शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

चॅपेल म्हणतात ‘बकवास’

By admin | Updated: November 5, 2014 00:31 IST

सचिनने पुस्तकात म्हटले आहे की, ‘चॅपेलची द्रविडचा आदर न करण्याची वृत्ती आश्चर्यचकित करणारी होती. सचिनने २००५ ते २००७ या कालावधीत राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकप

नवी दिल्ली : सचिन तेंडुलकरने ‘प्लेर्इंग इट माय वे’ या आत्मचरित्रामध्ये तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्यावर टीका केली आहे. सचिनचे संघसहकारी झहीर खान आणि हरभजनसिंग यांनी सचिनचे समर्थन केले तर ग्रेग चॅपेल यांनी राहुल द्रविडला कर्णधारपदावरून हटविण्याच्या प्रयत्नाबाबतचा दावा फेटाळून लावला. सचिनच्या या आत्मचरित्राचे गुरुवारी प्रकाशन होणार आहे. तेंडुलकरने स्पष्ट केले की, ‘चॅपेलने विश्वकप २००७ च्या काही महिन्यांपूर्वी द्रविडच्या स्थानी त्याला कर्णधार करण्याचा प्रयत्न केला.’ चॅपेल यांनी मात्र या विषयावर सचिनसोबत कधीच चर्चा केली नसल्याचे म्हटले आहे. चॅपेल म्हणाले, ‘मी शाब्दिक युद्धात उडी घेण्यास इच्छुक नाही, पण मी भारतीय संघाचा प्रशिक्षक असताना द्रविडच्या स्थानी सचिनने कर्णधारपद स्वीकारावे, याबाबत कधीच विचार केला नाही. त्यामुळे आत्मचरित्रातील या दाव्याचे आश्चर्य वाटले. त्या कालावधीत मी केवळ एकदा सचिनच्या निवासस्थानी गेलो होते. सचिन दुखापतीतून सावरत असताना फिजिओ व सहायक प्रशिक्षकाच्या साथीने सचिनच्या घरी गेलो होतो. पुस्तकामध्ये करण्यात आलेल्या दाव्याच्या किमान वर्षभरापूर्वी मी सचिनच्या घरी गेलो होतो. त्यावेळी मी सचिनच्या घरी आल्हाददायक सायंकाळचा आनंद घेतला. त्यावेळी कर्णधारपदाच्या मुद्यावर कधीच चर्चा झाली नाही.’सचिनने पुस्तकात म्हटले आहे की, ‘चॅपेलची द्रविडचा आदर न करण्याची वृत्ती आश्चर्यचकित करणारी होती. सचिनने २००५ ते २००७ या कालावधीत राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविणाऱ्या चॅपेल यांच्यावर टीका करताना त्यांना ‘रिंगमास्टर’ म्हटले आहे. चॅपेल आपले मत खेळाडूंवर लादत होते. आपला निर्णय खेळाडूंना मान्य आहे किंवा नाही, याचा ते कधीच विचार करीत नव्हते’, असेही सचिनने म्हटले आहे. झहीर व हरभजन यांनी मात्र सचिनचे समर्थन केले आहे. चॅपेलच्या ‘हुकूमशाही’चा आम्हाला फटका बसल्याचे झहीर व हरभजनने म्हटले आहे.झहीरने दावा केला की,‘चॅपेलने त्याचे राष्ट्रीय संघातील पुनरागमन रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले.’ हरभजनने म्हटले की,‘चॅपेल यांनी भारतीय क्रिकेटला रसातळाला नेले आणि सिनिअर खेळाडूंना टार्गेट केले.’१४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ३११ कसोटी व २८२ वन-डे क्रिकेट घेणारा झहीर पुढे म्हणाला, ‘चॅपेल यांचा स्वतंत्र अजेंडा होता, याची मला कल्पना होती. त्यांच्या काही योजना होत्या आणि तुम्ही जर योजनेचा भाग नसेल तर दुसरा मार्ग निवडण्यासाठी तुम्हाला तयार असावे लागत होते. चॅपेलने माझी कारकीर्द संपविण्याचा प्रयत्न केला, पण २००६ च्या अखेर दक्षिण आफ्रिकेमध्ये मी अधिक दमदार पुनरागमन केले.’झहीर पुढे म्हणाला, ‘संघातील सिनिअर खेळाडूंची त्याला अडचण भासत होती. मी संघातून जवळजवळ वर्षभर बाहेर होतो. त्यावेळी त्यांनी माझे संघातील पुनरागमन रोखण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी माझ्या पुनरागमनाबाबत चर्चा होत होती, त्यावेळी चॅपेल कुठले ना कुठले कारण पुढे करीत तीन-चार महिन्यांसाठी टाळत होते, असे मला नंतर कळले.’हरभजननेही सचिनचे समर्थन केले आणि काही खेळाडू चॅपेल यांना चुकीची माहिती देत होते, असेही सांगितले. हरभजनने असा दावा केला आहे की, ‘ज्यावेळी भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध बुलावयोमध्ये कसोटी सामना खेळत होता त्यावेळी चॅपेल यांनी तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीबाबत बीसीसीआयला ईमेल पाठविला होता. सौरव फलंदाजी करीत होता आणि चॅपेल ड्रेसिंग रुममध्ये बसून सौरववर टीका करणारा ईमेल टाईप करीत होते. त्यांना सामन्यामध्ये काही स्वारस्य नव्हते.’भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेला हरभजन पुढे म्हणाला, ‘एकूण सात खेळाडूंना ते बदलविण्यास इच्छुक होते. सौरव त्यांचे मुख्य टार्गेट होता. त्यानंतर माझा नंबर होता. त्याचप्रमाणे वीरेंद्र सेहवाग, आशीष नेहरा, झहीर खान आणि युवराज सिंग यांचा क्रमांक होता.’मणिंदर सिंग आणि कीर्ती आझाद यांच्यासारख्या माजी क्रिकेटपटूंनीही चॅपेल यांच्यावर टीका केली. चॅपेल यांच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेट रसातळाला गेले, असेही या खेळाडूंनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)