शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

विडिंजसमोर 191 धावांचे आव्हान

By admin | Updated: July 9, 2017 22:47 IST

प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 190 धावा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत किंगस्टन, दि. 9 - प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 190 धावा केल्या आहेत. विडिंजला विजयासाठी 191 धावांचे आव्हान दिले. विराट कोहली आणि शिखर धवनने भारतीय संघाला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. कोहली आणि धवन यांनी विंडिजच्या गोलंदाजी फोडून काढली. आक्रमक फटकेबाजी करत या जोडीने संघाचं अर्धशतक फलकावर लावलं. पहिल्या विकेटसाठी कोहली आणि धवनने 64 धावांची भागीदारी केली. कोहलीने विंडिजच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत काही सुरेख फटकेही खेळले. ही जोडी फोडायला विंडिज कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने शर्थीचे प्रयत्न केले. अखेर केस्रिक विल्यम्सला ही जोडी फोडण्यात यश आलं. विल्यम्सला मोठा फटका मारण्या प्रयत्नात कोहली झेलबाद झाला. कोहलीने 22 चेंडूचा सामना करताना एक षटकार आणि सात चौकाराच्या मदतीने 39 धावा केल्या. कोहली बाद झाल्यानंतर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नाच धवनीही बाद झाला. लागोपाठ बसलेल्या दोन धक्क्यांमधून भारतीय संघाचा डाव पंत आणि कार्तिक जोडीने सावराला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली.मोठ्या कालावधीनंतर भारताच्या टी-२० संघात पुनरागमन केलेल्या दिनेश कार्तिकने जोरदार फटकेबाजी करत 29 चेंडूत 48 धावा ठोकल्या. कार्तिकच्या या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. कार्तिक आपलं अर्धशतक साजरं करणार असं वाटत असतानाच सॅम्युअल्सने त्याचा त्रिफळा उडवत भारताला तिसरा धक्का दिला. सलामीवीर कोहली-धवनकडून झालेल्या फटकेबाजीनंतर पंत-कार्तिक जोडीनेही विंडिजच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. दोघांनीही मिळून भारताला 150 धावांचा टप्पा गाठून दिला. शेवटच्या षटकांत धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात भारताने आपल्या विकेट बहाल केल्या. कार्तिकनंतर जम बसलेला पंतही लगेच माघारी परतला. धोनी आणि जाधवही फारशी चमक दाखवू शकले नाहीत. धोनी दोन तर जाधव चार धावांवर बाद झाले.