शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

धोनी, विराट भिन्न शैलीचे कर्णधार

By admin | Updated: January 9, 2016 03:24 IST

महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती असून, त्यांची नेतृत्वशैलीही वेगवेगळी आहे, असे मत भारताचा स्टार आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने व्यक्त केले.

नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती असून, त्यांची नेतृत्वशैलीही वेगवेगळी आहे, असे मत भारताचा स्टार आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने व्यक्त केले. जागतिक क्रमवारीत कसोटीमध्ये अव्वल गोलंदाज व अष्टपैलू असलेल्या आश्विनने धोनी आणि विराट यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना सांगितले की, ‘अन्य कर्णधारांच्या तुलनेत धोनीमध्ये अधिक चर्चा न करणे आणि प्रतिक्रिया न देणे हा एक विशेष गुण आहे. अनेकदा आम्ही त्याच्याकडून प्रतिक्रियेची अपेक्षा करतो, पण तो काही न बोलता थेट ड्रेसिंग रूममध्ये जातो. ही त्याची विशेषता आहे. त्याला समजून घेणे कठीण आहे. हे त्याचे वर्तन योग्य आहे किंवा नाही, हे माहीत नाही पण ही त्याची विशेषता आहे.’एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आश्विनने विराटबाबत बोलताना म्हटले की, ‘विराट कोहलीमध्ये कमालीचा उत्साह असतो. कर्णधारपदाच्या छोटेखानी कारकिर्दीमध्ये तो सातत्याने चांगले करण्यास उत्सुक असतो आणि सहकाऱ्यांनाही त्यासाठी प्रेरित करतो. त्याच्याबाबत सर्वकाही चांगलेच आहे.’आपल्या गोलंदाजीबाबत बोलताना आश्विन म्हणाला,‘मी नेहमी जगातील सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून नावलौकिक मिळविण्यास प्रयत्नशील होतो. ही चांगली बाब असली, तरी माझ्या मते मला अद्याप लक्ष्य गाठता आलेले नाही. जोपर्यंत लक्ष्य गाठत नाही, तोपर्यंत त्यासाठी प्रयत्नशील राहील. मी एक दिवस नक्कीच हा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरेल, पण सध्या मानांकनाचा विचार करता अव्वल स्थानावर असल्यामुळे आनंदी आहे.’आश्विनने गेल्या वर्षी ९ कसोटी सामन्यांत ६२ बळी घेतले आणि वर्षाचा शेवट ‘नंबर वन कसोटी गोलंदाज’ म्हणून केला. बिशनसिंग बेदीनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. बेदी यांनी १९७३ मध्ये अशी कामगिरी केली होती. शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांना आपला आदर्श मानणाऱ्या आश्विनने सांगितले की,‘हे दोन्ही गोलंदाज माझ्यासाठी ‘हिरो’ आहेत. मी त्यांच्यादरम्यान तुलना करू शकत नाही, पण जर मला हजार डॉलर्स देऊन एखाद्या गोलंदाजाला बघायला जायचे असते तर मी वॉर्नला बघणे पसंत करील. कारण, तो ९ क्षेत्ररक्षकांना एकाचवेळी सांभाळणारा शानदार गोलंदाज आहे. अन्य गोलंदाजांमध्ये अशी प्रतिभा नाही.’ (वृत्तसंस्था)