शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

'चढउतार आयुष्याचा भाग, पुढे जाण्याआधी ‘रेड सिग्नल’वर थांबलेले बरे'' : सुशील कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:56 IST

तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर मॅटवर पुनरागमन करणारा आॅलिम्पिकचे दुहेरी पदक विजेता मल्ल सुशील कुमार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या पूर्वसंध्येला मनातील बोलला.

इंदूर : तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर मॅटवर पुनरागमन करणारा आॅलिम्पिकचे दुहेरी पदक विजेता मल्ल सुशील कुमार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या पूर्वसंध्येला मनातील बोलला. ‘चढउतार आयुष्याचा भाग असून, पुढे जाण्याआधी रेड सिग्नलवर थांबून प्रतीक्षा करणेदेखील गरजेचे असते,’ असे सुशीलचे मत पडले.गुरू महाबली सतपाल यांचा आदेश मिळताच मॅटवर परतल्याचे सांगून सुशील म्हणाला, ‘माणूस पुढे जातो तेव्हा त्याला चढउताराचा सामना देखील करावा लागतो. तीन वर्षांनंतर मॅटवर परतताना युवा मल्लासारखा अनुभव घेत आहे. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खेळताना मल्ल नवखा असो वा अनुभवी, सर्वांना स्फूर्ती लाभतेच.’भारताला दोनदा आॅलिम्पिक पदक मिळवून देणाºया ३४ वर्षांच्या सुशीलला गेल्या काही वर्षांत बºयाच चढउतारांचा सामना करावा लागला. यासंदर्भात विचारताच तो म्हणाला, ‘यशाची पायरी चढण्याआधी ठेच लागली तर माणूस सावरतो. पुढे जाण्याआधी रेड सिग्नलवर थांबलेले बरे. पुढे कसे जायचे याचा विचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. आयुष्यात यश मिळवायचे झाल्यास हाच मंत्र लक्षात ठेवावा लागेल.७४ किलो गटात सुशील रेल्वेतर्फे आज शुक्रवारी मॅटवर उतरणार आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांविषयी विचारताच तो म्हणाला, ‘सध्यातरी मी राष्ट्रीय स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे पुन्हा एकदा देशाचे प्रतिनिधित्व करू शकेन, असा विश्वास वाटतो.’सुशीलने अखेरची कुस्ती २०१४ च्या ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत खेळली होती. त्या वेळी त्याने सुवर्ण जिंकले. २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकमध्ये मात्र त्याला सहभागी होता आले नाही. रेसलिंग फेडरेशन आॅफ इंडियाने रिओ आॅलिम्पिकमध्ये ७४ किलो गटात भारताचे प्रतिनिधित्व कोण करेल यासाठी आधी नरसिंग यादव आणि सुशील यांच्यात निवड चाचणी घेण्याचे ठरविले होते; पण ऐनवेळी शब्द फिरविल्याने सुशीलने न्यायालयातधाव घेतली. दिल्ली उच्च न्यायालयाने चाचणीची सुशीलची मागणी फेटाळली होती. (वृत्तसंस्था)सुशील कुमारने पुनरागमनाचा घेतलेला निर्णय पाहून मला खूप आनंद झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची अट सुशील कुमारसाठी अनिवार्य नसेल. आणि आम्ही कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची अट घालणार नाही. दुखापत किंवा वैयक्तिक कारणामुळे कोणीही राष्ट्रीय स्पर्धेपासून दूर राहू शकतो.- ब्रिजभूषण शरण सिंग, अध्यक्ष, भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआय)