शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

फायनलपूर्वीची ‘फायनल’: अब्दुल कादीर

By admin | Updated: February 4, 2015 01:59 IST

आगामी विश्वचषकात आशियातील एकच संघ उपांत्य फेरीत दाखल होईल असे भाकीत वर्तवित १५ फेब्रुवारी रोजी आयोजित भारत-पाक लढत ही फायनलपूर्वीची ‘फायनल’ असेल,

नवी दिल्ली : आगामी विश्वचषकात आशियातील एकच संघ उपांत्य फेरीत दाखल होईल असे भाकीत वर्तवित १५ फेब्रुवारी रोजी आयोजित भारत-पाक लढत ही फायनलपूर्वीची ‘फायनल’ असेल, असे मत पाकचा माजी फिरकी गोलंदाज अब्दुल कादीर याने म्हटले आहे.महान लेगस्पिनर राहिलेला कादीर म्हणाला, ‘‘भारत आणि पाक हे ब गटात असून, अ‍ॅडिलेड येथे परस्परांविरुद्ध खेळतील. माझ्या मते आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि द. आफ्रिका हे उपांत्य फेरीचे प्रबळ दावेदार असून, चौथा संघ भारत-पाक लढतीद्वारे निश्चित होईल. जिंकणाऱ्या संघाचे मनोबळ उंचावेल; शिवाय बाद फेरी गाठण्याची शक्यता बळावेल.’’ मागचे रेकॉर्ड बघता सामन्यात भारताचे पारडे जड राहील ही बाब कादीरला मान्य नाही. त्याच्या मते उभय संघांना सारखीच संधी राहील. जो संघ धावांचा पाठलाग करेल त्या संघाला अ‍ॅडिलेड मैदानावर झुकते माप असेल, असे वाटते. भारताला वीरेंद्र सेहवाग आणि युवराजसिंग यांची उणीव जाणवेल, असेही कादीरचे मत आहे. तो म्हणाला, ‘‘सेहवाग आणि युवीसारख्यांना संघात स्थान नाकारण्यात आले याचे मला आश्चर्य वाटते. आशियातील संघांना अशा चुका करण्याची सवय झाली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर मानसिक दबाव येतो. हे दोन्ही खेळाडू असतील तर चार गोलंदाजांसह खेळण्याचा पर्याय उपलब्ध असतो. युवीने गेल्या विश्वचषकात डावखुरी गोलंदाजी करीत मोलाची भूमिका वठविली होती.’’टीम इंडियात लेग स्पिनर पीयूष चावला आणि अमित मिश्रा यांना स्थान मिळायला हवे होते, असे सांगून कादीर पुढे म्हणतो, ‘‘भारताकडे धडकी भरविणारे वेगवान गोलंदाज नाहीत. फिरकी ही त्यांच्या जमेची बाजू आहे. चावला आणि मिश्रा यांना संधी मिळाली असती तर गोलंदाजी आणखी भक्कम बनली असती. (वृत्तसंस्था)भारताकडे महेंद्रसिंह धोनीसारखा चाणाक्ष कर्णधार आहे, पण अन्य खेळाडूंना सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी लागेल. केवळ कर्णधार संघाला विजय मिळवून देऊ शकत नाही. धोनी उत्कृष्ट कर्णधार असला तरी दहा खेळाडूंचे योगदानही तितेकच महत्त्वाचे राहील. तिरंगी मालिकेतील सामने मी पाहिले. ‘मॅचविनर’ अशी ख्याती असलेले कोहली आणि सुरेश रैना यांना चुकीच्या पद्धतीने बाद होताना पाहून मला फार वाईट वाटले.- अब्दुल कादीर