शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

प्रत्येक फॉरमॅटला वेगळा कर्णधार नको

By admin | Updated: January 14, 2017 01:22 IST

क्रिकेटमधील प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार नेमण्याची व्यवस्था भारतात यशस्वी ठरणार नाही, असे सांगत महेंद्रसिंग धोनीने

पुणे : क्रिकेटमधील प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार नेमण्याची व्यवस्था भारतात यशस्वी ठरणार नाही, असे सांगत महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे शुक्रवारी समर्थन केले. भारतीय क्रिकेटविश्वातील सर्वांत यशस्वी कर्णधार असलेल्या ‘कॅप्टन कूल’ माहीने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्योने नेहमीच्याच बेधडक पद्धतीने प्रश्नांचे बाऊन्सर परतवून लावले. भारत-इंग्लंड यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील पहिली लढत येत्या रविवारी पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) मैदानावर होत आहे. एकदिवसीय संघाचा नियमित कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही पहिलीच लढत असेल. आपण कधीच ‘स्प्लिट कॅप्टन्सी’च्या बाजूने नव्हतो, असे नमूद करून धोनी म्हणाला, ‘‘माझ्या मते, सर्व प्रकारांसाठी एकच कर्णधार असावा. भारतातही अशी व्यवस्था चालत नाही. विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आल्यानंतर एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही त्याच्याकडे द्यावे, यासाठी मी योग्य वेळेची प्रतीक्षा करीत होतो. ही योग्य वेळ आता आली असल्याचे मला वाटले आणि मी वन-डे आणि टष्ट्वेंंटी-२0च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.’’ (क्रीडा प्रतिनिधी)कर्णधारपदाच्या प्रवासाचा आनंद लुटलादीर्घकाळ भारतीय संघाचे नेतृत्व केल्यानंतर हे पद सोडताना तुला काय वाटते, या प्रश्नाच्या उत्तरात धोनी म्हणाला, ‘‘कर्णधारपदाच्या काळाकडे मी एक प्रवास म्हणून पाहतो. २००४मध्ये मी संघात आलो. २००७मध्ये माझ्याकडे सर्वप्रथम संघाची धुरा सोपविण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंतच्या प्रवासात अनेक गोष्टी बदलल्या. त्यानुसार माझी भूमिका बदलली. प्रथम कर्णधार झालो तेव्हा संघात अनेक सिनियर खेळाडू होते. त्यांच्या निवृत्तीनंतर पोकळी निर्माण होऊ नये, म्हणून आधीपासूनच मी नव्या दमाच्या खेळाडूंना तयार करण्याचे प्रयत्न केले. सीनियर्स निवृत्त झाल्यावर ज्युनिअर्सनी आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडली. ते भारतीय क्रिकेटचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे, याचा आनंद वाटतो. कर्णधारपदाच्या कालखंडात अनेक उतार-चढाव आले; मात्र आयुष्यात मी कुठल्याच गोष्टीचा पश्चात्ताप करीत नाही. मी या प्रवासाचा आनंद लुटला.’’बीसीसीआयला आधीच कल्पना दिली होती...बीसीसीआयच्या दबावाखाली धोनीने एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. हे वृत्त अप्रत्यक्षपणे फेटाळून लावताना तो म्हणाला, ‘‘बीसीसीआयला खूप आधी मी या निर्णयाबाबत कळविले होते. २०१४मध्ये आॅस्ट्रेलिया दौरा आटोपल्यानंतर मी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून एकदिवसीय संघाचेही नेतृत्व सोडण्याचा विचार मनात घोळत होता. योग्यवेळी तो अमलात आणला.’’