शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

विडिंजसमोर 191 धावांचे आव्हान

By admin | Updated: July 9, 2017 22:47 IST

प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 190 धावा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत किंगस्टन, दि. 9 - प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 190 धावा केल्या आहेत. विडिंजला विजयासाठी 191 धावांचे आव्हान दिले. विराट कोहली आणि शिखर धवनने भारतीय संघाला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. कोहली आणि धवन यांनी विंडिजच्या गोलंदाजी फोडून काढली. आक्रमक फटकेबाजी करत या जोडीने संघाचं अर्धशतक फलकावर लावलं. पहिल्या विकेटसाठी कोहली आणि धवनने 64 धावांची भागीदारी केली. कोहलीने विंडिजच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत काही सुरेख फटकेही खेळले. ही जोडी फोडायला विंडिज कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने शर्थीचे प्रयत्न केले. अखेर केस्रिक विल्यम्सला ही जोडी फोडण्यात यश आलं. विल्यम्सला मोठा फटका मारण्या प्रयत्नात कोहली झेलबाद झाला. कोहलीने 22 चेंडूचा सामना करताना एक षटकार आणि सात चौकाराच्या मदतीने 39 धावा केल्या. कोहली बाद झाल्यानंतर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नाच धवनीही बाद झाला. लागोपाठ बसलेल्या दोन धक्क्यांमधून भारतीय संघाचा डाव पंत आणि कार्तिक जोडीने सावराला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली.मोठ्या कालावधीनंतर भारताच्या टी-२० संघात पुनरागमन केलेल्या दिनेश कार्तिकने जोरदार फटकेबाजी करत 29 चेंडूत 48 धावा ठोकल्या. कार्तिकच्या या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. कार्तिक आपलं अर्धशतक साजरं करणार असं वाटत असतानाच सॅम्युअल्सने त्याचा त्रिफळा उडवत भारताला तिसरा धक्का दिला. सलामीवीर कोहली-धवनकडून झालेल्या फटकेबाजीनंतर पंत-कार्तिक जोडीनेही विंडिजच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. दोघांनीही मिळून भारताला 150 धावांचा टप्पा गाठून दिला. शेवटच्या षटकांत धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात भारताने आपल्या विकेट बहाल केल्या. कार्तिकनंतर जम बसलेला पंतही लगेच माघारी परतला. धोनी आणि जाधवही फारशी चमक दाखवू शकले नाहीत. धोनी दोन तर जाधव चार धावांवर बाद झाले.