शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक फॉरमॅटला वेगळा कर्णधार नको

By admin | Updated: January 14, 2017 01:22 IST

क्रिकेटमधील प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार नेमण्याची व्यवस्था भारतात यशस्वी ठरणार नाही, असे सांगत महेंद्रसिंग धोनीने

पुणे : क्रिकेटमधील प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार नेमण्याची व्यवस्था भारतात यशस्वी ठरणार नाही, असे सांगत महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे शुक्रवारी समर्थन केले. भारतीय क्रिकेटविश्वातील सर्वांत यशस्वी कर्णधार असलेल्या ‘कॅप्टन कूल’ माहीने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्योने नेहमीच्याच बेधडक पद्धतीने प्रश्नांचे बाऊन्सर परतवून लावले. भारत-इंग्लंड यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील पहिली लढत येत्या रविवारी पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) मैदानावर होत आहे. एकदिवसीय संघाचा नियमित कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही पहिलीच लढत असेल. आपण कधीच ‘स्प्लिट कॅप्टन्सी’च्या बाजूने नव्हतो, असे नमूद करून धोनी म्हणाला, ‘‘माझ्या मते, सर्व प्रकारांसाठी एकच कर्णधार असावा. भारतातही अशी व्यवस्था चालत नाही. विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आल्यानंतर एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही त्याच्याकडे द्यावे, यासाठी मी योग्य वेळेची प्रतीक्षा करीत होतो. ही योग्य वेळ आता आली असल्याचे मला वाटले आणि मी वन-डे आणि टष्ट्वेंंटी-२0च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.’’ (क्रीडा प्रतिनिधी)कर्णधारपदाच्या प्रवासाचा आनंद लुटलादीर्घकाळ भारतीय संघाचे नेतृत्व केल्यानंतर हे पद सोडताना तुला काय वाटते, या प्रश्नाच्या उत्तरात धोनी म्हणाला, ‘‘कर्णधारपदाच्या काळाकडे मी एक प्रवास म्हणून पाहतो. २००४मध्ये मी संघात आलो. २००७मध्ये माझ्याकडे सर्वप्रथम संघाची धुरा सोपविण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंतच्या प्रवासात अनेक गोष्टी बदलल्या. त्यानुसार माझी भूमिका बदलली. प्रथम कर्णधार झालो तेव्हा संघात अनेक सिनियर खेळाडू होते. त्यांच्या निवृत्तीनंतर पोकळी निर्माण होऊ नये, म्हणून आधीपासूनच मी नव्या दमाच्या खेळाडूंना तयार करण्याचे प्रयत्न केले. सीनियर्स निवृत्त झाल्यावर ज्युनिअर्सनी आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडली. ते भारतीय क्रिकेटचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे, याचा आनंद वाटतो. कर्णधारपदाच्या कालखंडात अनेक उतार-चढाव आले; मात्र आयुष्यात मी कुठल्याच गोष्टीचा पश्चात्ताप करीत नाही. मी या प्रवासाचा आनंद लुटला.’’बीसीसीआयला आधीच कल्पना दिली होती...बीसीसीआयच्या दबावाखाली धोनीने एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. हे वृत्त अप्रत्यक्षपणे फेटाळून लावताना तो म्हणाला, ‘‘बीसीसीआयला खूप आधी मी या निर्णयाबाबत कळविले होते. २०१४मध्ये आॅस्ट्रेलिया दौरा आटोपल्यानंतर मी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून एकदिवसीय संघाचेही नेतृत्व सोडण्याचा विचार मनात घोळत होता. योग्यवेळी तो अमलात आणला.’’