरदार, मनप्रीत आणि इतर मिडफिल्डर्सनी गोल करण्याच्या संधी निर्माण करायला हव्यात. या संधी सार्थकी लावण्याची जबाबदारी आघाडीच्या खेळाडूंवर असेल. ‘रिओ मोहीम’ यशस्वी करण्यासाठी भारतीय संघाने प्रत्येक सामन्यात योग्य व्यूहरचना आखून उतरावे आणि सर्व खेळाडूंनी १०० टक्के योगदान देऊन ती योजना प्रत्यक्ष मैदानावर अमलात आणावी. एका वेळी केवळ एका सामन्याचाच विचार करावा. आत्मविश्वास कायम ठेवा आणि अखेरच्या क्षणापर्यंत सामना सोडू नका. संपूर्ण देश आपल्या हॉकी संघाच्या यशासाठी प्रार्थना करतोय. प्रत्यक्ष मैदानावर नसलो तरी, आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. आॅल द बेस्ट!(टीसीएम)