शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गर्विष्ठ बनू नका, खेळावर ‘फोकस’ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 03:20 IST

थोडे यश मिळाले तरी महान खेळाडू बनल्याचा आवेग भारतीय खेळाडूंमध्ये संचारतो. डोक्यात लवकर ‘हवा’ गेल्यास मिळालेले यश मातीमोल तर होतेच पण पुढील वाटचालही मंदावते.

- किशोर बागडे (थेट गुवाहाटी येथून...)थोडे यश मिळाले तरी महान खेळाडू बनल्याचा आवेग भारतीय खेळाडूंमध्ये संचारतो. डोक्यात लवकर ‘हवा’ गेल्यास मिळालेले यश मातीमोल तर होतेच पण पुढील वाटचालही मंदावते. अनेक खेळाडूंचे करिअर असेच संपुष्टात आले. अजून बराच टप्पा गाठायचा आहे, हे डोक्यात ठेवून खेळावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केंद्र शासनाद्वारे नियुक्त राष्टÑीय पर्यवेक्षक आणि अनुभवी आॅलिम्पियन बॉक्सर अखिल कुमार याने केले आहे. विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य सामन्यासाठी पत्नी पूनम आणि साडेसहा वर्षांच्या कन्येसह येथे आलेला अखिल बॉक्सिंगमधील युवा टॅलेंटबद्दल बोलला. युवा खेळाडूंना स्वत:चे टॅलेंट टिकविण्याचे त्याने आवाहन केले. खेळासोबतच नवनव्या गोष्टी आत्मसात करा आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. नव्या दमाच्या खेळाडूंनी थोड्याशा यशात हूरळून जावू नये. जो स्वत:ला मोठा खेळाडू समजतो, तो संपतो, हे अनेक खेळाडूंच्या वाटचालीवरून सिद्ध झाल्याचे अखिलचे मत होते. खेळाडू कितीही मोठा झाला तरी त्याचा मूळ स्वभाव बदलू नये.’ स्वभावाने मितभाषी असलेले खेळाडू प्रत्यक्ष खेळातही प्रभावी ठरू शकतात. त्यांच्यात जिंकण्याची भूक आहे. पण यशाची हवा डोक्यात शिरायला नको. वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम व्हायचा ध्यास खेळाडूंनी सतत बाळगला पाहिजे. खेळात प्रगती साधण्यासाठी फिजिओ, कोच आणि डॉक्टर यांचा सल्ला तंतोतंत अंमलात आणणे गरजेचे आहे. आपणच सर्वशक्तीमान असल्याची भावना मनात आणू नका. जे चांगले ते आत्मसात करा, असे अखिलने बॉक्सर्सना उद्देशून सांगितले. शिक्षणाचे खेळाडूंच्या जीवनात किती महत्त्व असते, हे पटवून देत अखिलने खेळाडूंना भााषेचा अडसर येत असेल तर कधीकधी ‘ध चा मा’ व्हायला वेळ लागत नसल्याचे सांगितले. विदेशी खेळाडू आणि कोच यांंचे डावपेच समजून घेण्यासाठी देखील शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळे आत्मविश्वास आणि संमजसपणा वाढीस लागतो. स्वत:च्या कन्येला बॉक्सिंगमध्ये आणणार नाही, असेस्पष्ट करीत ३६ वर्षांचा अखिल म्हणाला, ‘बॉक्सिंग आवडत असेल तर मी तिला ग्लोज घालायला मनाई करणार नाही, पण खेळासोबत शिक्षण महत्त्वपूर्ण आहे.बॉलिवूडशी परिचित असलेल्या अखिलने ‘लेकर हम दिवाना दिल’ या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. सध्याच्या खेळाडूंमधील पदकविजेत्या खेळाडूंवर सरकार बारकाईने लक्ष ठेवणार असून आगामी एशियाडसाठी त्यांच्या पदकाच्या आशा शोधण्याचे काम करणार असल्याचे अखिलने सांगितले.

टॅग्स :boxingबॉक्सिंग