शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : सर्वात वाईट भीती खरी ठरली!, ऑलिम्पिक स्थगित होण्यावर विनेशची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 00:23 IST

CoronaVirus : विनेशचे हे मत असले तरी माजी सुवर्ण विजेता अभिनव बिंद्रा, बॉक्सर विकास कृष्णन, नीरज चोप्रा या खेळाडूंनी या स्थगितीचे स्वागत केले आहे.

नवी दिल्ली : भारताची पदकाची दावेदार कुस्तीपटू विनेश फोगाटने म्हटले आहे की, टोकियो आॅलिम्पिक स्थगित होणे माझ्यासाठी सर्वात वाईट स्वप्न होते आणि भविष्यातील प्रदीर्घ प्रतीक्षा या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणखी कडवी असेल. विनेशचे हे मत असले तरी माजी सुवर्ण विजेता अभिनव बिंद्रा, बॉक्सर विकास कृष्णन, नीरज चोप्रा या खेळाडूंनी या स्थगितीचे स्वागत केले आहे. हा निर्णय योग्य वेळी घेण्यात आल्याचे बिंद्रा याने म्हटले आहे.कोविड-१९ महामारीमुळे टोकियो आॅलिम्पिक २०२० ला पुढील वर्षापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. हे वृत्त कळल्यानंतही विनेश निराश झाली.विनेशने टिष्ट्वट केले, ‘कुठल्याही खेळाडूसाठी हे वाईट स्वप्नाप्रमाणे असते आणि शेवटी ते खरे ठरले. आॅलिम्पिकमध्ये खेळणे एका खेळाडूसाठी सर्वांत कठीण आव्हान असते, पण या पातळीवर संधीची प्रतीक्षा करणे त्यापेक्षा खडतर आहे.’विनेश पुढे म्हणाली, ‘आता काय म्हणायचे आहे, हे मला नाही माहिती, पण मी भावनाविवश झाली आहे.’रिओ आॅलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे लवकरच आव्हान संपुष्टात आलेल्या विनेशकडून भारताला पदकाची आशा आहे. तिने गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावत टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली.विनेश म्हणाली, ‘जगापुढे हा कठीण समय आहे. मीसुद्धा निराश आहे, पण आपल्याला या निराशेतही आशेचा किरण शोधावा लागणार आहे.’स्थगितीचा निर्णय योग्यवेळी - अभिनव बिंद्राटोकियो आॅलिम्पिक वर्षभर स्थगित करण्याचा निर्णय आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक समितीने योग्यवेळी आणि ताबडतोब घेतला, असे मत आॅलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने व्यक्त केले आहे. आॅलिम्पिकबाबत विचार करण्यास आयओसी वेळ लावत असल्याचा आरोप करीत अनेक दिग्गज खेळाडू आणि त्यांच्या राष्टÑीय महासंघांनी आयओसीवर टीका केली होती.आयोजन समिती आणि आयओसीने मंगळवारी कोरोना व्हायरसच्या प्रकोपाची भीषणता लक्षात घेत आयोजन वर्षभर लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाआधी ब्रिटन आणि कनडा येथील आॅलिम्पिक महासंघांनी आयओसीविरुद्ध नाराजीचा सूर आळवला होता. बिंद्राने मात्र हा योग्यवेळी घेतला ताबडतोब निर्णय असल्याचे सांगून आयओसीचे कौतुक केले. अभिनव म्हणाला, ‘निर्णय त्वरित घेतला हे पाहून बरे वाटले. आॅलिम्पिक होणार की नाही याबाबत अनिश्चितता वाढत चालली होती. माझ्या मते, हा कठीण निर्णय योग्यवेळी घेण्यात आला आहे. यामुळे खेळाडू आता आणखी जोमाने तयारी करू शकतील. हा काळ आरोग्याची काळजी घेण्याचा असल्याने आपल्या जवळपास वास्तव्यास असलेल्या लोकांच्या आरोग्याची काळजीदेखील खेळाडूंना घेता येईल.’ बिंद्रा स्वत: आयओसी अ‍ॅथलिट आयोगाचा सदस्य आहे. जगातील अनेक खेळाडूंनी आॅलिम्पिक स्थगित करण्याची मागणी होती. या मागणीनुसारच आयओसीने खेळ लांबणीवर टाकले आहेत.’ बीजिंग आॅलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर रायफलचा सुवर्ण विजेता असलेला अभिनव पुढे म्हणाला, ‘आम्ही सातत्याने खेळाडूंच्या संपर्कात होतो. खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य असल्याचा जो संदेश पुढे आला, तो वाखाणण्यासारखा आहे. ही अनपेक्षित स्थिती आहे. सर्व खेळाडू आणि खेळाशी संबंधित लोकांचे आरोग्य सर्वतोपरी असल्याचा आयओसीचा सिद्धांत आहे. व्हायरसवर नियंत्रण आणि विजय मिळविण्यासाठी होत असलेल्या कामांचे आम्ही कौतुक करीत असून निर्णय योग्य आणि समयसूचकेतचा आहे.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020corona virusकोरोना वायरस बातम्या