विष पाजल्याचे प्रकरण : न्यायालयाचे आदेश अमरावती : नवाथेनगर परिसरातील युवा कार्यकर्ते मुन्ना मिश्रा यांना जबरीने विष पाजल्याची तक्रार वाहतूक शाखेच्या पोलिसाविरोधात करण्यात आली. राजापेठ पोलिसांनी नागपूर खंडपीठाच्या आदेशाने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विजय साळुंके, पीएसआय नीलेश पाटील, पोलीस शिपाई विजय राठोड व अन्य दोघांविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. नवाथेनगरातील रहिवासी राजेश ऊर्फ मुन्ना बंजरगप्रसाद मिश्रा यांचा ७ आॅक्टोबर २०१४ रोजी दुपारी वाहतूक शाखेचे पीएसआय पोलीस विजय राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद झाला होता. पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करीत मुन्ना मिश्रा व धीरज वंजारी हे दोघेही राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी तक्रार न नोंदविता मुन्ना मिश्रा यालाच पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. दरम्यान तेथे पोलीस निरीक्षक साळुंकेही पोहोचले. पोलीस निरीक्षक विजय साळुंखे यांनी मुन्ना मिश्रा याला मारहाण करून पोलीस कर्मचारी विजय राठोड, पाटील व अन्य दोघांनी मुन्नाला रात्री ठाण्यात जबरीने विष पाजल्याचा आरोप मिश्रा यांनी केला होता. ८ आॅक्टोबर २०१४ रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. परंतु कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे मिश्रा यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशावरून राजापेठ पोलिसांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांविरूध्द गुन्हे नोंदविले आहेत.
चिराग सेन उपांत्य फेरीत
By admin | Updated: September 7, 2015 00:28 IST