शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गोलंदाज ठरणार निर्णायक

By admin | Updated: May 30, 2017 00:57 IST

काही दिवसांमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होईल. भारत या स्पर्धेत गतविजेता असून पहिल्याच सराव सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवले

काही दिवसांमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होईल. भारत या स्पर्धेत गतविजेता असून पहिल्याच सराव सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवले. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे जरी भारताने विजय मिळवला असला तरी, माझ्या मते हा चांगला विजय ठरला. कारण, एक तर हा सराव सामना होता, त्यात न्यूझीलंडसारख्या संघाला १८९ धावांमध्ये बाद करणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. भारत विजयापासून ६० धावा दूर असताना पावसाने हजेरी लावली आणि जास्त बळीही गमावले नव्हते. सर्वांत चांगली बाब म्हणजे विराट कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावले.कोहलीला आॅस्टे्रलियाविरुद्धच्या मालिकेत फार काही चमक दाखवता आली नव्हती. तसेच, त्यानंतर झालेल्या आयपीएलमध्येही लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. अशा घडामोडीनंतर पहिल्याच सामन्यात जर कोहली धावा काढत असेल, तर स्वत:सह संघाचाही आत्मविश्वास वाढतो. तसेच कोहलीसारखा मोठा खेळाडू फॉर्ममध्ये आल्यानंतर प्रतिस्पर्धी संघावर खूप मोठा परिणाम होतो. पण एकूणच कामगिरी पाहिल्यास सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, भारताची गोलंदाजी जबरदस्त झाली. ५ वेगवान गोलंदाज, २ फिरकी गोलंदाज असा ताफा असलेल्या भारतीय संघाचे जवळपास सर्वच गोलंदाज यशस्वी ठरले. महंमद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार या प्रमुख गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे गोलंदाज भारतासाठी खूप निर्णायक ठरेल, असे मला वाटते.गोलंदाजी यासाठी निर्णायक ठरेल, कारण विदेशात जिंकलेल्या गेल्या तीन एकदिवसीय विजेतेपदांची कामगिरी पाहिल्यास कळेल, की गोलंदाजांमुळे टीम इंडिया यशस्वी झाली आहे. १९८३ चा विश्वचषक कपिलदेवच्या नेतृत्वामध्ये जिंकला, तेव्हा सर्वांना कपिलच्या नाबाद १७५ धावांची खेळी आठवते. पण आपण हे विसरतो, की अंतिम सामन्यात भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजला ४० धावांनी नमवले. १८३ सारख्या छोट्या धावसंख्येचे भारतीयांनी यशस्वी संरक्षण केले होते. गोलंदाजांनी तेथे यश मिळवले होते. मदनलाल, कपिलदेव, मोहिंदर अमरनाथ, रॉजर बिन्नी यांसारख्या गोलंदाजांनी बाजी मारली.यानंतर, १९८५ मध्ये वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये जर तुम्ही पाहिले तर कळेल, तिथेही गोलंदाज चमकले होते. विश्वचषकविजेत्या गोलंदाजांसोबत चेतन शर्मा, शिवरामकृष्णन, रवी शास्त्री यांची भर पडली होती. या गोलंदाजांच्या जोरावर भारताने अंतिम सामना जिंकला होता. यानंतर २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील भारताने गोलंदाजांच्या जोरावरच जिंकली होती. ५ सामन्यांत ५० पैकी ४५ बळी मिळवण्यात भारताला यश आले होते. यावरुनच गोलंदाजांचे यश लक्षात येते. कारण, विदेशी वातावरण असे असते जेथे गोलंदाजांना खूप मदत मिळते. त्यामुळे गोलंदाजीमध्ये विविधता, चांगले पर्याय असणे खूप महत्त्वाचे ठरते. तसेच, गोलंदाजांची कामगिरीही चांगली होणे तितकेच महत्त्वाचे आहे. मला वाटते, या वेळी निवडकर्त्यांनी खूप चांगले काम केले आहे. सध्याच्या भारतीय संघात गोलंदाजीसाठी अनेक पर्याय असून आपले गोलंदाज चांगल्या लयीमध्ये आहेत.

- अयाझ मेमन -(संपादकीय सल्लागार)