शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

चवताळलेला भारत मालिकेत पुढेच...

By admin | Updated: March 9, 2017 04:26 IST

वादविवाद, कुरघोडी आणि शेरेबाजी या सर्व बाबी बाजूला सारल्या तरी दुसरी कसोटी कमालीची चुरशीची ठरली, असे थरारक क्रिकेट खेळण्यासाठी उच्च दर्जाचे कौशल्य,

- हर्षा भोगले लिहितो..वादविवाद, कुरघोडी आणि शेरेबाजी या सर्व बाबी बाजूला सारल्या तरी दुसरी कसोटी कमालीची चुरशीची ठरली, असे थरारक क्रिकेट खेळण्यासाठी उच्च दर्जाचे कौशल्य, खेळभावना, प्रेरकशक्ती आणि संकटांवर मात करण्याची वृत्ती असावी लागते. पराकोटीच्या संघर्षात भारताने मिळविलेला विजय शानदार ठरला. प्रेक्षकांनादेखील अशा प्रकारच्या शानदार खेळाची अपेक्षा होती.भारताने चारही दिवस विजयाच्या जिद्दीने खेळ केला. दुसरीकडे आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या डीएनएमध्येच झुंजारवृत्ती आहे. पण या सामन्यात झुंजारवृत्तीचा अभाव जाणवला. आशिया खंडात पूर्वी मॅथ्यू हेडन जसा धावा काढायचा तीच परंपरा सध्या डेव्हिड वॉर्नरने चालवायला हवी, असे आॅस्ट्रेलियाला वाटत असावे.चौथ्या दिवशी कौशल्यापेक्षा खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची गरज होती. भारतीय खेळाडूंमध्ये ती दिसली. १८७ धावा केल्यानंतरही विजय मिळविण्यासाठीच कोहली अँड कंपनीने सर्वस्व पणाला लावले. आॅस्ट्रेलिया संघाबाबत विचार केल्यास हे टार्गेट कठीण नव्हते. धावांचा पाठलाग करण्याचे डावपेचही ठरले होते. पण प्रत्यक्ष मैदानावर लढण्याची वेळ आली, तेव्हा खेळाडंूचे तंत्र चुकत गेले. त्यामुळेच चौथ्या दिवसाचा खेळ संपायच्या आतच हा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.कागदावर मालिका १-१ अशी बरोबरीत आली तरी भारत मालिकेत पुढे आहे. एखादा संघ पराभवातून धडा घेत जिंकतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वासही द्विगुणित झालेला असतो. ही ऐतिहासिक मालिका जिंकण्याची संधी आॅस्ट्रेलियालाबंगळुरूमध्येच होती. पण त्यांनी ती गमविल्याने पुढील दोन सामन्यांत विजय मिळविणे सोपे जाणार नाही. बंगळुरूत भारताला झालेला सर्वांत मोठा लाभ म्हणजे आश्विनचा आत्मविश्वास परतणे. आॅस्ट्रेलियाचे खेळाडू त्याची सतत धास्ती बाळगतील व आश्विन गोलंदाजीला येताच भारताला त्याचा सातत्याने लाभ होणार आहे.मालिकेत पुनरागमन आॅस्ट्रेलियासाठी वाटते तितके सोपे नाहीच. त्यासाठी वॉर्नरची बॅट तळपायला हवी. आशियात त्याच्या फारशा धावा नाहीत. स्मिथनेही डीआरएस वादात लक्ष न घालता फलंदाजीकडे ध्यान द्यावे. कोहलीने धावा काढल्या नसल्या तरी भारताने फलंदाजीचा दम दाखविला.रांचीत कोहलीचेही योगदान राहिले तर भारताला रोखणे आॅस्ट्रेलियासाठी एकूणच कठीण जाईल. या मालिकेचा निकाल ३-१ असा भारताच्या बाजूने राहू नये, यासाठी आता आॅस्ट्रेलियाच्या काळजीत भर पडू शकते. भारताला रोखण्यासाठी पाहुण्यांना आता चिंतन करावे लागेल.(पीएमजी)