शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

मालिका विजयाचा निर्धार

By admin | Updated: August 9, 2016 03:43 IST

पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी विंडीजच्या फलंदाजांच्या शानदार फलंदाजीमुळे चकित झालेल्या भारतीय संघाला

सेन्ट ल्युसिया : पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी विंडीजच्या फलंदाजांच्या शानदार फलंदाजीमुळे चकित झालेल्या भारतीय संघाला आता आज, मंगळवारपासून प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजांकडून शानदार कामगिरीची आशा आहे. भारतीय संघ या लढतीत सरशी साधत चार सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्यास उत्सुक आहे. युवा फलंदाज रोस्टन चेजने शतकी खेळी करीत विंडीजला दुसरा कसोटी सामना अनिर्णीत राखून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. आता भारतीय संघ डॅरेन सॅमी स्टेडियममध्ये मालिका विजय साकारण्यास प्रयत्नशील आहे. या मैदानावर आतापर्यंत केवळ चार कसोटी सामने खेळल्या गेले आहेत. भारताने यापूर्वी २००६ मध्ये येथे अनिर्णित सामना खेळला होता. पहिल्या तासभराच्या खेळानंतर खेळपट्टीतील आर्द्रता संपुष्टात येईल. त्यामुळे खेळपट्टी नेहमीप्रमाणे फलंदाजांसाठी अनुकूल राहण्याचे संकेत मिळत आहेत. भारताने मालिकेत आघाडी घेतली असली फिरकीपटूंमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्णधार कोहली दुसरा फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजाला संधी देण्याची शक्यता आहे. मिश्राच्या तुलनेत तळाच्या फळीत जडेचा चांगला फलंदाजही आहे. जर संघव्यवस्थापनाने तीन फिरकीपटूंना खेळविण्याचा निर्णय घेतला तर यादवच्या स्थानी जडेजाला संधी मिळू शकते, पण अशी शक्यता धुसर आहे. भारतासाठी मुरली विजयचा फिटनेस चिंतेचा विषय आहे. रविवारी त्याने नेट््समध्ये वेगवान गोलंदाजांविरुद्ध फलंदाजीचा सराव केला नाही. दुसऱ्या बाजूला विंडीजला सलामी जोडीबाबत अद्याप ठोस पयार्य सापडलेला नाही. शाई होपला राजेंद्र चंद्रिकाच्या स्थानी संधी मिळण्याची शक्यता आहे. होपने सेन्ट किट््समध्ये खेळल्या पहिल्या सराव सामन्यात भारताविरुद्ध शतकी खेळी केली होती. कर्णधार होल्डरला होपकडून अशाच कामगिरीची आशा राहील. विंडीजच्या आघाडीच्या फळीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात तळाच्या फलंदाजांनी उपयुक्त भागीदारी केल्यामुळे सामना अनिर्णीत राखण्यात यश आले. पराभवाचे सावट असताना सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे विंडीज संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली आहे. (वृत्तसंस्था)प्रतिस्पर्धी संघभारत :- विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, के.एल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्विमान साहा, आर.अश्विन, अमित मिश्रा, रविंद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, उमेश यादव आणि ईशांत शर्मा.वेस्ट इंडिज :- जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, शाई होप, डॅरेन ब्राव्हो मर्लोन सॅमुअल्स, जेरमाइन ब्लॅकवुड, रोस्टन चेज, लियोन जॉन्सन, शेन डोरिच, देवेंद्र बिशू, कार्लोस ब्रेथवेट, शेनोन गॅब्रियल, मिगुएल कुमिन्स आणि अलजारी जोसेफ.सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० पासून.पाच गोलंदाजांच्या रणनीतीचे शमीने केले समर्थनसेन्ट ल्युसिया : वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पाच स्पेशालिस्ट गोलंदाजांचा समावेश असतानाही विजयाचा मार्ग प्रशस्त करता आला नाही, पण वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कर्णधार कोहलीच्या पाच गोलंदाजांसह खेळण्याच्या रणनीतीचे समर्थन केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना शमी म्हणाला,‘तळाच्या फलंदाजांना बाद करण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. जर संघात पाच गोलंदाज असेल तर चार-पाच षटकांच्या स्पेनंतर ८-१० षटके विश्रांतीची संधी मिळते. त्यानंतर पुन्हा त्याच जोमाने गोलंदाजी करता येते. अंतिम अकरामध्ये आमच्याकडे दोन चांगले फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाज आहेत. हीच रणनीती कायम राखण्याचा प्रयत्न राहील.’दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडीजची दुसऱ्या डावात ४ बाद ४८ अशी अवस्था असताना अखेरच्या दिवशी भारतीय गोलंदाजांना सहा बळी घेता आले नाही. याबाबत बोलताना शमी म्हणाला,‘ज्यावेळी झटपट बळी मिळवले जातात त्यावेळी सामन्यात एक मोठी भागीदारी होते. याचा अर्थ आम्ही चुका केल्या असा होत नाही. ते चांगले खेळले. खेळपट्टीही पाटा होती. परिस्थिती फलंदाजीसाठी अनुकूल होती आणि त्यांची दुसऱ्या डावातील फलंदाजी प्रशंसेस पात्र आहे. त्यांनी याची पुनरावृत्ती करू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’ (वृत्तसंस्था)