शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

‘एआयबीए’चा यजमानपद काढून घेण्याचा निर्णय घाईचा - बीएफआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 03:51 IST

भारतीय मुष्टियुद्ध महासंघाने (बीएफआय) म्हटले की, ‘एआयबीएने घाईघाईमध्ये आपला निर्णय घेतला.’

नवी दिल्ली : भारतामध्ये २०२१ साली पुरुषांची जागतिक अजिंक्यपद मुष्टियुद्ध स्पर्धा होणार होती. मात्र भारताच्या यजमानपदाचे हक्क आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेने (एआयबीए) काढून घेतले. यानंतर भारतीय मुष्टियुद्ध महासंघाने (बीएफआय) म्हटले की, ‘एआयबीएने घाईघाईमध्ये आपला निर्णय घेतला.’‘एआयबीए’ने सोमवारी रात्री पत्रक जाहीर करत सांगितले की, ‘यजमानपदाचे शुल्क न भरल्याने आता ही अजिंक्यपद स्पर्धा भारताऐवजी सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे आयोजित करण्यात येईल.’ २०१७ साली भारताला या स्पर्धेचे यजमानपद सोपविण्यात आले होते. ‘बीएफआय’ने शुल्क भरण्यास उशीर झाल्याचे मान्य केले आहे. त्याच वेळी पैसे कोणाच्या खात्यात भरायचे हा मुद्दा सोडवण्यात ‘एआयबीए’ला यश न आल्याने ही अडचण निर्माण झाली, असेही बीएफआयने स्पष्ट केले.सुमारे ४० लाख डॉलरची रक्कम गेल्या वर्षी २ डिसेंबरला भरायची होती. भारतात पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन होणार होते. ‘एआयबीए’ने एका निवेदनात म्हटले की, ‘यजमान शहर करार नियमांनुसार भारताने यजमानपद शुल्क न भरल्याने ‘एआयबीए’ने हा करार मोडला. आता हा करार रद्द झाल्याने भारताला ५०० डॉलरचा दंड भरावा लागेल.’ आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ‘एआयबीए’ला निलंबित केले आहे.‘बीएफआय’ने म्हटले आहे की, ‘लुसाने येथे ‘एआयबीए’चे खाते बंद करण्यात आले आहे. सर्बियामध्ये एका खात्याद्वारे त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करायचे होते. सर्बिया ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या (एफटीएफ देश) काळ्या यादीमध्ये येत असल्याने भारतीय बँक तिथे पैसे पाठवत नाही. एआयबीए ही समस्या सोडवू शकले नाही. आमच्याशी चर्चा न करताच घाईमध्ये ‘एआयबीए’ने आपला निर्णय घेतला. आमच्यावर दंड लावण्यात आल्याचे आश्चर्य वाटते. या समस्येचा आपण मिळून तोडगा काढू आणि आशा आहे की, भविष्यात या स्पर्धेचे आम्ही यजमानपद सांभाळू.’ (वृत्तसंस्था)