शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

गंभीर-लिन जोडीने छाप सोडली

By admin | Updated: April 8, 2017 23:46 IST

कोलकाता संघाने गेल्या वर्षी गुणतालिकेत अव्वल स्थान भूषविणाऱ्या गुजरात संघाचा १० गडी राखून पराभव करीत आयपीएलच्या दहाव्या पर्वात जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने शानदार

- सुनील गावसकर लिहितात...कोलकाता संघाने गेल्या वर्षी गुणतालिकेत अव्वल स्थान भूषविणाऱ्या गुजरात संघाचा १० गडी राखून पराभव करीत आयपीएलच्या दहाव्या पर्वात जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने शानदार सुरुवात केली. टी-२० क्रिकेटमध्ये एखाद्या संघाने १०० धावा फटकावताना विकेट न गमावणे, असे क्वचितच घडते आणि गंभीर-लिन जोडीने १८४ धावांचे मोठे लक्ष्य विकेट न गमविता पूर्ण केले. त्यामुळे लायन्सच्या कर्णधाराला अपल्या गोलंदाजांच्या क्षमतेवर शंका व्यक्त करण्यास बाध्य केले. रैनाने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या लढतीत फॉकनरचा अपवाद वगळता सर्व भारतीय गोलंदाजांचा संघात समावेश केला. आॅस्ट्रेलियन गोलंदाजाच्याउपस्थितीचा गंभीर-लिन जोडीच्या फलंदाजीवर काही प्रभाव पडला नसता, असे कर्णधाराला वाटू शकते. दरम्यान, अन्य फ्रे न्चायजीने वगळलेल्या खेळाडूंना करारबद्ध करणे जोखमीचे ठरू शकते. फ्रे न्चायजी पैसा वाचविण्यासाठी वगळण्यात आलेल्या खेळाडूंना करारबद्ध करतात. या अती झटपट क्रिकेट स्पर्धेत गंभीरची शैली पूर्णपणे वेगळी असते. त्याची पायांची हालचाल वेगळीच भासते. गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटताक्षणीच गंभीरने आपला निर्धार पक्का केलेला असतो. फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याची आक्रमकता पाहण्याजोगी असते. धावा पळताना त्याची चपळाई एखाद्या किशोरवयीन खेळाडूप्रमाणे असते. लिनने आक्रमक खेळी करताना आक्रमक फलंदाज म्हणून छाप सोडली आहे. राजकोटमध्ये त्याने आठ षटकार लगावले. कोलकाताची ही आक्रमक जोडी मुंबई संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. त्याचसोबत मुंबई संघाला पीयूष चावला व कुलदीप यादव यांच्याविरुद्धही सावधगिरी बाळगावी लागेल. चावलाच्या प्रत्येक सत्रातील कामगिरीचा आलेख उंचावणारा आहे. युवा कुलदीप निर्णायक क्षणी बळी घेण्यात यशस्वी ठरत आहे. मुंबई संघाला आपल्या गोलंदाजीवर लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: शेजारी पुणे संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीत मुंबई संघाची गोलंदाजी साधारण होती. हरभजनला वगळण्याचा निर्णय धाडसी होता, पण भज्जीला यानंतरच्या लढतीत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून ते सिद्ध करावे लागेल. हरभजनसारख्या अनुभवी खेळाडूला केवळ प्रेम किंवा पैशासाठी विकत घेतले जात नाही. मुंबई संघाला त्याच्या लढवय्या खेळाची गरज आहे. सनरायजर्स संघाची सुरुवात चांगली झाली असून गुजरातविरुद्ध गतचॅम्पियन्स संघाचे पारडे वरचढ भासत आहे. दरम्यान, टी-२० मध्ये संघ व खेळाडूंच्या फॉर्मबाबत भाकीत वर्तविणे कठीण असते. कदाचित रैनाही हाच विचार करीत असेल.(पीएमजी)