शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

कूल कप्तानीचे पर्व संपले!

By admin | Updated: January 4, 2017 22:59 IST

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीने मर्यादित षटकांच्या संघांचे कर्णधारपद सोडल्याचे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आणि भायतीय क्रिकेटप्रेमीना

बाळकृष्ण परब/ ऑनलाइन लोकमत 
बुधवारची संध्याकाळ भारतीय क्रिकेटसाठी काहीशी धक्कादायक ठरली. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीने मर्यादित षटकांच्या संघांचे कर्णधारपद सोडल्याचे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आणि भारतीय क्रिकेटप्रेमींना थोडासा धक्का बसला. थोडासाच कारण गेल्या काही दिवसांमधील भारतीय संघाची मैदानावरील कामगिरी पाहता हे होणारच होते. एकीकडे कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकापाठोपाठ एक विजय मिळवत आगेकूच करत निघाला असताना दुसरीकडे देशाला दोन विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार असलेल्या धोनीच्या नेतृत्वाखालील संघ मात्र मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अडखळत होता. त्यामुळे सुरुवातीला दबक्या आणि नंतर उघडपणे धोनीकडून कर्णधारपद काढून घेण्याची मागणी होऊ लागली होती. त्याचीच परिणती अखेर आज धोनीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यात झाली.  
आपला हटके अंदाज, कुठल्याही परिस्थितीत शांत राहण्याचा स्वभाव यामुळे धोनी 'कॅप्टन कूल' म्हणून नावारुपास आला. कारकिर्दीच्या सुरुवातीला घणाघाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीकडे 2007 साली झालेल्या पहिल्याच ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी अपघातानेच कर्णधारपद चालून आले. मग पुढे काय झाले हा आता भारतीय क्रिकेटमधील इतिहास बनला आहे. संधीचे सोने करणे म्हणजे काय हे धोनीने आपल्या कप्तानीतून दाखवून दिले. 2007 चा ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच एकदिवसीय संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे चालून आले. कप्तानीच्या सुरुवातीच्याच काळात ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिका जिंकल्याने धोनीच्या कुशल कप्तानीवर शिक्कामोर्तब झाले.
 2008 ते 2011 हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कप्तानीच्या दृष्टीने धोनीसाठी सुवर्णकाळ ठरला.  याकाळात त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे वारू चौफेर उधळले. ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिकेच्या विजेतेपदाबरोबरच श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज,  दक्षिण आफ्रिका अशा बहुतांश सर्वच आघाडीच्या संघांना भारताने धूळ चारली. धोनीची कप्तानी यशोशिखरावर पोहोचली ती 2011च्या विश्वचषक स्पर्धेत. भारतीय मैदानावर झालेल्या विश्वचषकात धोनीच्या संघाने देशाला तब्बल 28 वर्षांनंतर विश्वचषकाला गवसणी घालून दिली. 2 एप्रिल 2011च्या रात्री मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लढतीतील धोनीची ती कप्तानी खेळी आणि नंतरचा विश्वविजयाचा जल्लोष अद्याप क्रिकेटप्रेमींच्या नजरेसमोर आहे. 
पण यानंतर मात्र धोनीची कप्तानी उरणीला लागली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात झालेले दारुण पराभव आणि संघात सुरू झालेल्या कुरबुरींमुळे धोनीच्या जादूई कप्तानीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. या काळातही त्याच्या नेतृत्वात संघाला यश मिळत होते. पण त्यात पूर्वीची जादू राहिली नव्हती. त्यातच एन. श्रीनिवासन यांच्याशी त्याचे असलेले घनिष्ट संबंध आणि त्याकाळात भारतीय क्रिकेटमध्ये घोंघावलेले फिक्सिंगचे वादळ याच्या झळाही धोनीच्या नेतृत्वाला बसल्या. आपल्या मर्जीतल्या आणि विशेषकरून चेन्नई सुपरकिंग्जमधल्या खेळाडूंना तो झुकते माप देतो, असेही आरोप झाले. मात्र या सर्व आरोप-प्रत्यारोपातही त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला विजेतेपद मिळवून दिले. पण पुढच्याच वर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघ अपयशी ठरला. 
जय पराजयांची मालिका सुरू असतानाच त्याने 2014च्या अखेरीस कसोटी क्रिकेटमधून एकाएकी निवृत्ती स्वीकारली. पण तरीही एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची कप्तानी काही बहरली नाही. 2015च्या विश्वचषकात भारत उपांत्य फेरीत पोहोचला. मात्र त्यावेळी भारताला ऑस्ट्रेलियाचे आव्हान पार करता आले नाही. याच काळात भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर विराटच्या रूपात नव्या नेतृत्वाचा उदय झाला. त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरीही उंचावली. साहजिकच विराटच्या नेतृत्वाशी त्याच्या नेतृत्वाची तुलना होऊ लागली, त्यात विराटचे पारडे जड ठरले. 2019ची विश्वचषक स्पर्धा विचारात घेता नव्या नेतृत्वाला वाव देण्यासाठी धोनीने नेतृत्व सोडणे अपरिहार्य होते आणि अखेर आज तसे जाहीरही झाले. त्याबरोबरच भारतीय क्रिकेटमधील कप्तानीच्या एका देदीप्यमान आणि यशस्वी पर्वाची सांगता झालीय. मात्र पुढचा काही काळ तरी धोनीची फटकेबाजी मैदानावर अनुभवता येणार आहे, हेही नसे थोडके!