शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

गंभीर-लिन जोडीने छाप सोडली

By admin | Updated: April 8, 2017 23:46 IST

कोलकाता संघाने गेल्या वर्षी गुणतालिकेत अव्वल स्थान भूषविणाऱ्या गुजरात संघाचा १० गडी राखून पराभव करीत आयपीएलच्या दहाव्या पर्वात जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने शानदार

- सुनील गावसकर लिहितात...कोलकाता संघाने गेल्या वर्षी गुणतालिकेत अव्वल स्थान भूषविणाऱ्या गुजरात संघाचा १० गडी राखून पराभव करीत आयपीएलच्या दहाव्या पर्वात जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने शानदार सुरुवात केली. टी-२० क्रिकेटमध्ये एखाद्या संघाने १०० धावा फटकावताना विकेट न गमावणे, असे क्वचितच घडते आणि गंभीर-लिन जोडीने १८४ धावांचे मोठे लक्ष्य विकेट न गमविता पूर्ण केले. त्यामुळे लायन्सच्या कर्णधाराला अपल्या गोलंदाजांच्या क्षमतेवर शंका व्यक्त करण्यास बाध्य केले. रैनाने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या लढतीत फॉकनरचा अपवाद वगळता सर्व भारतीय गोलंदाजांचा संघात समावेश केला. आॅस्ट्रेलियन गोलंदाजाच्याउपस्थितीचा गंभीर-लिन जोडीच्या फलंदाजीवर काही प्रभाव पडला नसता, असे कर्णधाराला वाटू शकते. दरम्यान, अन्य फ्रे न्चायजीने वगळलेल्या खेळाडूंना करारबद्ध करणे जोखमीचे ठरू शकते. फ्रे न्चायजी पैसा वाचविण्यासाठी वगळण्यात आलेल्या खेळाडूंना करारबद्ध करतात. या अती झटपट क्रिकेट स्पर्धेत गंभीरची शैली पूर्णपणे वेगळी असते. त्याची पायांची हालचाल वेगळीच भासते. गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटताक्षणीच गंभीरने आपला निर्धार पक्का केलेला असतो. फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याची आक्रमकता पाहण्याजोगी असते. धावा पळताना त्याची चपळाई एखाद्या किशोरवयीन खेळाडूप्रमाणे असते. लिनने आक्रमक खेळी करताना आक्रमक फलंदाज म्हणून छाप सोडली आहे. राजकोटमध्ये त्याने आठ षटकार लगावले. कोलकाताची ही आक्रमक जोडी मुंबई संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. त्याचसोबत मुंबई संघाला पीयूष चावला व कुलदीप यादव यांच्याविरुद्धही सावधगिरी बाळगावी लागेल. चावलाच्या प्रत्येक सत्रातील कामगिरीचा आलेख उंचावणारा आहे. युवा कुलदीप निर्णायक क्षणी बळी घेण्यात यशस्वी ठरत आहे. मुंबई संघाला आपल्या गोलंदाजीवर लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: शेजारी पुणे संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीत मुंबई संघाची गोलंदाजी साधारण होती. हरभजनला वगळण्याचा निर्णय धाडसी होता, पण भज्जीला यानंतरच्या लढतीत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून ते सिद्ध करावे लागेल. हरभजनसारख्या अनुभवी खेळाडूला केवळ प्रेम किंवा पैशासाठी विकत घेतले जात नाही. मुंबई संघाला त्याच्या लढवय्या खेळाची गरज आहे. सनरायजर्स संघाची सुरुवात चांगली झाली असून गुजरातविरुद्ध गतचॅम्पियन्स संघाचे पारडे वरचढ भासत आहे. दरम्यान, टी-२० मध्ये संघ व खेळाडूंच्या फॉर्मबाबत भाकीत वर्तविणे कठीण असते. कदाचित रैनाही हाच विचार करीत असेल.(पीएमजी)