शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

डिवचलेल्या भुवनेश्वरने स्वत:ला सिद्ध केलं

By admin | Updated: October 2, 2016 00:28 IST

भुवनेश्वरकुमार हा असा एक खेळाडू आहे, जो बोलण्यापेक्षा करुन दाखवण्यावर विश्वास ठेवतो. कानपूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक पाचशेव्या कसोटीतून विनाकारण वगळल्यामुळे

- सुनील गावसकर लिहितो़भुवनेश्वरकुमार हा असा एक खेळाडू आहे, जो बोलण्यापेक्षा करुन दाखवण्यावर विश्वास ठेवतो. कानपूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक पाचशेव्या कसोटीतून विनाकारण वगळल्यामुळे डिवचल्या गेलेल्या भुवीने कोलकाता कसोटीत बळींचा पंचकार मिळवताना स्वत:ला सिध्द केले आहे. आॅगस्ट महिन्यात वेस्ट इंडीजविरुध्दच्या पहिल्या दोन कसोटीत त्याला राखीव बेंचवर बसावे लागले. तिसऱ्या कसोटीत संधी मिळताच त्याने पाच बळी घेतले होते, चौथी कसोटी पावसामुळे अनिर्णीत राहिली. त्यामुळे कानपूर कसोेटीत त्याला वगळण्यासारखे काहीच कारण नव्हते. तरीही तो बाहेर राहिला. पण कोलकातात संधी मिळताच त्याने आपले अंतिम अकरातील स्थान का अढळ आहे, हे दाखवून ते भारताला वर्चस्व मिळवून दिले. तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात यष्टीरक्षक वृध्दीमान साहाने पुन्हा एकदा धीरोदात्त प्रदर्शन करीत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या फलंदाजीमुळे भारताच्या खात्यात अपेक्षित धावा जमा झाल्या. साहा, अश्विन आणि जडेजा यांच्यामुळे फलंदाजीला डेप्थ मिळाली आहे, कोणत्याही कर्णधारासाठी ही आनंदाची गोष्ट ठरेल. भारताची आघाडी फळी अजून म्हणावी तशी तळपलेली नाही. चेतेश्वर पुजारा हा भुवनेश्वरसारखाच आपल्या बॅटने बोलणारा फलंदाज आहे. त्याची अजिंक्य रहाणेसोबतची भागीदारीमुळे भारताची आपत्कालीन परिस्थितीतून सुटका झाली. दोघांची शतके मात्र हुकल्यामुळे थोडी रुखरुख लागून राहीली. त्यांनी ज्या कठीण परिस्थितीत फलंदाजी केली ते पाहता ते शतकाचे हक्कदार होते असे वाटते. ईडन गार्डनचे अनेक वर्षे क्युरेटर राहिलेल्या प्रबीर मुखर्जी यांच्या धाटणीची ही खेळपट्टी नाही. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अजिबात सोपे नाही. येथे चेंडु टेनिसबॉल सारखा बाउन्स होत आहे. अशा खेळपट्टीवर फलंदाजाने स्वत:ला कधीही सेट झालोय असे समजू नये. नेहमी सतर्क रहावे. उद्या सकाळी पाहुण्या संघाचा डाव लवकर गुंडाळून विजयासाठी जास्तीत जास्त लीड मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. भारतीय गोलंदाजांनी घेतलेल्या श्रमाचे चीज करण्याची जबाबदारी फलंदाजांची असेल. (पीएमजी)