शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

ऑलिम्पिकसाठी धडपडणाऱ्या मल्लांच्या अडचणी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 01:11 IST

बजरंगसह दीपक पुनिया (८६ किलो), रवी दहिया (५७ किलो) आणि विनेश फोगाट (महिला ५३ किलो) यांनी टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठली आहे.

नवी दिल्ली : कोरोनामुळे वर्षभरासाठी लांबणीवर टाकण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठण्यासाठी धडपडणाऱ्या मल्लांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याची चिंता भारताचा आघाडीचा मल्ल बजरंग पुनिया याने शुक्रवारी व्यक्त केली.‘ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या माझ्यासारख्या मल्लांपुढे पदक जिंकणे हेच लक्ष्य असल्याने त्यादृष्टीने सरावाकडे वळलो आहे. दुसरीकडे ज्यांनी अद्याप पात्रता गाठलेली नाही, त्यांचे काय? सध्या स्पर्धा आयोजन नसल्यामुळे माझी कामगिरी किती सुधारली याचा वेध घेणे देखील कठीण आहे,’या शब्दात ६५ किलो गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बजरंगने चिंता व्यक्त केली. एका वेबिनारमध्ये बोलताना कुस्तीत आॅलिम्पिक पदकाचे आशास्थान असलेला बजरंग पुढे म्हणाला, ‘आम्ही सर्वजण लॉकडाऊनमध्ये असलो तरी मी दररोज सराव करत आहे. माझ्या सभोवताल चांगले लोक आहेत.’बजरंगसह दीपक पुनिया (८६ किलो), रवी दहिया (५७ किलो) आणि विनेश फोगाट (महिला ५३ किलो) यांनी टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठली आहे. कार्यक्रमात सहभागी झालेली विश्व चॅम्पियनशिपची पदक विजेती पूजा ढांढा म्हणाली,‘स्पर्धा कुठलीही असली तरी खरी परीक्षा त्या दीड महिन्याच्या कालावधीत असते. शरीर त्यानुसार प्रतिक्रिया देते. कोरोनामुळे स्पर्धांचे आयोजन होऊ न शकणे आमच्यासाठी कठीण ठरत आहे.’ एक सप्टेंबरपासून सुरू होणाºया राष्टÑीय शिबिरात (पुरुषांसाठी सोनिपत आणि महिलांसाठी लखनौ) ही उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न असेल, असे दोन्ही मल्लांनी सांगितले.(वृत्तसंस्था)