शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

विश्वविजयाचा आनंद साजरा करणार

By admin | Updated: February 20, 2016 02:42 IST

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी एखादी मालिका किंवा स्पर्धा जिंकला की यष्टी उखडतो व ती विजयाची स्मृती म्हणून जपतो. भारताच्या यजमानपदाखाली मार्चमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकही भारत जिंकेल

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी एखादी मालिका किंवा स्पर्धा जिंकला की यष्टी उखडतो व ती विजयाची स्मृती म्हणून जपतो. भारताच्या यजमानपदाखाली मार्चमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकही भारत जिंकेल अशी अपेक्षा व्यक्त करीत यावेळीही यष्टी उखडण्याचे भाग्य माझ्या वाट्याला येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना धोनी म्हणाला,‘ एखादी मालिका किंवा स्पर्धा जिंकल्यानंतर मी यष्टी हातात घेतो. यावेळी देखील यष्टी उखडण्याचा मान माझ्या वाट्याला येईल, अशी अपेक्षा बाळगतो. माझ्याकडे स्टम्पस्चे भलेमोठे कलेक्शन झाले आहे. भविष्यातही या स्मृती कायम राहतील. मी कधीही कुठल्या स्टम्पवर दिनांक आणि स्थान लिहित नाही. पण १०-२० वर्षानंतर मॅचचे व्हिडिओ पाहणार तेव्हा कुठला स्टम्प कोणत्या सामन्याचा आहे हे समजू शकेल.’८ मार्चपासून सुरू होत असलेल्या विश्वचषकात आक्रमक खेळण्याचे वचन देत धोनी पुढे म्हणाला,‘ आक्रमकतेशी कुठलाही समझोता होणार नाही. आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकातही हेच धोरण असेल. विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला संघ संतुलित आहे. संघात कुणी जखमी झाला तरी त्याला कव्हर करण्यासाठी तितक्यात ताकदीचा खेळाडू सज्ज असेल असा आहे.’आॅस्ट्रेलियात टी-२० मालिका जिंकण्यासोबत आम्ही विश्वचषक जिंकण्याची कोनशिला ठेवल्याचे सांगून धोनी म्हणाला, ‘लंकेविरुद्ध विजयी वाटचाल सुरू राहिली. सहकाऱ्यांनी स्वत:ला जखमांपासून दूर ठेवल्यास सांघिक भावनेच्या बळावर विश्वचषक आमचाच असेल. अंतिम ११ खेळाडूंची निवड मात्र सामन्याचा दिवस आणि परिस्थितीवर विसंबून असेल असे त्याने स्पष्ट केले. विश्वचषकात भारताच्या गटात पाक संघ आहे. यावर धोनी म्हणाला, ‘पाक संघात काही नवे चेहरे दिसतील. त्यांची कामगिरी पहायला आवडेल.’ यंदा निवृत्ती नाहीच...निवृत्तीबाबत अप्रत्यक्षपणे विचारलेल्या प्रश्नावर धोनीने उलट सवाल करीत सांगितले की ‘यंदा तरी असे काही होणार नाही. आशिया कप आणि विश्व चषकापाठोपाठ आम्हाला आयपीएल खेळायचे आहे. नंतर वर्षभर कसोटी सामने आहेतच. यादरम्यान केवळ पाच वन डे सामने आहेत. माझ्या मते जे उत्तर हवे होते ते तुम्हाला मिळाले आहे.७ जुलै हा ‘एमएस’चा जन्मदिवस आहे. धोनी म्हणाला,‘फुटबॉल खेळायचो तेव्हा जर्सी नंबर २२ होता. भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले व केनियाला गेलो तेव्हा जर्सी नंबरच्या शोधात होतो. सात नंबर रिकामा होता. मी हाच क्रमांक निवडला. लोकांनी दुसऱ्या क्रमांकाची निवड करण्याचा सल्ला दिला पण मी सातवर कायम होतो. १९९९-२००० मध्ये मला क्रिकेटमध्ये ६२५ रुपये स्टायपन्ड मिळायचा. एक दिवस सरावास दांडी मारली तर २५ रुपये कपात व्हायची, या शब्दात माहीने सुरुवातीच्या दिवसांना आवर्जून उजाळा दिला.