शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

आक्रमक स्पेलनंतर आत्मविश्वास उंचावला

By admin | Updated: December 8, 2015 23:50 IST

फि रोजशाह कोटला मैदानावर चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी चहापानानंतर उमेश यादवच्या आक्रमक स्पेलच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

नवी दिल्ली : फि रोजशाह कोटला मैदानावर चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी चहापानानंतर उमेश यादवच्या आक्रमक स्पेलच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या स्पेलनंतर आत्मविश्वास उंचावला असल्याची प्रतिक्रिया उमेशने व्यक्त केली. यादवने सोमवारी अखेरच्या सत्रात ६ निर्धाव षटके टाकून ३ बळी घेतले. त्याने दुसऱ्या डावात २१ षटकांत १६ निर्धाव षटके टाकून ९ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखविला. यादव म्हणाला, ‘‘मला माझ्या कसोटी कारकिर्दीत ब्रेकमध्ये काही सामने खेळण्याची संधी मिळाली. मी सलग काही सामने खेळलेलो नाही. या स्पेलनंतर माझा आत्मविश्वास उंचावण्यास मदत झाली. मी आतापार्यंत कसोटी क्रिकेट खेळताना किंवा स्थानिक क्रिकेट खेळताना जे काही आत्मसात केले, ते सर्व या स्पेलमध्ये दाखविण्याची वेळ आली आहे, असे मला वाटले.’’अखेरच्या सत्रासाठी मैदानात उतरण्यापूर्वीच्या मानसिकतेबाबत यादव म्हणाला, ‘‘आगामी ६ महिन्यांसाठी मला हा अखेरचा कसोटी सामना खेळायचा आहे. दक्षिण आफ्रिकेला ३-० ने पराभूत करण्याची संधी पुन्हा केव्हा मिळेल किंवा नाही, हे सांगता येत नाही. एक बळी मिळविला तर विजयाचा मार्ग मोकळा होईल, असे मला वाटत होते. मी केवळ एक बळी घेण्यासाठी प्रयत्नशील होतो.’’यादवने डेन विलास व केली एबोट यांना इनस्विंगवर तंबूचा मार्ग दाखविल्यानंतर डेन पिएटला यष्टीमागे झेल देण्यास भाग पाडून कोटलावर भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला. यादव म्हणाला, ‘‘चहापानाच्या विश्रांतीदरम्यान कोन बदलून गोलंदाजी केल्यास चेंडू अधिक स्विंग होण्यास मदत मिळेल, अशी चचा केली. मी त्यानुसार मारा केला आणि यश मिळाले. मी या शैलीने चेंडू नेहमीपेक्षा अधिक स्विंग करू शकलो. चेंडू उशिरा स्विंग होत असल्यामुळे फलंदाजांनाही चेंडूबाबत अचूक अंदाज येत नव्हता.’’ (वृत्तसंस्था)