शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

खेळपट्टीबाबतचा दृष्टिकोन बदलावा : हरभजन सिंग

By admin | Updated: September 20, 2016 05:21 IST

अनिल आणि विराट दोघेही सकारात्मक असून ते अशा खेळपट्टीवर खेळण्यास पसंत करतील, ज्यावर सामन्याचा निकाल चौथ्या किंवा पाचव्या दिवशी लागेल,

नवी दिल्ली : ‘‘गेल्या तीन-चार वर्षांपासून संघव्यवस्थापनाने अशा खेळपट्ट्यांना प्राधान्य दिले आहे, ज्यावर कसोटी सामना तीन दिवसांतच संपतो. मात्र माझ्या मते, अनिल आणि विराट दोघेही सकारात्मक असून ते अशा खेळपट्टीवर खेळण्यास पसंत करतील, ज्यावर सामन्याचा निकाल चौथ्या किंवा पाचव्या दिवशी लागेल,’’ असे स्पष्ट मत भारताचा दिग्गज आॅफस्पिनर हरभजनसिंग याने व्यक्त केले. आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर भज्जीने आपले मत मांडले. भज्जी म्हणाला, ‘‘कसोटी क्रिकेट म्हणजे सामन्याच्या पाचही दिवशी विविध स्तरांवर खेळाडूंचा मोठा कस लागतो. जर, आपण पूर्णपणे फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर अवलंबून राहिलो, तर त्याचा मोठा फटकादेखील आपल्याला बसू शकतो. याचे परिणाम आपण टी-२० विश्वचषक नागपूर सामन्यात पाहिलेच आहेत. किवी संघाचे मिशेल सँटेनर आणि इश सोढी याबाबत धोकादायक ठरू शकतात.’’ ‘‘फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर आपल्याला नक्की बळी मिळतील. मात्र, अशीदेखील वेळ येईल जेव्हा गोलंदाजालाच चेंडूच्या टप्प्याचा व दिशेचा अंदाज येणार नाही. कोणता चेंडू उसळेल आणि फिरकी घेईल याचाही अंदाज येणार नाही,’’ असेही भज्जीने या वेळी सांगितले.त्याचवेळी भज्जीने वेगवान गोलंदाजांकडे लक्ष वेधताना, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीसारख्या वेगवान गोलंदाजांना अधिक षटके टाकण्याची संधी मिळावी, असेही म्हटले. (वृत्तसंस्था)