शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

प्रतिस्पर्ध्यांचे टार्गेट विराट-आश्विन

By admin | Updated: March 1, 2017 00:05 IST

पहिल्या कसोटीत भारतानं ३३३ धावांनी मात खाल्ली, अडीच दिवसांतच ही कसोटी आॅस्ट्रेलियानं जिंकली

- अयाझ मेमन पहिल्या कसोटीत भारतानं ३३३ धावांनी मात खाल्ली, अडीच दिवसांतच ही कसोटी आॅस्ट्रेलियानं जिंकली. यावरून आपल्या लक्षात येतं की, पाहुणे किती तयारी करून आले आहेत आणि आपण किती वाईट खेळलो. आता प्रश्न असा आहे की, या पराभवानंतर येथून पुढे भारत या मालिकेमध्ये पुनरागमन करणार का? आणि कशा पध्दतीने करणार? कोण या मालिकेत भारताला बरोबरीत आणू शकणार? माझ्यामते ही जबाबदारी पडते ती कर्णधार विराट कोहली आणि रविचंद्रन आश्विन यांच्यावर. हा सांघिक खेळ असला तरी सर्वात जास्त जबाबदारी त्यांनाच घ्यावी लागेल. आपल्या कामगिरीने स्टार बनलेले खेळाडू हे प्रतिस्पर्ध्यांच्या टार्गेटवर असतात. विराट कोहलीने पहिल्या कसोटीत जास्त धावा केल्या नाहीत. पहिल्या डावात त्याने एका बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडले. दुसऱ्या डावात त्याने सोडून दिलेला चेंडू स्टम्पवर आदळला. विराट असे सहसा बाद होत नाही, कारण चेंडूची लाईन आणि लेंग्थ ओळखण्याची त्याची क्षमता इतरांपेक्षा जास्त आहे. हा चेंडू ओळखण्यात तो चुकला असेच म्हणावे लागेल.यापुढे विराट कोहलीला लगाम घालण्याची रणनीती आॅस्ट्रेलियन संघ आखण्याची शकयता आहे. कारण विराट कोहली दबावात आला तर संपूर्ण बॅटिंग आॅर्डर, एका अर्थाने पूर्ण संघच दबावात येतो. याचा अर्थ असा नाही की, दुसरे खेळाडू खेळ करीत नाही. चेतेश्वर पुजारा, मुरली विजय यांनी चांगल्या हंगामात चांगल्या धावा केल्या आहेत. के. एल. राहुलच्या कामगिरीत सातत्य नसले तरी तो उपयुक्त फलंदाज आहे. पुणे कसोटीत अर्धशतक करणारा तो एकमेव भारतीय आहे. बंगळुरूमधील कसोटीत विराट आणि आश्विन यांना पुढे येऊन जबाबदारी घ्यावी लागेल, नुसती घ्यावी लागणार नाही तर स्वत:च्या कामगिरीने सहकऱ्यांना प्रेरित करावे लागेल. सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच त्यांना आॅस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवावे लागेल. दुसऱ्या कसोटीत आॅस्ट्रेलियाच्या टार्गेटवर विराट आणि अश्विन हे दोघे अग्रक्रमाने असतील एवढे मात्र निश्चित.(लेखक लोकमतचे संपादकीय सल्लागार आहेत)