शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गोलंदाज ठरणार निर्णायक

By admin | Updated: May 30, 2017 00:57 IST

काही दिवसांमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होईल. भारत या स्पर्धेत गतविजेता असून पहिल्याच सराव सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवले

काही दिवसांमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होईल. भारत या स्पर्धेत गतविजेता असून पहिल्याच सराव सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवले. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे जरी भारताने विजय मिळवला असला तरी, माझ्या मते हा चांगला विजय ठरला. कारण, एक तर हा सराव सामना होता, त्यात न्यूझीलंडसारख्या संघाला १८९ धावांमध्ये बाद करणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. भारत विजयापासून ६० धावा दूर असताना पावसाने हजेरी लावली आणि जास्त बळीही गमावले नव्हते. सर्वांत चांगली बाब म्हणजे विराट कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावले.कोहलीला आॅस्टे्रलियाविरुद्धच्या मालिकेत फार काही चमक दाखवता आली नव्हती. तसेच, त्यानंतर झालेल्या आयपीएलमध्येही लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. अशा घडामोडीनंतर पहिल्याच सामन्यात जर कोहली धावा काढत असेल, तर स्वत:सह संघाचाही आत्मविश्वास वाढतो. तसेच कोहलीसारखा मोठा खेळाडू फॉर्ममध्ये आल्यानंतर प्रतिस्पर्धी संघावर खूप मोठा परिणाम होतो. पण एकूणच कामगिरी पाहिल्यास सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, भारताची गोलंदाजी जबरदस्त झाली. ५ वेगवान गोलंदाज, २ फिरकी गोलंदाज असा ताफा असलेल्या भारतीय संघाचे जवळपास सर्वच गोलंदाज यशस्वी ठरले. महंमद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार या प्रमुख गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे गोलंदाज भारतासाठी खूप निर्णायक ठरेल, असे मला वाटते.गोलंदाजी यासाठी निर्णायक ठरेल, कारण विदेशात जिंकलेल्या गेल्या तीन एकदिवसीय विजेतेपदांची कामगिरी पाहिल्यास कळेल, की गोलंदाजांमुळे टीम इंडिया यशस्वी झाली आहे. १९८३ चा विश्वचषक कपिलदेवच्या नेतृत्वामध्ये जिंकला, तेव्हा सर्वांना कपिलच्या नाबाद १७५ धावांची खेळी आठवते. पण आपण हे विसरतो, की अंतिम सामन्यात भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजला ४० धावांनी नमवले. १८३ सारख्या छोट्या धावसंख्येचे भारतीयांनी यशस्वी संरक्षण केले होते. गोलंदाजांनी तेथे यश मिळवले होते. मदनलाल, कपिलदेव, मोहिंदर अमरनाथ, रॉजर बिन्नी यांसारख्या गोलंदाजांनी बाजी मारली.यानंतर, १९८५ मध्ये वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये जर तुम्ही पाहिले तर कळेल, तिथेही गोलंदाज चमकले होते. विश्वचषकविजेत्या गोलंदाजांसोबत चेतन शर्मा, शिवरामकृष्णन, रवी शास्त्री यांची भर पडली होती. या गोलंदाजांच्या जोरावर भारताने अंतिम सामना जिंकला होता. यानंतर २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील भारताने गोलंदाजांच्या जोरावरच जिंकली होती. ५ सामन्यांत ५० पैकी ४५ बळी मिळवण्यात भारताला यश आले होते. यावरुनच गोलंदाजांचे यश लक्षात येते. कारण, विदेशी वातावरण असे असते जेथे गोलंदाजांना खूप मदत मिळते. त्यामुळे गोलंदाजीमध्ये विविधता, चांगले पर्याय असणे खूप महत्त्वाचे ठरते. तसेच, गोलंदाजांची कामगिरीही चांगली होणे तितकेच महत्त्वाचे आहे. मला वाटते, या वेळी निवडकर्त्यांनी खूप चांगले काम केले आहे. सध्याच्या भारतीय संघात गोलंदाजीसाठी अनेक पर्याय असून आपले गोलंदाज चांगल्या लयीमध्ये आहेत.

- अयाझ मेमन -(संपादकीय सल्लागार)