शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

चिंकी यादवने भारतासाठी मिळवला अकरावा ऑलिम्पिक कोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 02:18 IST

विश्वचषक नेमबाजी : अंतिम फेरीत पदकाचे स्वप्न मात्र भंगले; सहाव्या स्थानी मानावे लागले समाधान

दोघा : चिंकी यादवने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या २५ मीटर पिस्तूल पात्रता फेरीत ५८८ गुणांचा वेध घेत अंतिम फेरी गाठली. यासह तिने आगामी आॅलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी अकरावा कोटा मिळवला. मात्र यानंतर तिला अंतिम फेरीत लय कायम राखण्यात अपयश आल्याने सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले.

चिंकीने राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक, तर ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेले आहे. पात्रता फेरीत जबरदस्त कामगिरी केलेल्या चिंकीकडून भारताला मोठ्या आशा होत्या. मात्र आठ खेळाडूंच्या अंतिम फेरीत तिला ११६ गुणांसह सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. पात्रता फेरीत चिंकीने सर्वांचे लक्ष वेधताना ‘परफेक्ट १००’ गुणही मिळविले. या वेळी थायलंडची नेपहासवान यांगपाइबून (५९०) अव्वल राहिली आणि दुसऱ्या क्रमांकासह चिंकीने अंतिम फेरीत कूच केले.या स्पर्धेनंतर चिंकीने म्हटले, ‘मी माझ्या कामगिरीवर किती आनंदी आहे हे शब्दांत सांगू शकत नाही. ही माझी सर्वोत्तम कामगिरी होती. माझे प्रशिक्षक, खासकरून जसपाल सर यांना माझ्या यशाचे श्रेय देते. तसेच, भोपाळ अकादमी व एनआरएआय यांचा पाठिंबाही माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला.’ दरम्यान अंतिम फेरीसह चिंकीने भारताचा आॅलिम्पिक कोटाही निश्चित केला. कारण या वेळी आठपैकी चार खेळाडूंनी आधीच आॅलिम्पिक कोटा मिळविलेला होता. त्यामुळे या स्पर्धेत केवळ चार आॅलिम्पिक कोटा शिल्लक राहिले होते. त्याचवेळी २५ मीटर पिस्तूल प्रकारातील भारताचे हे दुसरे आॅलिम्पिक कोटा ठरले. याआधी महाराष्ट्राच्या राही सरनोबतने या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या म्युनिच विश्वचषक स्पर्धेत आॅलिम्पिक कोटा मिळवला होता. त्याचप्रमाणे, या स्पर्धेत सहभागी झालेले अन्य भारतीय नेमबाज अनुराज सिंग (५७५), नीरज कौर (५७२) यांना अनुक्रमे २१व्या आणि २७व्या स्थानी समाधान मानावे लागले. आतापर्यंत भारताने ५० मीटर रायफल (पुरुष-महिला), ५० मीटर रायफल थ्री पोजीशन (पुरुष), १० मीटर एअर रायफल (पुरुष-महिला) आणि २५ मीटर एअर पिस्तूल (महिला) या स्पर्धांमध्ये आॅलिम्पिक कोटा मिळवलेला आहे. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Shootingगोळीबार