शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदाबाबत उत्सुकता

By admin | Updated: June 18, 2017 03:12 IST

साखळी फेरीत सलामी लढतीत भारतीय संघाने ज्या पाक संघाचा धुव्वा उडवला त्याच संघाविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत गाठ पडेल, याचा कुणी विचारही केला नसेल.

- सुनील गावसकर लिहितात...साखळी फेरीत सलामी लढतीत भारतीय संघाने ज्या पाक संघाचा धुव्वा उडवला त्याच संघाविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत गाठ पडेल, याचा कुणी विचारही केला नसेल. याचे मुख्य कारण आहे पाकचा कर्णधार सरफराज अहमदचे शानदार नेतृत्व आणि भारताचा अपवाद वगळता अन्य संघांविरुद्ध चमकदार कामगिरी. भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानचे खेळाडू अधिक भयभीत असतात, पण अंतिम लढतीत निश्चितच सरफराजच्या नेतृत्वाखाली एक वेगळाच पाक संघ बघायला मिळू शकतो. सलामीला पाक संघात फखर जमानसारखा फलंदाज आहे. तो पहिल्या १० षटकांत प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणू शकतो. प्रतिस्पर्धी गोलंदाजांविरुद्ध खेळताना फखर निर्भीड असतो. दुसऱ्या टोकावर त्याला अझहर अलीची मिळणारी साथ सलामीच्या गोलंदाजांसाठी अडचणीचे कारण ठरू शकते. या दोघांचा अपवाद वगळता पाकिस्तानच्या अन्य फलंदाजांना विशेष छाप सोडता आलेली नाही. दरम्यान, बाबर आजमने टप्प्याटप्प्यात झलक दाखविली आहे. त्यानंतर अनुभवी शोएब मलिक व सरफराज यांचा क्रमांक येतो. पाकच्या फलंदाजीमध्ये हे खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावतात. यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर पाकने श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत सरशी साधत उपांत्य फेरी गाठली होती. सरफराजने आपल्या नेतृत्वाने प्रभावित केले आहे. गोलंदाजीमध्ये योग्य बदल आणि मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंचा योग्य वापर पाक संघाच्या यशात निर्णायक ठरला आहे. मोहम्मद आमिर अंतिम लढतीत खेळण्याची शक्यता आहे. आमिर जुनेद खान व हसन अलीच्या साथीने नव्या चेंडूने गोलंदाजीचा भार सांभाळेल. भारतीय सलामीवीर शानदार फॉर्मात आहेत. रोहितने शतकी खेळी करीत आपले महत्त्व पटवून दिले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसोबत धवनचे विशेष प्रेम असल्याचे दिसून येते. उपांत्य फेरीत कोहलीच्या शानदार खेळीनंतर उर्वरित फलंदाजांना विशेष काही करण्याची फारच कमी संधी मिळाली. क्षेत्ररक्षणामध्ये आक्रमकता येणे आवश्यक आहे. कोहलीने चपळ क्षेत्ररक्षकांना सीमारेषेवर तैनात करायला हवे. त्यामुळे चौकारांवर नियंत्रण राखता येईल. भारतीय संघात बदल करण्याची शक्यता दिसत नाही. जर रविवारी सकाळी ढगाळ वातावरण असेल तर अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संधी देण्याबाबत विचार करता येईल. भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. पण काही खेळाडू मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी करतात, काही अपयशी ठरतात. त्यामुळे चमकदार कामगिरी करीत कुठला संघ जेतेपद पटकावतो, याबाबत उत्सुकता आहे. (पीएमजी)