शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

'विराट' प्रसन्न, दक्षिण आफ्रिकेसमोर ३०० धावांचे आव्हान

By admin | Updated: October 22, 2015 17:51 IST

विराट कोहलीच्या दमदार १३८ धावा आणि सुरेश रैनाच्या ५३ धावांच्या खेळीच्या आधारे चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ३०० धावांचे आव्हान ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमत,

चेन्नई, दि. २२ - विराट कोहलीच्या दमदार १३८ धावा आणि सुरेश रैनाच्या ५३ धावांच्या खेळीच्या आधारे चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ३०० धावांचे आव्हान ठेवले आहे. चांगली सुरुवात होऊनही शेवटच्या पाच षटकात तळाच्या फलंदाजांनी अपेक्षीत साथ न दिल्याने भारताला ३०० धावांवरच रोखण्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांना यश आले आहे. 
चेन्नईतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्मा २१ आणि शिखर धवन ७ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था २ बाद ३५ धावा अशी झाली होती. मात्र यानंतर तिस-या क्रमांकावर आलेल्या विराटने अजिंक्य रहाणेच्या साथीने भारताचा डाव सावरला. विराट आणि रहाणे या जोडीने तिस-या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी रचली. विराटपाठोपाठ रहाणेही अर्धशतक झळकावेल असे वाटत असताना डेल स्टेनने रहाणेला बाद करत ही जोडी फोडली. रहाणे ४५ धावांवर बाद झाला. या मालिकेत सपशेल अपयशी ठरलेला सुरेश रैना पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या सामन्यात सुरेश रैनानेही सावध सुरुवात करत विराटला सुरेख साथ दिली. विराट कोहलीने १३८ धावा तर सुरेश रैनाने ५३ धावांची खेळी केली. सुरैश रैना बाद झाला त्यावेळी भारताची स्थिती ४५ षटकांत ४ बाद २६६ अशी होती. मात्र त्यानंतर धोनी (१५ धावा), हरभजन (०) आणि अक्षर पटेल ( नाबाद ४ धावा) या तळाच्या फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही व भारताला ५० षटकांत ८ विकेट गमावून २९९ धावाच करता आल्या.  दक्षिण आफ्रिकेतर्फे डेल स्टेन आणि कॅगिसो रबाडाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर ख्रिस मॉरिसने एक विकेट घेतली. 
 
विराट कोहली पाचव्या स्थानावर 
सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट कोहली आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहलीचे वन डे कारकिर्दीतील हे २३ वे शतक असून १६५ व्या सामन्यांमध्ये त्याने हा विक्रम रचला आहे.