शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

चवताळलेला भारत मालिकेत पुढेच...

By admin | Updated: March 9, 2017 04:26 IST

वादविवाद, कुरघोडी आणि शेरेबाजी या सर्व बाबी बाजूला सारल्या तरी दुसरी कसोटी कमालीची चुरशीची ठरली, असे थरारक क्रिकेट खेळण्यासाठी उच्च दर्जाचे कौशल्य,

- हर्षा भोगले लिहितो..वादविवाद, कुरघोडी आणि शेरेबाजी या सर्व बाबी बाजूला सारल्या तरी दुसरी कसोटी कमालीची चुरशीची ठरली, असे थरारक क्रिकेट खेळण्यासाठी उच्च दर्जाचे कौशल्य, खेळभावना, प्रेरकशक्ती आणि संकटांवर मात करण्याची वृत्ती असावी लागते. पराकोटीच्या संघर्षात भारताने मिळविलेला विजय शानदार ठरला. प्रेक्षकांनादेखील अशा प्रकारच्या शानदार खेळाची अपेक्षा होती.भारताने चारही दिवस विजयाच्या जिद्दीने खेळ केला. दुसरीकडे आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या डीएनएमध्येच झुंजारवृत्ती आहे. पण या सामन्यात झुंजारवृत्तीचा अभाव जाणवला. आशिया खंडात पूर्वी मॅथ्यू हेडन जसा धावा काढायचा तीच परंपरा सध्या डेव्हिड वॉर्नरने चालवायला हवी, असे आॅस्ट्रेलियाला वाटत असावे.चौथ्या दिवशी कौशल्यापेक्षा खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची गरज होती. भारतीय खेळाडूंमध्ये ती दिसली. १८७ धावा केल्यानंतरही विजय मिळविण्यासाठीच कोहली अँड कंपनीने सर्वस्व पणाला लावले. आॅस्ट्रेलिया संघाबाबत विचार केल्यास हे टार्गेट कठीण नव्हते. धावांचा पाठलाग करण्याचे डावपेचही ठरले होते. पण प्रत्यक्ष मैदानावर लढण्याची वेळ आली, तेव्हा खेळाडंूचे तंत्र चुकत गेले. त्यामुळेच चौथ्या दिवसाचा खेळ संपायच्या आतच हा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.कागदावर मालिका १-१ अशी बरोबरीत आली तरी भारत मालिकेत पुढे आहे. एखादा संघ पराभवातून धडा घेत जिंकतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वासही द्विगुणित झालेला असतो. ही ऐतिहासिक मालिका जिंकण्याची संधी आॅस्ट्रेलियालाबंगळुरूमध्येच होती. पण त्यांनी ती गमविल्याने पुढील दोन सामन्यांत विजय मिळविणे सोपे जाणार नाही. बंगळुरूत भारताला झालेला सर्वांत मोठा लाभ म्हणजे आश्विनचा आत्मविश्वास परतणे. आॅस्ट्रेलियाचे खेळाडू त्याची सतत धास्ती बाळगतील व आश्विन गोलंदाजीला येताच भारताला त्याचा सातत्याने लाभ होणार आहे.मालिकेत पुनरागमन आॅस्ट्रेलियासाठी वाटते तितके सोपे नाहीच. त्यासाठी वॉर्नरची बॅट तळपायला हवी. आशियात त्याच्या फारशा धावा नाहीत. स्मिथनेही डीआरएस वादात लक्ष न घालता फलंदाजीकडे ध्यान द्यावे. कोहलीने धावा काढल्या नसल्या तरी भारताने फलंदाजीचा दम दाखविला.रांचीत कोहलीचेही योगदान राहिले तर भारताला रोखणे आॅस्ट्रेलियासाठी एकूणच कठीण जाईल. या मालिकेचा निकाल ३-१ असा भारताच्या बाजूने राहू नये, यासाठी आता आॅस्ट्रेलियाच्या काळजीत भर पडू शकते. भारताला रोखण्यासाठी पाहुण्यांना आता चिंतन करावे लागेल.(पीएमजी)