शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मालिका विजयाचा निर्धार

By admin | Updated: August 9, 2016 03:43 IST

पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी विंडीजच्या फलंदाजांच्या शानदार फलंदाजीमुळे चकित झालेल्या भारतीय संघाला

सेन्ट ल्युसिया : पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी विंडीजच्या फलंदाजांच्या शानदार फलंदाजीमुळे चकित झालेल्या भारतीय संघाला आता आज, मंगळवारपासून प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजांकडून शानदार कामगिरीची आशा आहे. भारतीय संघ या लढतीत सरशी साधत चार सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्यास उत्सुक आहे. युवा फलंदाज रोस्टन चेजने शतकी खेळी करीत विंडीजला दुसरा कसोटी सामना अनिर्णीत राखून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. आता भारतीय संघ डॅरेन सॅमी स्टेडियममध्ये मालिका विजय साकारण्यास प्रयत्नशील आहे. या मैदानावर आतापर्यंत केवळ चार कसोटी सामने खेळल्या गेले आहेत. भारताने यापूर्वी २००६ मध्ये येथे अनिर्णित सामना खेळला होता. पहिल्या तासभराच्या खेळानंतर खेळपट्टीतील आर्द्रता संपुष्टात येईल. त्यामुळे खेळपट्टी नेहमीप्रमाणे फलंदाजांसाठी अनुकूल राहण्याचे संकेत मिळत आहेत. भारताने मालिकेत आघाडी घेतली असली फिरकीपटूंमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्णधार कोहली दुसरा फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजाला संधी देण्याची शक्यता आहे. मिश्राच्या तुलनेत तळाच्या फळीत जडेचा चांगला फलंदाजही आहे. जर संघव्यवस्थापनाने तीन फिरकीपटूंना खेळविण्याचा निर्णय घेतला तर यादवच्या स्थानी जडेजाला संधी मिळू शकते, पण अशी शक्यता धुसर आहे. भारतासाठी मुरली विजयचा फिटनेस चिंतेचा विषय आहे. रविवारी त्याने नेट््समध्ये वेगवान गोलंदाजांविरुद्ध फलंदाजीचा सराव केला नाही. दुसऱ्या बाजूला विंडीजला सलामी जोडीबाबत अद्याप ठोस पयार्य सापडलेला नाही. शाई होपला राजेंद्र चंद्रिकाच्या स्थानी संधी मिळण्याची शक्यता आहे. होपने सेन्ट किट््समध्ये खेळल्या पहिल्या सराव सामन्यात भारताविरुद्ध शतकी खेळी केली होती. कर्णधार होल्डरला होपकडून अशाच कामगिरीची आशा राहील. विंडीजच्या आघाडीच्या फळीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात तळाच्या फलंदाजांनी उपयुक्त भागीदारी केल्यामुळे सामना अनिर्णीत राखण्यात यश आले. पराभवाचे सावट असताना सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे विंडीज संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली आहे. (वृत्तसंस्था)प्रतिस्पर्धी संघभारत :- विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, के.एल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्विमान साहा, आर.अश्विन, अमित मिश्रा, रविंद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, उमेश यादव आणि ईशांत शर्मा.वेस्ट इंडिज :- जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, शाई होप, डॅरेन ब्राव्हो मर्लोन सॅमुअल्स, जेरमाइन ब्लॅकवुड, रोस्टन चेज, लियोन जॉन्सन, शेन डोरिच, देवेंद्र बिशू, कार्लोस ब्रेथवेट, शेनोन गॅब्रियल, मिगुएल कुमिन्स आणि अलजारी जोसेफ.सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० पासून.पाच गोलंदाजांच्या रणनीतीचे शमीने केले समर्थनसेन्ट ल्युसिया : वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पाच स्पेशालिस्ट गोलंदाजांचा समावेश असतानाही विजयाचा मार्ग प्रशस्त करता आला नाही, पण वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कर्णधार कोहलीच्या पाच गोलंदाजांसह खेळण्याच्या रणनीतीचे समर्थन केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना शमी म्हणाला,‘तळाच्या फलंदाजांना बाद करण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. जर संघात पाच गोलंदाज असेल तर चार-पाच षटकांच्या स्पेनंतर ८-१० षटके विश्रांतीची संधी मिळते. त्यानंतर पुन्हा त्याच जोमाने गोलंदाजी करता येते. अंतिम अकरामध्ये आमच्याकडे दोन चांगले फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाज आहेत. हीच रणनीती कायम राखण्याचा प्रयत्न राहील.’दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडीजची दुसऱ्या डावात ४ बाद ४८ अशी अवस्था असताना अखेरच्या दिवशी भारतीय गोलंदाजांना सहा बळी घेता आले नाही. याबाबत बोलताना शमी म्हणाला,‘ज्यावेळी झटपट बळी मिळवले जातात त्यावेळी सामन्यात एक मोठी भागीदारी होते. याचा अर्थ आम्ही चुका केल्या असा होत नाही. ते चांगले खेळले. खेळपट्टीही पाटा होती. परिस्थिती फलंदाजीसाठी अनुकूल होती आणि त्यांची दुसऱ्या डावातील फलंदाजी प्रशंसेस पात्र आहे. त्यांनी याची पुनरावृत्ती करू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’ (वृत्तसंस्था)