शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिस्पर्ध्यांचे टार्गेट विराट-आश्विन

By admin | Updated: March 1, 2017 00:05 IST

पहिल्या कसोटीत भारतानं ३३३ धावांनी मात खाल्ली, अडीच दिवसांतच ही कसोटी आॅस्ट्रेलियानं जिंकली

- अयाझ मेमन पहिल्या कसोटीत भारतानं ३३३ धावांनी मात खाल्ली, अडीच दिवसांतच ही कसोटी आॅस्ट्रेलियानं जिंकली. यावरून आपल्या लक्षात येतं की, पाहुणे किती तयारी करून आले आहेत आणि आपण किती वाईट खेळलो. आता प्रश्न असा आहे की, या पराभवानंतर येथून पुढे भारत या मालिकेमध्ये पुनरागमन करणार का? आणि कशा पध्दतीने करणार? कोण या मालिकेत भारताला बरोबरीत आणू शकणार? माझ्यामते ही जबाबदारी पडते ती कर्णधार विराट कोहली आणि रविचंद्रन आश्विन यांच्यावर. हा सांघिक खेळ असला तरी सर्वात जास्त जबाबदारी त्यांनाच घ्यावी लागेल. आपल्या कामगिरीने स्टार बनलेले खेळाडू हे प्रतिस्पर्ध्यांच्या टार्गेटवर असतात. विराट कोहलीने पहिल्या कसोटीत जास्त धावा केल्या नाहीत. पहिल्या डावात त्याने एका बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडले. दुसऱ्या डावात त्याने सोडून दिलेला चेंडू स्टम्पवर आदळला. विराट असे सहसा बाद होत नाही, कारण चेंडूची लाईन आणि लेंग्थ ओळखण्याची त्याची क्षमता इतरांपेक्षा जास्त आहे. हा चेंडू ओळखण्यात तो चुकला असेच म्हणावे लागेल.यापुढे विराट कोहलीला लगाम घालण्याची रणनीती आॅस्ट्रेलियन संघ आखण्याची शकयता आहे. कारण विराट कोहली दबावात आला तर संपूर्ण बॅटिंग आॅर्डर, एका अर्थाने पूर्ण संघच दबावात येतो. याचा अर्थ असा नाही की, दुसरे खेळाडू खेळ करीत नाही. चेतेश्वर पुजारा, मुरली विजय यांनी चांगल्या हंगामात चांगल्या धावा केल्या आहेत. के. एल. राहुलच्या कामगिरीत सातत्य नसले तरी तो उपयुक्त फलंदाज आहे. पुणे कसोटीत अर्धशतक करणारा तो एकमेव भारतीय आहे. बंगळुरूमधील कसोटीत विराट आणि आश्विन यांना पुढे येऊन जबाबदारी घ्यावी लागेल, नुसती घ्यावी लागणार नाही तर स्वत:च्या कामगिरीने सहकऱ्यांना प्रेरित करावे लागेल. सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच त्यांना आॅस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवावे लागेल. दुसऱ्या कसोटीत आॅस्ट्रेलियाच्या टार्गेटवर विराट आणि अश्विन हे दोघे अग्रक्रमाने असतील एवढे मात्र निश्चित.(लेखक लोकमतचे संपादकीय सल्लागार आहेत)