शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

चानूचा सुवर्ण पराक्रम, जागतिक भारोत्तोलन, मल्लेश्वरीनंतर २२ वर्षांनी विश्वविक्रमाला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:41 IST

भारताची महिला भारोत्तोलक मीराबाई चानूने जागतिक भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) चॅम्पियनशिप स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. ४८ किलो वजन गटात तिने स्नॅचमध्ये ८५ किलो आणि जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलून हा पराक्रम केला.

नवी दिल्ली : भारताची महिला भारोत्तोलक मीराबाई चानूने जागतिक भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) चॅम्पियनशिप स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. ४८ किलो वजन गटात तिने स्नॅचमध्ये ८५ किलो आणि जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलून हा पराक्रम केला. भारोत्तोलन स्पर्धेत पदकाची कमाई करणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. २२ वर्षांपूर्वी कर्णम मल्लेश्वरीने विश्व भारोत्तोलन चॅम्पियनशिप स्पर्धेत अशी कामगिरी केली होती.यामुळे रिओ आॅलिम्पिकमधील खराब कामगिरीची तिची नाराजीदेखील दूर झाली. राष्टÑगीताची धून वाजताच भारतीय रेल्वेची खेळाडू असलेल्या मीराबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आॅलिम्पिक कांस्य विजेती कर्णम मल्लेश्वरी हिने याआधी १९९४ आणि १९९५ मध्ये विश्व स्पर्धेचे सुवर्ण जिंकले होते. चानू रिओ आॅलिम्पिकच्या तिन्ही प्रयत्नांत अपयशी ठरली होती. १२ खेळाडूंचा समावेश असलेल्या या प्रकारात ज्या दोन खेळाडू स्पर्धा पूर्ण करू शकल्या नव्हत्या, त्यात चानू एक होती. आज थायलंडची सुकराचोन हिला रौप्य आणि सेगुरा इरिसने कांस्य जिंकले. डोपिंग प्रकरणामुळे रशिया, चीन, कझाकस्तान, युक्रेन आणि अझरबैजान येथील भारोत्तोलक या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत.राष्टÑपती, पंतप्रधानांकडून अभिनंदनसुवर्ण विजेती भारोत्तोलक साइखोम मीराबाई चानू हिचे राष्टÑपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.‘भारताला मीराबाईच्या कामगिरीचा अभिमान आहे. त्यासाठी तिचे अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा,’ असे मोदी यांनी टिष्ट्वट केले. ‘देशाला चॅम्पियन देणाºया मणिपूरचे आणि विश्व पराक्रमी मीराबाईचे अभिनंदन’, असे राष्टÑपतींनी म्हटले आहे.मीराबाईचे अभिनंदन करणाºयांमध्ये क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड, पाच वेळेची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम. सी. मेरीकोम, आॅलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदरसिंग यांचा समावेश आहे.भारतीय भारोत्तोलन महासंघाचे महासचिव सहदेव यादव म्हणाले,‘ही आॅलिम्पिकपेक्षा मोठी उपलब्धी आहे. विश्व स्पर्धेत अतिषय अवघड आव्हान असते. त्यासाठी मीराबाई आणि कोच विजय शर्मा अभिनंदनास पात्र आहेत.आज मी जे काही मिळवले आहे, ते प्रशिक्षक विजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाशिवाय शक्य झाले नसते. मी आणि माझ्या प्रशिक्षकांनी उच्च स्तरावर यशस्वी होण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नव्हती. रिओ आॅलिम्पिक स्पर्धेतील अपयश माझ्यासाठी खूप निराशाजनक होते. मी रिओला चुका केल्या होत्या आणि अजूनही ती गोष्ट सलत आहे. मात्र, या पदकाने ती निराशा दूर झाली आहे. आता मी माझ्या कमजोर बाजूंकडे अधिक लक्ष देईल आणि आगामी राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा तसेच टोकिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकाण्याचा पुर्ण प्रयत्न करेल.- मीराबाई चानू

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारत