शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

धोनी मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी सज्ज

By admin | Updated: September 19, 2015 22:19 IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ आॅक्टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या टी-२० व वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवड समिती रविवारी संघाची निवड करणार आहे.

द. आफ्रिकेविरुद्ध मालिका : भारतीय टी-२०, वन-डे संघाची निवड आजबेंगळुरू : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ आॅक्टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या टी-२० व वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवड समिती रविवारी संघाची निवड करणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा सर्वांची नजर मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीवर राहणार आहे. निवड समिती टी-२० मालिका व पहिल्या तीन वन-डे सामन्यांसाठी संघाची निवड करण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका संघाच्या दौऱ्याची सुरुवात तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेने होणार आहे. त्यामुळे धोनी व निवड समितीचे लक्ष पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेवर राहणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताचा दुय्यम दर्जाचा संघ गेला होता. या संघात सात अव्वल खेळाडूंचा समावेश नव्हता. आता धोनी, विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन हे सर्व खेळाडू फिट आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंना सीनियर खेळाडूंसाठी स्थान निर्माण करून द्यावे लागेल. सलामीवीर शिखर धवनची दुखापत केवळ चिंतेचा विषय आहे. त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्याची फिटनेस चाचणी अद्याप झालेली नाही. कसोटी स्पेशालिस्ट सलामीवीर मुरली विजयची झिम्बाब्वे दौऱ्यातील कामगिरी समाधानकारक होती. मर्यादित षटकांच्या समान्यांत तो उपयुक्तता सिद्ध करण्यास उत्सुक आहे. स्ट्राईक रोटेट करण्यात यशस्वी ठरत असल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये धोनीने अजिंक्य रहाणेच्या तुलनेत अंबाती रायडूला झुकते माप दिले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणारा केदार जाधव आणि मनीष पांडे यांच्या नावाचाही विचार होण्याची शक्यता आहे.भारत ‘अ’ संघातर्फे चमकदार कामगिरी करणारा पंजाबचा गुरकिरत सिंग मान आणि कर्नाटकचा मयंक अग्रवाल यांच्यासारखे नवे चेहरे निवड होण्याच्या शर्यतीत असू शकतात. अश्विनची निवड होणे निश्चित असून, दुसरा फिरकीपटू म्हणून निवड समिती हरभजन सिंगला प्राधान्य देते किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवींद्र जडेजाचा विचार करता आला नव्हता. पण यावेळी त्याच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये ईशांत शर्माला संधी मिळाली, तर तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करण्यास उत्सुक आहे. ईशांतवर एका कसोटी सामन्याची बंदी आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मोहित शर्मा व भुवनेश्वर कुमार यांच्यावर धोनीचा विश्वास असून, धवल कुलकर्णीचा पर्यायी गोलंदाज म्हणून समावेश होण्याची शक्यता आहे. वरुण अ‍ॅरोन व उमेश यादव अनेकदा चुका करतात. पण भविष्यात होणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा विचार करता त्यांना या मालिकेत संधी मिळू शकते. (वृत्तसंस्था)