शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

फायनलपूर्वीची ‘फायनल’: अब्दुल कादीर

By admin | Updated: February 4, 2015 01:59 IST

आगामी विश्वचषकात आशियातील एकच संघ उपांत्य फेरीत दाखल होईल असे भाकीत वर्तवित १५ फेब्रुवारी रोजी आयोजित भारत-पाक लढत ही फायनलपूर्वीची ‘फायनल’ असेल,

नवी दिल्ली : आगामी विश्वचषकात आशियातील एकच संघ उपांत्य फेरीत दाखल होईल असे भाकीत वर्तवित १५ फेब्रुवारी रोजी आयोजित भारत-पाक लढत ही फायनलपूर्वीची ‘फायनल’ असेल, असे मत पाकचा माजी फिरकी गोलंदाज अब्दुल कादीर याने म्हटले आहे.महान लेगस्पिनर राहिलेला कादीर म्हणाला, ‘‘भारत आणि पाक हे ब गटात असून, अ‍ॅडिलेड येथे परस्परांविरुद्ध खेळतील. माझ्या मते आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि द. आफ्रिका हे उपांत्य फेरीचे प्रबळ दावेदार असून, चौथा संघ भारत-पाक लढतीद्वारे निश्चित होईल. जिंकणाऱ्या संघाचे मनोबळ उंचावेल; शिवाय बाद फेरी गाठण्याची शक्यता बळावेल.’’ मागचे रेकॉर्ड बघता सामन्यात भारताचे पारडे जड राहील ही बाब कादीरला मान्य नाही. त्याच्या मते उभय संघांना सारखीच संधी राहील. जो संघ धावांचा पाठलाग करेल त्या संघाला अ‍ॅडिलेड मैदानावर झुकते माप असेल, असे वाटते. भारताला वीरेंद्र सेहवाग आणि युवराजसिंग यांची उणीव जाणवेल, असेही कादीरचे मत आहे. तो म्हणाला, ‘‘सेहवाग आणि युवीसारख्यांना संघात स्थान नाकारण्यात आले याचे मला आश्चर्य वाटते. आशियातील संघांना अशा चुका करण्याची सवय झाली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर मानसिक दबाव येतो. हे दोन्ही खेळाडू असतील तर चार गोलंदाजांसह खेळण्याचा पर्याय उपलब्ध असतो. युवीने गेल्या विश्वचषकात डावखुरी गोलंदाजी करीत मोलाची भूमिका वठविली होती.’’टीम इंडियात लेग स्पिनर पीयूष चावला आणि अमित मिश्रा यांना स्थान मिळायला हवे होते, असे सांगून कादीर पुढे म्हणतो, ‘‘भारताकडे धडकी भरविणारे वेगवान गोलंदाज नाहीत. फिरकी ही त्यांच्या जमेची बाजू आहे. चावला आणि मिश्रा यांना संधी मिळाली असती तर गोलंदाजी आणखी भक्कम बनली असती. (वृत्तसंस्था)भारताकडे महेंद्रसिंह धोनीसारखा चाणाक्ष कर्णधार आहे, पण अन्य खेळाडूंना सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी लागेल. केवळ कर्णधार संघाला विजय मिळवून देऊ शकत नाही. धोनी उत्कृष्ट कर्णधार असला तरी दहा खेळाडूंचे योगदानही तितेकच महत्त्वाचे राहील. तिरंगी मालिकेतील सामने मी पाहिले. ‘मॅचविनर’ अशी ख्याती असलेले कोहली आणि सुरेश रैना यांना चुकीच्या पद्धतीने बाद होताना पाहून मला फार वाईट वाटले.- अब्दुल कादीर