शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

देशांतर्गत एकदिवसीय व टी-२० क्रिकेटमध्ये बदल

By admin | Updated: July 21, 2015 00:39 IST

नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)देखील २०१४-१५च्या सुरू वर्षात

नवी दिल्ली : नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)देखील २०१४-१५च्या सुरू वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही बदल केले आहेत. यंदा हे बदल एकदिवसीय व टी-२० क्रिकेटमध्ये महिला, पुरुष आणि ज्युनियर स्तरावर लागू होतील. हे बदल आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांकडे पाहून करण्यात आल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयने आॅक्टोबर २०१५ ते मार्च २०१६ पर्यंतच्या सुमारे ९०० विविध सामन्यांत बदल केले आहेत. पुढील वर्षी भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या विश्वचषक टी-२० क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहेत. यानुसार विजय हजारे ट्रॉफी आणि टी-२० सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धांचा बदल करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये सामावेश आहे. ५० वर्षे जुनी दुलीप ट्रॉफी ही स्पर्धा बंद करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. त्यानुसार रणजी स्पर्धेप्रमाणे या दोन्ही स्पर्धा आता विभागीय पद्धतीऐवजी गटनिहाय पद्धतीने खेळविण्यात येतील. त्याचबरोबर देवधर ट्रॉफी स्पर्धेतदेखील बदल करण्यात आला असून, यामध्ये २०१४-१५च्या विजय हजारे ट्रॉफीतील दोन विजयी संघ व सिनियर राष्ट्रीय निवड समितीद्वारे निवडलेला संघ, अशा एकूण ३ संघांमध्ये ही स्पर्धा खेळविण्यात येईल. बीसीसीआयने दोन नवीन महिला स्पर्धा खेळविण्याचा निर्णय घेतला असून, त्यांमध्ये आंतरराज्य आणि आंतरविभागीय स्तरावर २३ वर्षांखालील एकदिवसीय सामने खेळवले जातील. यानंतर सिनियर खेळाडूंमध्ये तीन दिवसीय सामने खेळविण्यात येतील. ज्युनियर खेळाडूंसाठी १९ वर्षांखालील चॅलेंजर ट्रॉफीदेखील खेळविण्यात येणार असून, त्यामध्ये तीन संघांचा समावेश असेल. जानेवारी महिन्यात बांगलादेश येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून राष्ट्रीय संघ निवडीसाठी ही स्पर्धा होईल. (वृत्तसंस्था)