शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

गेल, हसीचा विक्रम कोहलीच्या आवाक्यात

By admin | Updated: May 9, 2016 04:48 IST

आपल्या तुफान फॉर्मच्या जोरावर सध्या क्रिकेटविश्व गाजवणारा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हळूहळू विविध विश्वविक्रम पादाक्रांत करीत आहे

नवी दिल्ली : आपल्या तुफान फॉर्मच्या जोरावर सध्या क्रिकेटविश्व गाजवणारा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हळूहळू विविध विश्वविक्रम पादाक्रांत करीत आहे. आयपीएलमध्येही त्याने आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावल्या असून, एकाच स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा ख्रिस गेल आणि मायकल हसी यांचा विक्रम मागे टाकण्याची सुवर्णसंधी यंदा कोहलीला आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार असलेल्या कोहलीने यंदाच्या मोसमात आतापर्यंत ८ सामन्यांतून ९०.१६च्या जबरदस्त सरासरीने ५४१ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये कोहलीने दोन शतके आणि चार अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याचबरोबर यंदा त्याने दोन शतके झळकावताना आयपीएल इतिहासात एकाच मोसमात एकापेक्षा अधिक शतके झळकावणारा पहिला फलंदाज म्हणूनही मान मिळवला आहे. विराटने राइजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध नाबाद १०८ धावा कुटताना स्पर्धेत वैयक्तिक ५०० धावांचा पल्ला गाठला. सध्या कोहली ज्या फॉर्ममध्ये आहे त्याकडे बघताना तो आयपीएलच्या एकाच सत्रात सर्वाधिक ७३३ वैयक्तिक धावा फटकावण्याचा ख्रिस गेलचा विक्रम मोडू शकतो. तसेच चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळलेल्या आॅस्टे्रलियाच्या मायकल हसीने देखील ७३३ धावा काढल्या होत्या. गेल व हसी यांनी अनुक्रमे २०१२ व २०१३ साली ही कामगिरी केली होती. आयपीएलमध्ये कोहलीने २०१३मध्ये ६३४ धावा फटकावल्या होत्या. विशेष म्हणजे कोहली फक्त आयपीएलमध्येच नाही तर याआधी २०१६च्या सुरुवातीपासून चार महिन्यांत झालेल्या टी-२० सामन्यांतही तुफान फॉर्ममध्ये होता. कोहलीने यंदाच्या वर्षी आतापर्यंत १३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत १२५ च्या सरासरीने ६२५ धावा कुटल्या आहेत. यामध्ये त्याने ७ वेळा अर्धशतके झळकावली आहेत. यंदाच्या वर्षी आतापर्यंत एकूण २१ टी-२० सामन्यांतून कोहलीने ११६६ धावा काढल्या आहेत. (वृत्तसंस्था)>>> आशिया चषक स्पर्धेत कोहलीने ७, ४९, नाबाद ५६ आणि नाबाद ४१ धावा केल्या. स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या भारताच्या यशात कोहली निर्णायक ठरला होता.घरच्या मैदानावर झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी कोहलीला विश्रांती देण्यात आली होती.टी-२० विश्वचषक स्पर्धेत कोहलीने २३, नाबाद ५५, २४, नाबाद ८२ आणि नाबाद ८९ अशी खेळी करून भारताला उपांत्य फेरीत नेले.हाच फॉर्म आयपीएलमध्ये कायम राखताना कोहलीने राजकोटला गुजरात लायन्सविरुद्ध नाबाद १०० धावा करून पहिले टी-२० शतक झळकावले. तर दोन सामन्यांनंतर पुन्हा एकदा शतक झळकावताना कोहलीने दुसरे टी-२० शतक झळकावले.