शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

गंभीर-तिवारी यांच्यात हमरीतुमरी!

By admin | Updated: October 25, 2015 04:09 IST

फिरोजशाह कोटला मैदानावर शनिवारी दिल्ली-बंगाल रणजी लढतीदरम्यान उभय संघांच्या कर्णधारांदरम्यान चांगलीच शाब्दिक चकमक झाली.

नवी दिल्ली : फिरोजशाह कोटला मैदानावर शनिवारी दिल्ली-बंगाल रणजी लढतीदरम्यान उभय संघांच्या कर्णधारांदरम्यान चांगलीच शाब्दिक चकमक झाली. दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीर तसेच बंगालचा कर्णधार मनोज तिवारी हे हमरीतुमरीवर आले. एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दोघांनीही दिली. पंचाने मध्यस्थी करताच त्यांनाही धक्का देण्यात आला. गंभीर आणि तिवारी परस्परांच्या अंगावर धावून आले तेव्हा पंच के. श्रीनाथ यांनी उभय खेळाडूंना समजविण्याचा व शांत करण्याचा प्रयत्न केला. गंभीरने पंचांनाही धक्का दिला. क्रिकेटमध्ये पंचांना धक्का देणे हा मोठा अपराध मानला जातो व बंदीची शिक्षादेखील होऊ शकते.ही घटना आठव्या षटकात घडली. पार्थसारथी भट्टाचार्य याला मनन शर्मा याने बाद करताच तिवारी चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला. त्याने ‘गार्ड’ घेतल्यानंतर फलंदाजी करण्याआधी गोलंदाजाला रोखले व पॅव्हेलियनकडे पाहात ड्रेसिंग रूममधून हेल्मेट आणण्याचा इशारा दिला. तिवारी हेतुपुरस्सरपणे ‘टाईमपास’ करीत असावा, असा दिल्लीच्या खेळाडूंचा समज झाला. मनन व तिवारी यांच्यात ‘तू-तू, मै-मै’ सुरू असताना पहिल्या स्लिपमध्ये उभा असलेला गंभीर तिवारीजवळ आला आणि त्याला शिविगाळ करू लागला. तिवारीनेदेखील गंभीरला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. गंभीर म्हणाला, ‘सायंकाळी भेट तुला मारतोच!’ उत्तरात तिवारी म्हणाला, ‘सायंकाळी का, आताच बाहेर चल!’ गंभीर आणि तिवारी या दोघांना मॅच रेफ्री वाल्मिक बूच यांनी पाचारण केले आहे. (वृत्तसंस्था)