शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
9
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
10
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
11
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
12
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
13
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
14
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
15
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
16
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
17
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
18
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
19
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
20
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!

धोनी, विराट भिन्न शैलीचे कर्णधार

By admin | Updated: January 9, 2016 03:24 IST

महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती असून, त्यांची नेतृत्वशैलीही वेगवेगळी आहे, असे मत भारताचा स्टार आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने व्यक्त केले.

नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती असून, त्यांची नेतृत्वशैलीही वेगवेगळी आहे, असे मत भारताचा स्टार आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने व्यक्त केले. जागतिक क्रमवारीत कसोटीमध्ये अव्वल गोलंदाज व अष्टपैलू असलेल्या आश्विनने धोनी आणि विराट यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना सांगितले की, ‘अन्य कर्णधारांच्या तुलनेत धोनीमध्ये अधिक चर्चा न करणे आणि प्रतिक्रिया न देणे हा एक विशेष गुण आहे. अनेकदा आम्ही त्याच्याकडून प्रतिक्रियेची अपेक्षा करतो, पण तो काही न बोलता थेट ड्रेसिंग रूममध्ये जातो. ही त्याची विशेषता आहे. त्याला समजून घेणे कठीण आहे. हे त्याचे वर्तन योग्य आहे किंवा नाही, हे माहीत नाही पण ही त्याची विशेषता आहे.’एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आश्विनने विराटबाबत बोलताना म्हटले की, ‘विराट कोहलीमध्ये कमालीचा उत्साह असतो. कर्णधारपदाच्या छोटेखानी कारकिर्दीमध्ये तो सातत्याने चांगले करण्यास उत्सुक असतो आणि सहकाऱ्यांनाही त्यासाठी प्रेरित करतो. त्याच्याबाबत सर्वकाही चांगलेच आहे.’आपल्या गोलंदाजीबाबत बोलताना आश्विन म्हणाला,‘मी नेहमी जगातील सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून नावलौकिक मिळविण्यास प्रयत्नशील होतो. ही चांगली बाब असली, तरी माझ्या मते मला अद्याप लक्ष्य गाठता आलेले नाही. जोपर्यंत लक्ष्य गाठत नाही, तोपर्यंत त्यासाठी प्रयत्नशील राहील. मी एक दिवस नक्कीच हा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरेल, पण सध्या मानांकनाचा विचार करता अव्वल स्थानावर असल्यामुळे आनंदी आहे.’आश्विनने गेल्या वर्षी ९ कसोटी सामन्यांत ६२ बळी घेतले आणि वर्षाचा शेवट ‘नंबर वन कसोटी गोलंदाज’ म्हणून केला. बिशनसिंग बेदीनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. बेदी यांनी १९७३ मध्ये अशी कामगिरी केली होती. शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांना आपला आदर्श मानणाऱ्या आश्विनने सांगितले की,‘हे दोन्ही गोलंदाज माझ्यासाठी ‘हिरो’ आहेत. मी त्यांच्यादरम्यान तुलना करू शकत नाही, पण जर मला हजार डॉलर्स देऊन एखाद्या गोलंदाजाला बघायला जायचे असते तर मी वॉर्नला बघणे पसंत करील. कारण, तो ९ क्षेत्ररक्षकांना एकाचवेळी सांभाळणारा शानदार गोलंदाज आहे. अन्य गोलंदाजांमध्ये अशी प्रतिभा नाही.’ (वृत्तसंस्था)