शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चवताळलेला भारत मालिकेत पुढेच...

By admin | Updated: March 9, 2017 04:26 IST

वादविवाद, कुरघोडी आणि शेरेबाजी या सर्व बाबी बाजूला सारल्या तरी दुसरी कसोटी कमालीची चुरशीची ठरली, असे थरारक क्रिकेट खेळण्यासाठी उच्च दर्जाचे कौशल्य,

- हर्षा भोगले लिहितो..वादविवाद, कुरघोडी आणि शेरेबाजी या सर्व बाबी बाजूला सारल्या तरी दुसरी कसोटी कमालीची चुरशीची ठरली, असे थरारक क्रिकेट खेळण्यासाठी उच्च दर्जाचे कौशल्य, खेळभावना, प्रेरकशक्ती आणि संकटांवर मात करण्याची वृत्ती असावी लागते. पराकोटीच्या संघर्षात भारताने मिळविलेला विजय शानदार ठरला. प्रेक्षकांनादेखील अशा प्रकारच्या शानदार खेळाची अपेक्षा होती.भारताने चारही दिवस विजयाच्या जिद्दीने खेळ केला. दुसरीकडे आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या डीएनएमध्येच झुंजारवृत्ती आहे. पण या सामन्यात झुंजारवृत्तीचा अभाव जाणवला. आशिया खंडात पूर्वी मॅथ्यू हेडन जसा धावा काढायचा तीच परंपरा सध्या डेव्हिड वॉर्नरने चालवायला हवी, असे आॅस्ट्रेलियाला वाटत असावे.चौथ्या दिवशी कौशल्यापेक्षा खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची गरज होती. भारतीय खेळाडूंमध्ये ती दिसली. १८७ धावा केल्यानंतरही विजय मिळविण्यासाठीच कोहली अँड कंपनीने सर्वस्व पणाला लावले. आॅस्ट्रेलिया संघाबाबत विचार केल्यास हे टार्गेट कठीण नव्हते. धावांचा पाठलाग करण्याचे डावपेचही ठरले होते. पण प्रत्यक्ष मैदानावर लढण्याची वेळ आली, तेव्हा खेळाडंूचे तंत्र चुकत गेले. त्यामुळेच चौथ्या दिवसाचा खेळ संपायच्या आतच हा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.कागदावर मालिका १-१ अशी बरोबरीत आली तरी भारत मालिकेत पुढे आहे. एखादा संघ पराभवातून धडा घेत जिंकतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वासही द्विगुणित झालेला असतो. ही ऐतिहासिक मालिका जिंकण्याची संधी आॅस्ट्रेलियालाबंगळुरूमध्येच होती. पण त्यांनी ती गमविल्याने पुढील दोन सामन्यांत विजय मिळविणे सोपे जाणार नाही. बंगळुरूत भारताला झालेला सर्वांत मोठा लाभ म्हणजे आश्विनचा आत्मविश्वास परतणे. आॅस्ट्रेलियाचे खेळाडू त्याची सतत धास्ती बाळगतील व आश्विन गोलंदाजीला येताच भारताला त्याचा सातत्याने लाभ होणार आहे.मालिकेत पुनरागमन आॅस्ट्रेलियासाठी वाटते तितके सोपे नाहीच. त्यासाठी वॉर्नरची बॅट तळपायला हवी. आशियात त्याच्या फारशा धावा नाहीत. स्मिथनेही डीआरएस वादात लक्ष न घालता फलंदाजीकडे ध्यान द्यावे. कोहलीने धावा काढल्या नसल्या तरी भारताने फलंदाजीचा दम दाखविला.रांचीत कोहलीचेही योगदान राहिले तर भारताला रोखणे आॅस्ट्रेलियासाठी एकूणच कठीण जाईल. या मालिकेचा निकाल ३-१ असा भारताच्या बाजूने राहू नये, यासाठी आता आॅस्ट्रेलियाच्या काळजीत भर पडू शकते. भारताला रोखण्यासाठी पाहुण्यांना आता चिंतन करावे लागेल.(पीएमजी)