शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

धोनी १३ वर्षांनंतर ट्रेनमध्ये

By admin | Updated: February 23, 2017 01:10 IST

महागड्या दुचाकी आणि आलिशान वाहने सुसाट वेगाने पळविण्यात तरबेज असलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार

कोलकाता : महागड्या दुचाकी आणि आलिशान वाहने सुसाट वेगाने पळविण्यात तरबेज असलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने मंगळवारच्या रात्री आलिशन कारकडे पाठ फिरवित झारखंड संघातील सहकाऱ्यांसोबत ‘रांची ते हावडा’ असा सेकंड एसी ट्रेनने प्रवास केला.द. पूर्व रेल्वेचा माजी कर्मचारी असलेल्या धोनीला ट्रेनमध्ये पाहून रेल्वेचे कर्मचारीदेखील अवाक झाले होते. विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट खेळण्यासाठी धोनी येथे आला आहे. धोनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर झारखंडच्या संघ सहकाऱ्यांसोबतचा एक फोटो पोस्ट केला. भारतीय कसोटी संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध पुण्यात कसोटीत व्यस्त आहे. (वृत्तसंस्था)धोनी कसोटीतून निवृत्त झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून दूर आहे. राष्ट्रीय संघात सध्या धोनीचा समावेश नसला, तरी तो क्रि केटपासून काही दूर राहिलेला नाही. आगामी विजय हजारे स्पर्धेसाठी धोनीकडे झारखंडचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रि केटमधील करिश्मा सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे धोनीचे नेतृत्व झारखंडसाठी खूप उपयुक्त ठरेल यात काहीच शंका नाही. धोनीच्या उपस्थितीमुळे संघातील युवा खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल.२००० च्या दशकात धोनी खडगपूर येथे २००१ ते २००४ दरम्यान दपूम रेल्वेत टीसी होता. त्यावेळचा त्याचा संघर्ष नुकताच रूपेरी पडद्यावर आला आहे. आज देशाचा सर्वांत यशस्वी कर्णधार राहिल्यानंतर त्याने सेकंड एसीत प्रवास करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. १३ वर्षांनंतर प्रवास करताना धोनीने कुठलीही विशेष सेवा मागितली नाही हे विशेष.दपूम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी संजय घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंड संघाने प्रवासासाठी विशेष कोच आरक्षित केला नव्हता. अन्य प्रवाशांसोबत माहीसमवेत २३ जणांचे बुकिंग होते. क्रिया योगी एक्स्प्रेसमध्ये धोनी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी दाखल झाला. हावडा स्टेशनवर सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी ही ट्रेन दाखल झाली. त्याआधी खडगपूर येथे पहाटे ४.१५ वाजता ही ट्रेन दाखल झाली. या ट्रेनला विशेष सुरक्षा देण्यात आली.धोनी याआधी रणजी सामन्याच्या वेळी झारखंडच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरात उपस्थित होता. झारखंडमध्ये सामना असताना संघाच्या बसमधून जाण्याऐवजी धोनीने आपल्या आलिशान कारमधून प्रवास करणे पसंत केल्याचे आपण याआधीही पाहिले आहे. पण यावेळी झारखंडचे युवा खेळाडू ट्रेनने प्रवास करणार असल्याने धोनीनेही आपली स्वत:ची कार टाळून सहकाऱ्यांसोबत ट्रेननेच प्रवास केला. कोलकाताच्या ईडन गार्डनवर विजय हजारे करंडक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. येत्या २५ तारखेपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून झारखंडला कर्नाटकविरुद्ध पहिला सामना त्याच दिवशी खेळायचा आहे.(वृत्तसंस्था)