शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

अर्जुन पुरस्कारांचे नियम बदलणार,  राष्ट्रीय पात्रता नियमात बदलाच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 04:08 IST

अर्जुन पुरस्कारापासून कुठलाही पात्र खेळाडू वंचित राहू नये, यासाठी क्रीडा मंत्रालय पात्रता नियमांत बदल करण्याच्या विचारात आहे. नव्या बदलामुळे शिफारस न केलेल्या खेळाडूंच्या नावाचादेखील पुरस्कारासाठी विचार शक्य होणार आहे.

नवी दिल्ली : अर्जुन पुरस्कारापासून कुठलाही पात्र खेळाडू वंचित राहू नये, यासाठी क्रीडा मंत्रालय पात्रता नियमांत बदल करण्याच्या विचारात आहे. नव्या बदलामुळे शिफारस न केलेल्या खेळाडूंच्या नावाचादेखील पुरस्कारासाठी विचार शक्य होणार आहे.क्रीडामंत्री विजय गोयल यांनी पात्रता नियमात बदल करण्याबाबत पुढाकार घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिका-याने सांगितले, की निवड समितीच्या विश्वसनीयतेवर कुठलीही शंका घेण्यात आली नाही. याशिवाय पारदर्शीपणा जपण्याचा निर्णय झाला आहे. समितीत नेहमी प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असतो. पण पुढील वर्षी योजनेत संशोधन होईल. लवकरच नवे निर्देश निघतील. यानुसार ज्या खेळाडूंच्या नावाची शिफारस झाली नसेल किंवा संबंधित महासंघाने त्याचे नाव पाठविले नसेल तरीही त्या खेळाडूच्या कामगिरीची दखल घेत पुरस्कारासाठी विचार केला जाईल.रोहन बोपन्नासारखा वाद टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे का, असा सवाल करताच हा अधिकारी म्हणाला, ‘चांगल्या अणि सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही बोपन्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. जुनी पद्धत सुधारण्याची ही प्रक्रिया समजा. एखाद्या व्यक्तीशी संबंधित हे प्रकरण नाही. एकूणच पद्धत सुधारण्याची गरज असल्याने समितीलादेखील सुधारणा पटतील.’जूनमध्ये फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकविणाºया बोपन्नाच्या नावाची शिफारस एआयटीएने क्रीडा मंत्रालयाकडे केली नव्हती. वेळ निघून गेल्यानंतर २८ एप्रिल रोजी त्याचे नाव पाठविण्यात आले होते.मिताली राज ही महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारी फलंदाज बनली. तिला खेलरत्न देण्याची मागणी पुढे आली, पण तिचे नाव पुरस्कारासाठी पाठविण्यात आले नव्हते. त्यामुळे समितीला तिच्या नावाचादेखील विचार करता आला नाही. समितीच्या एका सदस्याने ३ आॅगस्ट रोजी बैठकीपूर्वी मितालीच्या नावावर चर्चा होऊ शकते काय, असा प्रश्न उपस्थित केल्याची माहिती पुढे आली आहे. बीसीसीआय किंवा कुठल्याही अन्य संघटनेने मितालीची शिफारस केली नसल्याने चर्चा होऊ शकत नसल्याचे ‘त्या’ सदस्याला सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)प्रचलित नियमानुसार खेळाडूंना विश्वकप, विश्वचॅम्पियनशिप, आशियाई स्पर्धा, आशियाड, राष्टÑकुल क्रीडा स्पर्धा, तसेच राष्टÑकुल चॅम्पियनशिपमधील कामगिरीच्या आधारे गुण दिले जातात. गुण देण्याच्या पद्धतीत मंत्रालय सुधारणा करते काय, हे पाहणेदेखील रंजक ठरणार आहे...नव्या पात्रता निकषामुळे समितीच्या प्रत्येक सदस्याला पुरस्कारायोग्य असलेल्या पण शिफारस न झालेल्या खेळाडूच्या नावाचा विचार करता येईल. सदस्याच्या सल्ल्यामुळे संबंधित खेळाडू पुरस्कारायोग्य आहे का, हे समितीला पडताळून पाहता येईल...