शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

CoronaVirus : सर्वात वाईट भीती खरी ठरली!, ऑलिम्पिक स्थगित होण्यावर विनेशची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 00:23 IST

CoronaVirus : विनेशचे हे मत असले तरी माजी सुवर्ण विजेता अभिनव बिंद्रा, बॉक्सर विकास कृष्णन, नीरज चोप्रा या खेळाडूंनी या स्थगितीचे स्वागत केले आहे.

नवी दिल्ली : भारताची पदकाची दावेदार कुस्तीपटू विनेश फोगाटने म्हटले आहे की, टोकियो आॅलिम्पिक स्थगित होणे माझ्यासाठी सर्वात वाईट स्वप्न होते आणि भविष्यातील प्रदीर्घ प्रतीक्षा या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणखी कडवी असेल. विनेशचे हे मत असले तरी माजी सुवर्ण विजेता अभिनव बिंद्रा, बॉक्सर विकास कृष्णन, नीरज चोप्रा या खेळाडूंनी या स्थगितीचे स्वागत केले आहे. हा निर्णय योग्य वेळी घेण्यात आल्याचे बिंद्रा याने म्हटले आहे.कोविड-१९ महामारीमुळे टोकियो आॅलिम्पिक २०२० ला पुढील वर्षापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. हे वृत्त कळल्यानंतही विनेश निराश झाली.विनेशने टिष्ट्वट केले, ‘कुठल्याही खेळाडूसाठी हे वाईट स्वप्नाप्रमाणे असते आणि शेवटी ते खरे ठरले. आॅलिम्पिकमध्ये खेळणे एका खेळाडूसाठी सर्वांत कठीण आव्हान असते, पण या पातळीवर संधीची प्रतीक्षा करणे त्यापेक्षा खडतर आहे.’विनेश पुढे म्हणाली, ‘आता काय म्हणायचे आहे, हे मला नाही माहिती, पण मी भावनाविवश झाली आहे.’रिओ आॅलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे लवकरच आव्हान संपुष्टात आलेल्या विनेशकडून भारताला पदकाची आशा आहे. तिने गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावत टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली.विनेश म्हणाली, ‘जगापुढे हा कठीण समय आहे. मीसुद्धा निराश आहे, पण आपल्याला या निराशेतही आशेचा किरण शोधावा लागणार आहे.’स्थगितीचा निर्णय योग्यवेळी - अभिनव बिंद्राटोकियो आॅलिम्पिक वर्षभर स्थगित करण्याचा निर्णय आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक समितीने योग्यवेळी आणि ताबडतोब घेतला, असे मत आॅलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने व्यक्त केले आहे. आॅलिम्पिकबाबत विचार करण्यास आयओसी वेळ लावत असल्याचा आरोप करीत अनेक दिग्गज खेळाडू आणि त्यांच्या राष्टÑीय महासंघांनी आयओसीवर टीका केली होती.आयोजन समिती आणि आयओसीने मंगळवारी कोरोना व्हायरसच्या प्रकोपाची भीषणता लक्षात घेत आयोजन वर्षभर लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाआधी ब्रिटन आणि कनडा येथील आॅलिम्पिक महासंघांनी आयओसीविरुद्ध नाराजीचा सूर आळवला होता. बिंद्राने मात्र हा योग्यवेळी घेतला ताबडतोब निर्णय असल्याचे सांगून आयओसीचे कौतुक केले. अभिनव म्हणाला, ‘निर्णय त्वरित घेतला हे पाहून बरे वाटले. आॅलिम्पिक होणार की नाही याबाबत अनिश्चितता वाढत चालली होती. माझ्या मते, हा कठीण निर्णय योग्यवेळी घेण्यात आला आहे. यामुळे खेळाडू आता आणखी जोमाने तयारी करू शकतील. हा काळ आरोग्याची काळजी घेण्याचा असल्याने आपल्या जवळपास वास्तव्यास असलेल्या लोकांच्या आरोग्याची काळजीदेखील खेळाडूंना घेता येईल.’ बिंद्रा स्वत: आयओसी अ‍ॅथलिट आयोगाचा सदस्य आहे. जगातील अनेक खेळाडूंनी आॅलिम्पिक स्थगित करण्याची मागणी होती. या मागणीनुसारच आयओसीने खेळ लांबणीवर टाकले आहेत.’ बीजिंग आॅलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर रायफलचा सुवर्ण विजेता असलेला अभिनव पुढे म्हणाला, ‘आम्ही सातत्याने खेळाडूंच्या संपर्कात होतो. खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य असल्याचा जो संदेश पुढे आला, तो वाखाणण्यासारखा आहे. ही अनपेक्षित स्थिती आहे. सर्व खेळाडू आणि खेळाशी संबंधित लोकांचे आरोग्य सर्वतोपरी असल्याचा आयओसीचा सिद्धांत आहे. व्हायरसवर नियंत्रण आणि विजय मिळविण्यासाठी होत असलेल्या कामांचे आम्ही कौतुक करीत असून निर्णय योग्य आणि समयसूचकेतचा आहे.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020corona virusकोरोना वायरस बातम्या