शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

गंभीर-लिन जोडीने छाप सोडली

By admin | Updated: April 8, 2017 23:46 IST

कोलकाता संघाने गेल्या वर्षी गुणतालिकेत अव्वल स्थान भूषविणाऱ्या गुजरात संघाचा १० गडी राखून पराभव करीत आयपीएलच्या दहाव्या पर्वात जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने शानदार

- सुनील गावसकर लिहितात...कोलकाता संघाने गेल्या वर्षी गुणतालिकेत अव्वल स्थान भूषविणाऱ्या गुजरात संघाचा १० गडी राखून पराभव करीत आयपीएलच्या दहाव्या पर्वात जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने शानदार सुरुवात केली. टी-२० क्रिकेटमध्ये एखाद्या संघाने १०० धावा फटकावताना विकेट न गमावणे, असे क्वचितच घडते आणि गंभीर-लिन जोडीने १८४ धावांचे मोठे लक्ष्य विकेट न गमविता पूर्ण केले. त्यामुळे लायन्सच्या कर्णधाराला अपल्या गोलंदाजांच्या क्षमतेवर शंका व्यक्त करण्यास बाध्य केले. रैनाने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या लढतीत फॉकनरचा अपवाद वगळता सर्व भारतीय गोलंदाजांचा संघात समावेश केला. आॅस्ट्रेलियन गोलंदाजाच्याउपस्थितीचा गंभीर-लिन जोडीच्या फलंदाजीवर काही प्रभाव पडला नसता, असे कर्णधाराला वाटू शकते. दरम्यान, अन्य फ्रे न्चायजीने वगळलेल्या खेळाडूंना करारबद्ध करणे जोखमीचे ठरू शकते. फ्रे न्चायजी पैसा वाचविण्यासाठी वगळण्यात आलेल्या खेळाडूंना करारबद्ध करतात. या अती झटपट क्रिकेट स्पर्धेत गंभीरची शैली पूर्णपणे वेगळी असते. त्याची पायांची हालचाल वेगळीच भासते. गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटताक्षणीच गंभीरने आपला निर्धार पक्का केलेला असतो. फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याची आक्रमकता पाहण्याजोगी असते. धावा पळताना त्याची चपळाई एखाद्या किशोरवयीन खेळाडूप्रमाणे असते. लिनने आक्रमक खेळी करताना आक्रमक फलंदाज म्हणून छाप सोडली आहे. राजकोटमध्ये त्याने आठ षटकार लगावले. कोलकाताची ही आक्रमक जोडी मुंबई संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. त्याचसोबत मुंबई संघाला पीयूष चावला व कुलदीप यादव यांच्याविरुद्धही सावधगिरी बाळगावी लागेल. चावलाच्या प्रत्येक सत्रातील कामगिरीचा आलेख उंचावणारा आहे. युवा कुलदीप निर्णायक क्षणी बळी घेण्यात यशस्वी ठरत आहे. मुंबई संघाला आपल्या गोलंदाजीवर लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: शेजारी पुणे संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीत मुंबई संघाची गोलंदाजी साधारण होती. हरभजनला वगळण्याचा निर्णय धाडसी होता, पण भज्जीला यानंतरच्या लढतीत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून ते सिद्ध करावे लागेल. हरभजनसारख्या अनुभवी खेळाडूला केवळ प्रेम किंवा पैशासाठी विकत घेतले जात नाही. मुंबई संघाला त्याच्या लढवय्या खेळाची गरज आहे. सनरायजर्स संघाची सुरुवात चांगली झाली असून गुजरातविरुद्ध गतचॅम्पियन्स संघाचे पारडे वरचढ भासत आहे. दरम्यान, टी-२० मध्ये संघ व खेळाडूंच्या फॉर्मबाबत भाकीत वर्तविणे कठीण असते. कदाचित रैनाही हाच विचार करीत असेल.(पीएमजी)