शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

प्रतिस्पर्ध्यांचे टार्गेट विराट-आश्विन

By admin | Updated: March 1, 2017 00:05 IST

पहिल्या कसोटीत भारतानं ३३३ धावांनी मात खाल्ली, अडीच दिवसांतच ही कसोटी आॅस्ट्रेलियानं जिंकली

- अयाझ मेमन पहिल्या कसोटीत भारतानं ३३३ धावांनी मात खाल्ली, अडीच दिवसांतच ही कसोटी आॅस्ट्रेलियानं जिंकली. यावरून आपल्या लक्षात येतं की, पाहुणे किती तयारी करून आले आहेत आणि आपण किती वाईट खेळलो. आता प्रश्न असा आहे की, या पराभवानंतर येथून पुढे भारत या मालिकेमध्ये पुनरागमन करणार का? आणि कशा पध्दतीने करणार? कोण या मालिकेत भारताला बरोबरीत आणू शकणार? माझ्यामते ही जबाबदारी पडते ती कर्णधार विराट कोहली आणि रविचंद्रन आश्विन यांच्यावर. हा सांघिक खेळ असला तरी सर्वात जास्त जबाबदारी त्यांनाच घ्यावी लागेल. आपल्या कामगिरीने स्टार बनलेले खेळाडू हे प्रतिस्पर्ध्यांच्या टार्गेटवर असतात. विराट कोहलीने पहिल्या कसोटीत जास्त धावा केल्या नाहीत. पहिल्या डावात त्याने एका बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडले. दुसऱ्या डावात त्याने सोडून दिलेला चेंडू स्टम्पवर आदळला. विराट असे सहसा बाद होत नाही, कारण चेंडूची लाईन आणि लेंग्थ ओळखण्याची त्याची क्षमता इतरांपेक्षा जास्त आहे. हा चेंडू ओळखण्यात तो चुकला असेच म्हणावे लागेल.यापुढे विराट कोहलीला लगाम घालण्याची रणनीती आॅस्ट्रेलियन संघ आखण्याची शकयता आहे. कारण विराट कोहली दबावात आला तर संपूर्ण बॅटिंग आॅर्डर, एका अर्थाने पूर्ण संघच दबावात येतो. याचा अर्थ असा नाही की, दुसरे खेळाडू खेळ करीत नाही. चेतेश्वर पुजारा, मुरली विजय यांनी चांगल्या हंगामात चांगल्या धावा केल्या आहेत. के. एल. राहुलच्या कामगिरीत सातत्य नसले तरी तो उपयुक्त फलंदाज आहे. पुणे कसोटीत अर्धशतक करणारा तो एकमेव भारतीय आहे. बंगळुरूमधील कसोटीत विराट आणि आश्विन यांना पुढे येऊन जबाबदारी घ्यावी लागेल, नुसती घ्यावी लागणार नाही तर स्वत:च्या कामगिरीने सहकऱ्यांना प्रेरित करावे लागेल. सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच त्यांना आॅस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवावे लागेल. दुसऱ्या कसोटीत आॅस्ट्रेलियाच्या टार्गेटवर विराट आणि अश्विन हे दोघे अग्रक्रमाने असतील एवढे मात्र निश्चित.(लेखक लोकमतचे संपादकीय सल्लागार आहेत)