शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गेल, हसीचा विक्रम कोहलीच्या आवाक्यात

By admin | Updated: May 9, 2016 04:48 IST

आपल्या तुफान फॉर्मच्या जोरावर सध्या क्रिकेटविश्व गाजवणारा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हळूहळू विविध विश्वविक्रम पादाक्रांत करीत आहे

नवी दिल्ली : आपल्या तुफान फॉर्मच्या जोरावर सध्या क्रिकेटविश्व गाजवणारा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हळूहळू विविध विश्वविक्रम पादाक्रांत करीत आहे. आयपीएलमध्येही त्याने आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावल्या असून, एकाच स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा ख्रिस गेल आणि मायकल हसी यांचा विक्रम मागे टाकण्याची सुवर्णसंधी यंदा कोहलीला आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार असलेल्या कोहलीने यंदाच्या मोसमात आतापर्यंत ८ सामन्यांतून ९०.१६च्या जबरदस्त सरासरीने ५४१ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये कोहलीने दोन शतके आणि चार अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याचबरोबर यंदा त्याने दोन शतके झळकावताना आयपीएल इतिहासात एकाच मोसमात एकापेक्षा अधिक शतके झळकावणारा पहिला फलंदाज म्हणूनही मान मिळवला आहे. विराटने राइजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध नाबाद १०८ धावा कुटताना स्पर्धेत वैयक्तिक ५०० धावांचा पल्ला गाठला. सध्या कोहली ज्या फॉर्ममध्ये आहे त्याकडे बघताना तो आयपीएलच्या एकाच सत्रात सर्वाधिक ७३३ वैयक्तिक धावा फटकावण्याचा ख्रिस गेलचा विक्रम मोडू शकतो. तसेच चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळलेल्या आॅस्टे्रलियाच्या मायकल हसीने देखील ७३३ धावा काढल्या होत्या. गेल व हसी यांनी अनुक्रमे २०१२ व २०१३ साली ही कामगिरी केली होती. आयपीएलमध्ये कोहलीने २०१३मध्ये ६३४ धावा फटकावल्या होत्या. विशेष म्हणजे कोहली फक्त आयपीएलमध्येच नाही तर याआधी २०१६च्या सुरुवातीपासून चार महिन्यांत झालेल्या टी-२० सामन्यांतही तुफान फॉर्ममध्ये होता. कोहलीने यंदाच्या वर्षी आतापर्यंत १३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत १२५ च्या सरासरीने ६२५ धावा कुटल्या आहेत. यामध्ये त्याने ७ वेळा अर्धशतके झळकावली आहेत. यंदाच्या वर्षी आतापर्यंत एकूण २१ टी-२० सामन्यांतून कोहलीने ११६६ धावा काढल्या आहेत. (वृत्तसंस्था)>>> आशिया चषक स्पर्धेत कोहलीने ७, ४९, नाबाद ५६ आणि नाबाद ४१ धावा केल्या. स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या भारताच्या यशात कोहली निर्णायक ठरला होता.घरच्या मैदानावर झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी कोहलीला विश्रांती देण्यात आली होती.टी-२० विश्वचषक स्पर्धेत कोहलीने २३, नाबाद ५५, २४, नाबाद ८२ आणि नाबाद ८९ अशी खेळी करून भारताला उपांत्य फेरीत नेले.हाच फॉर्म आयपीएलमध्ये कायम राखताना कोहलीने राजकोटला गुजरात लायन्सविरुद्ध नाबाद १०० धावा करून पहिले टी-२० शतक झळकावले. तर दोन सामन्यांनंतर पुन्हा एकदा शतक झळकावताना कोहलीने दुसरे टी-२० शतक झळकावले.