शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

धोनीकडून नेतृत्वाचे धडे घेत आहे : कोहली

By admin | Updated: February 3, 2017 05:00 IST

‘‘मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये निर्णय घेण्यासाठी महेंद्रसिंह धोनीच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ मिळत आहे,’’ अशी प्रतिक्रिया भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली.

बंगळुरू : ‘‘मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये निर्णय घेण्यासाठी महेंद्रसिंह धोनीच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ मिळत आहे,’’ अशी प्रतिक्रिया भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदासाठी अद्याप मी नवा आहे, असेही तो म्हणाला. भारताने बुधवारी रात्री तिसऱ्या व अखेरच्या टी-२० सामन्यात ७५ धावांच्या मोठ्या फरकाने इंग्लंडवर विजय मिळवून टी-२० मालिकेत २-१ ने सरशी साधली. कोहली म्हणाला, ‘‘मी कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे, पण वन-डे व टी-२० क्रिकेट वेगवान असते. त्यामुळे या प्रकारच्या क्रिकेटमध्ये मोक्याच्या क्षणी धोनीसारख्या व्यक्तीचा सल्ला घेतो. धोनीला अशा प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याला खेळाचे चांगले ज्ञान आहे.’’विराटने खुलासा केला, की चमकदार कामगिरी करणाऱ्या यजुवेंद्र चहलचा गोलंदाजीचा कोटा संपल्यानंतर मी हार्दिक पंड्याला गोलंदाजीसाठी पाचारण करणार होतो, पण धोनी व आशिष नेहरा यांनी चेंडू जसप्रीत बुमराहकडे सोपविण्याचा सल्ला दिला. त्याने तीन चेंडूंमध्ये दोन बळी घेत सामना संपविला. कोहली पुढे म्हणाला, ‘‘मी कर्णधारपदासाठी नवा नाही, पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्यासाठी ज्या प्रकारचे कौशल्य आवश्यक असते ते समजण्यासाठी संतुलन असायला हवे. त्यासाठी महेंद्रसिंह धोनीची मोठी मदत झाली. भारतीय संघाने वेगाने प्रगती केली आहे. संघात अनेक युवा खेळाडू आहेत.’’ आम्हाला अपेक्षेप्रमाणे निकाल मिळाले आहेत. तिन्ही मालिका जिंकल्यामुळे समाधान वाटत आहे. (वृत्तसंस्था)- मधल्या षटकांमध्ये विकेट घेतल्या नाही तर बंगळुरूमध्ये कुठलेही लक्ष्य गाठणे शक्य असते. येथे कुठलेही लक्ष्य मोठे वाटत नाही आणि जगातील कुठलाही फलंदाज झटपट धावा फटकावू शकतो. त्यामुळे या लढतीत मधल्या षटकांमध्ये चहलने बळी घेत आमचे काम सोपे केले. इंग्लंडचा डाव गडगडला असला तरी आयपीएल लिलावामध्ये इंग्लंडच्या खेळाडूंच्या निवडीवर त्याचा कुठलाही प्रभाव पडणार नाही. पाहुण्या संघाने ८ धावांत ८ फलंदाज गमावले. त्यामुळे त्यांना मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.- विराट कोहली