शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गेल, हसीचा विक्रम कोहलीच्या आवाक्यात

By admin | Updated: May 9, 2016 04:48 IST

आपल्या तुफान फॉर्मच्या जोरावर सध्या क्रिकेटविश्व गाजवणारा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हळूहळू विविध विश्वविक्रम पादाक्रांत करीत आहे

नवी दिल्ली : आपल्या तुफान फॉर्मच्या जोरावर सध्या क्रिकेटविश्व गाजवणारा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हळूहळू विविध विश्वविक्रम पादाक्रांत करीत आहे. आयपीएलमध्येही त्याने आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावल्या असून, एकाच स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा ख्रिस गेल आणि मायकल हसी यांचा विक्रम मागे टाकण्याची सुवर्णसंधी यंदा कोहलीला आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार असलेल्या कोहलीने यंदाच्या मोसमात आतापर्यंत ८ सामन्यांतून ९०.१६च्या जबरदस्त सरासरीने ५४१ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये कोहलीने दोन शतके आणि चार अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याचबरोबर यंदा त्याने दोन शतके झळकावताना आयपीएल इतिहासात एकाच मोसमात एकापेक्षा अधिक शतके झळकावणारा पहिला फलंदाज म्हणूनही मान मिळवला आहे. विराटने राइजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध नाबाद १०८ धावा कुटताना स्पर्धेत वैयक्तिक ५०० धावांचा पल्ला गाठला. सध्या कोहली ज्या फॉर्ममध्ये आहे त्याकडे बघताना तो आयपीएलच्या एकाच सत्रात सर्वाधिक ७३३ वैयक्तिक धावा फटकावण्याचा ख्रिस गेलचा विक्रम मोडू शकतो. तसेच चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळलेल्या आॅस्टे्रलियाच्या मायकल हसीने देखील ७३३ धावा काढल्या होत्या. गेल व हसी यांनी अनुक्रमे २०१२ व २०१३ साली ही कामगिरी केली होती. आयपीएलमध्ये कोहलीने २०१३मध्ये ६३४ धावा फटकावल्या होत्या. विशेष म्हणजे कोहली फक्त आयपीएलमध्येच नाही तर याआधी २०१६च्या सुरुवातीपासून चार महिन्यांत झालेल्या टी-२० सामन्यांतही तुफान फॉर्ममध्ये होता. कोहलीने यंदाच्या वर्षी आतापर्यंत १३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत १२५ च्या सरासरीने ६२५ धावा कुटल्या आहेत. यामध्ये त्याने ७ वेळा अर्धशतके झळकावली आहेत. यंदाच्या वर्षी आतापर्यंत एकूण २१ टी-२० सामन्यांतून कोहलीने ११६६ धावा काढल्या आहेत. (वृत्तसंस्था)>>> आशिया चषक स्पर्धेत कोहलीने ७, ४९, नाबाद ५६ आणि नाबाद ४१ धावा केल्या. स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या भारताच्या यशात कोहली निर्णायक ठरला होता.घरच्या मैदानावर झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी कोहलीला विश्रांती देण्यात आली होती.टी-२० विश्वचषक स्पर्धेत कोहलीने २३, नाबाद ५५, २४, नाबाद ८२ आणि नाबाद ८९ अशी खेळी करून भारताला उपांत्य फेरीत नेले.हाच फॉर्म आयपीएलमध्ये कायम राखताना कोहलीने राजकोटला गुजरात लायन्सविरुद्ध नाबाद १०० धावा करून पहिले टी-२० शतक झळकावले. तर दोन सामन्यांनंतर पुन्हा एकदा शतक झळकावताना कोहलीने दुसरे टी-२० शतक झळकावले.